शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

राम मंदिर उभारणीला १५ दिवसांत येणार वेग, २0२४ पर्यंत मंदिर पूर्ण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 05:43 IST

ट्रस्टच्या बैठकीत निर्णय : प्रत्यक्ष बांधकामाचा दिवस लवकरच ठरणार

नितीन आगरवाल 

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराठी स्थापलेल्या राम मंदिर तीर्थक्षेक्ष ट्रस्टच्या कामाला आता सुरुवात झाली असून, पुढील १५ दिवसांत प्रत्यक्ष मंदिर बांधकाम कधी सुरू करायचे, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी लवकरच अयोध्येत जाणार असून, तेथील संत-महन्तांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष भूमिपूजनाची तारीख ठरविण्यात येईल. ट्रस्टच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रामनवमी २ एप्रिल रोजी आहे. त्यादिवशी मंदिर उभारणीचे काम सुरू करावे, असाच ट्रस्टचा प्रयत्न आहे. पण तोपर्यंत सर्व औपचारिक बाबी पूर्ण झाल्या, तरच कामास प्रारंभ करता येणार आहे.

ट्रस्टचे पदाधिकारी लवकरच अयोध्येत जाणार असून, तोपर्यंत ६७ एकर जमिनीचा ताबा ट्रस्टकडे सोपविण्याचे काम उत्तर प्रदेश सरकार करेले. मशिदीसाठी जमीनही वक्फ बोर्डाकडे सोपविण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश सरकारमार्फत होणार आहे. ती जमीन वक्फ बोर्डाने स्वीकारल्यास मंदिर बांधणीत कोणतीही अडचण राहणार नाही.ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ के. परासरन यांच्या नेतृत्वाखाली हा ट्रस्ट काम करणार असला तरी अध्यक्षपद महन्त नृत्यगोपाल दास यांच्याकडे आहे. मंदिर समितीच्या अध्यक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा काम पाहतील. महासचिव म्हणून विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय यांची नियुक्ती करण्यात आली.मंदिराचे बांधकाम कधी सुरू करायचे, हे नृपेंद्र मिश्रा ठरवतील. गोविंद देवगिरी महाराजांना कोषाध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. अयोध्येतील स्टेट बँकेत ट्रस्टचे खाते सुरू करण्यात येईल. बँक खात्याचे काम गोविंद देवगिरी महाराज, चंपत राय व डॉ. अनिलकुमार मिश्रा पाहतील. ट्रस्टवर उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिनिधी म्हणून सनदी अधिकारी अवनीश अवस्थी व अयोध्येचे जिल्हाधिकारी अनुजकुमार झा यांना घेण्यात आले आहे. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून ज्ञानेश कुमार असतील.२0२४ पर्यंत मंदिर पूर्ण?या मंदिराचे काम कधीही सुरू झाले तरी ते २0२४ पर्यंत कोणत्याही स्थितीत पूर्ण व्हावे, असा ट्रस्ट प्रयत्न करेल. किंबहुना ते मंदिर तोपर्यंत बांधून पूर्ण करायचे, असेच ठरविण्यात आले आहे. लोकसभेच्या पुढील निवडणुका २0२४ मध्ये होतील. त्याआधी मंदिर झाले, तर त्याचा फायदा भाजपला मिळेल, असे त्या पक्षाच्या तसेच संघ परिवारातील मंडळींचे म्हणणे आहे. आम्ही आमची घोषणा पूर्ण केली, असे सरकारही तेव्हा सांगू शकेल.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या