शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

चारा घोटाळ्यापेक्षाही मोठा धान खरेदी घोटाळा; सीबीआयकडे तपास का दिला नाही? झारखंड हायकोर्टाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 12:00 IST

याप्रकरणी हायकोर्टाने मुख्य सचिवांकडून उत्तर मागितले आहे. न्यायालयाने मुख्य सचिवांवर प्रश्नांचा भडिमार केला आहे.

एस. पी. सिन्हा -

रांची : झारखंडमध्ये देशातील सर्वांत मोठा धान खरेदी घोटाळा (Paddy Scam) उघडकीस आला आहे. यात प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था समितीमार्फत धान खरेदी केले होते. या प्रकरणात ४८ गुन्हे दाखल करण्यात आले. लाभार्थी शेतकऱ्यांना कोणतीही माहिती दिल्याशिवाय त्यांच्या नावावर बनावट पद्धतीने धान खरेदी करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात झारखंड हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.

याप्रकरणी हायकोर्टाने मुख्य सचिवांकडून उत्तर मागितले आहे. न्यायालयाने मुख्य सचिवांवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. धान खरेदीत २०११-१२-१३ मध्ये घोटाळा झाला, तर दोन वर्षांनी २०१५ मध्ये गुन्हा दाखल का करण्यात आला? यात उशीर का झाला? यात कोण गुंतलेले आहेत? संपूर्ण राज्यात एक हजार कोटीपेक्षा जास्तीचा घोटाळा झाला, तर याची सीबीआय चौकशी का केलेली नाही? याप्रकरणी आता २८ एप्रिल रोजी सुनावणी ठेवण्यात आलेली आहे.

याचिकाकर्त्यांचे वकील ऋषी पल्लव यांनी कोर्टाला सांगितले की, या घोटाळ्याचा तपास सीबीआयकडून व्हायला पाहिजे होता. या प्रकरणात उमाशंकर सिंहसह अन्य सहा जणांनी हायकोर्टात याचिका दाखल करून संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर सीआयडीने यातील २४ प्रकरणांचा तपास स्वत:कडे घेतला होता. यात पतसंस्था समिती, एफसीआय व मध्यस्थांची भूमिका समोर आली होती. 

देखरेख असती, तर हा प्रकार घडला नसतायाप्रकरणी गट अधिकारी, संस्थांचे अध्यक्ष व सचिव गुंतलेले असल्याचे समोर आले आहे. सहकार खात्याचे अधिकारी व लोकसेवकांनी आरोप केला आहे की, येथे कोणत्याच प्रकारचा निर्बंध नव्हता. सर्व धान राईस मिलमध्ये पोहोचविले गेले. यावर कोणाची देखरेख असती, तर हा प्रकार घडला नसता. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग