शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

‘अ‍ॅटलस सायकल’च्या शेवटच्या कारखान्याचे ‘पॅडल’ थांबले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 05:14 IST

‘जागतिक सायकलदिनी’च थांबविले उत्पादन

नवी दिल्ली : एकेकाळी देशात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘अ‍ॅटलस सायकल’ने दिल्लीजवळील साहिबाबाद येथील आपला शेवटचा सायकल उत्पादक कारखाना बंद केला आहे. कंपनीने ३ जून रोजी या प्रकल्पातील काम थांबविले. योगायोग म्हणजे त्यादिवशी ‘जागतिक सायकल दिन’ होता. कंपनीने शेवटच्या ४३१ कर्मचाऱ्यांनाही काढून टाकले आहे.

याआधी मालनपूर आणि सोनिपत येथील प्रकल्प कंपनीने बंद केले आहेत. १९५१ साली सोनिपत येथील प्रकल्पानेच कंपनीची सुरुवात झाली होती. १९८२ साली दिल्लीतील आशियाई खेळांसाठी कंपनीने सायकली पुरविल्या होत्या.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीएमडी) एन. पी. सिंह राणा यांनी सांगितले की, कारखाना हंगामी स्वरूपात बंद करण्यात आला आहे. कंपनीकडे वापर नसलेला एक भूखंड पडून आहे. तो विकून ५० कोटी रुपये उभे केले जातील. त्यानंतर कारखाना पुन्हा सुरू केला जाईल.

काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दैनिक हजेरीच्या आधारावर निलंबन कालावधीचे वेतन नियमानुसार दिले जाईल. हे वेतन किती असेल याचा खुलासा राणा यांनी केला नाही. तथापि, निलंबन कालावधीत साधारणत: मूळ वेतनाच्या ५० टक्के हिस्सा आणि महागाई भत्ता दिला जातो. साहिबाबाद येथील हा प्रकल्प कंपनीचा सर्वांत मोठा सायकल उत्पादक प्रकल्प होता. येथे १९८९ मध्ये सायकल उत्पादन सुरू करण्यात आले होते. येथे दरमहा दोन लाखांपेक्षा अधिक सायकलींचे उत्पादन होत होते. दरम्यान, कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता कारखाना बंद केल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला आहे.च्कंपनीने बुधवारी गेटवर चिकटवलेल्या नोटिसीत म्हटले की, गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी भांडवलासाठी संघर्ष करीत आहे. कारखाना चालविण्यासाठीही कंपनीकडे पैसे नाहीत.च्कच्चा माल खरेदी करण्यातही आम्ही असमर्थ आहोत. अशा परिस्थितीत कारखाना चालू ठेवणे अशक्य आहे. कर्मचाºयांना सुट्या वगळून हजेरी भरण्यास सांगण्यात आले आहे.