शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

VIDEO: "आम्हाला जीवाची पर्वा नव्हती कारण लोक..."; पर्यटकाला वाचवण्यासाठी पाठीवर घेऊन धावला सज्जाद भट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:46 IST

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मिरी तरुणांनी पर्यटकांना मोठा धीर देत त्यांना योग्य ती मदत पुरवली

Pahalgam Attack: मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये २५ भारतीय आणि एका नागरिकाचा समावेश आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर घाबरलेल्या पर्यटकांना सांभाळण्यासाठी काश्मिरी लोक पोहोचले होते. त्यांनी पर्यटकांना धीर दिला. हल्ल्याची माहिती मिळताच काश्मीरमधील लोक पर्यटकांच्या मदतीसाठी पुढे आले. काश्मिरी लोकांनी पर्यटकांना त्यांच्या घरात आश्रय दिला. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एक काश्मिरी तरुण एका जखमी पर्यटकाला पाठीवर घेऊन धावताना दिसत आहे.

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य केले. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला. दहशतवाद्यांनी केवळ पुरुषांनाच टार्गेट केले. ओळख पटवल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. दहशतवाद्यांनी  सहा पुरुषांची तर त्यांच्या पत्नीसमोरच निर्घृणपणे हत्या केली. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्धवस्त झाली आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पहलगाम येथील शाल विक्रेता सज्जाद अहमद भट एका जखमी पर्यटकला खांद्यावर घेऊन सुरक्षित ठिकाणी घेऊन जाताना दिसत आहे. सज्जाद अहमद भटच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सज्जाद एका जखमी मुलाला पाठीवर घेऊन धावताना दिसत आहे. या घटनेनंतर सज्जादने सांगितले की, आधी माणुसकी आहे मग धर्म येतो. "पहलगाम पोनी असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल वाहिद वान यांनी आमच्या गटाला बैसरन व्हॅलीमध्ये घडलेल्या घटनेबद्दल मेसेज पाठवला होता. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलो आणि दुपारी ३ च्या सुमारास त्या ठिकाणी पोहोचलो. आम्ही तिथल्या जखमींना पाणी दिले आणि ज्यांना चालता येत नव्हते त्यांना उचलून घेतले. पर्यटकांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे, कारण ते  पाहुणे आहेत आणि आमचं घर त्यांच्यावर अवलंबून आहे. माझ्यासाठी धर्माच्या आधी माणुसकी येते. आम्ही त्यापैकी अनेकांना रुग्णालयात आणले. आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नव्हती कारण आम्ही तिथे गेलो तेव्हा लोक मदतीसाठी याचना करत होते. पर्यटकांना रडताना पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. त्यांच्या इथे येण्यानेच आमच्या घरातील चूल पेटते. धर्माच्या आधी माणुसकी पाहिली पाहिजे. तु्म्हाला आम्हाला एकटे सोडू नका. तुम्ही आमचे भाऊ आहात. त्यांच्याशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे," असे सज्जाद अहमद भटने सांगितले.

दरम्यान, या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये बोलताना दहशतवाद्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. "ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या दहशतवाद्यांना आणि हा कट रचणाऱ्यांना त्यांना कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा जास्त कठोर शिक्षा दिली जाईल. शिक्षा मिळूनच राहणार. आता उरलेल्या दहशतवाद्यांनाही मातीत गाडण्याची वेळ आली असून त्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांच्या प्रमुखांचे कंबरडे मोडून ठेवणार आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला