शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

राम मंदिर उभारणीला १५ दिवसांत येणार वेग, २0२४ पर्यंत मंदिर पूर्ण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 05:43 IST

ट्रस्टच्या बैठकीत निर्णय : प्रत्यक्ष बांधकामाचा दिवस लवकरच ठरणार

नितीन आगरवाल 

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराठी स्थापलेल्या राम मंदिर तीर्थक्षेक्ष ट्रस्टच्या कामाला आता सुरुवात झाली असून, पुढील १५ दिवसांत प्रत्यक्ष मंदिर बांधकाम कधी सुरू करायचे, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी लवकरच अयोध्येत जाणार असून, तेथील संत-महन्तांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष भूमिपूजनाची तारीख ठरविण्यात येईल. ट्रस्टच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रामनवमी २ एप्रिल रोजी आहे. त्यादिवशी मंदिर उभारणीचे काम सुरू करावे, असाच ट्रस्टचा प्रयत्न आहे. पण तोपर्यंत सर्व औपचारिक बाबी पूर्ण झाल्या, तरच कामास प्रारंभ करता येणार आहे.

ट्रस्टचे पदाधिकारी लवकरच अयोध्येत जाणार असून, तोपर्यंत ६७ एकर जमिनीचा ताबा ट्रस्टकडे सोपविण्याचे काम उत्तर प्रदेश सरकार करेले. मशिदीसाठी जमीनही वक्फ बोर्डाकडे सोपविण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश सरकारमार्फत होणार आहे. ती जमीन वक्फ बोर्डाने स्वीकारल्यास मंदिर बांधणीत कोणतीही अडचण राहणार नाही.ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ के. परासरन यांच्या नेतृत्वाखाली हा ट्रस्ट काम करणार असला तरी अध्यक्षपद महन्त नृत्यगोपाल दास यांच्याकडे आहे. मंदिर समितीच्या अध्यक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा काम पाहतील. महासचिव म्हणून विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय यांची नियुक्ती करण्यात आली.मंदिराचे बांधकाम कधी सुरू करायचे, हे नृपेंद्र मिश्रा ठरवतील. गोविंद देवगिरी महाराजांना कोषाध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. अयोध्येतील स्टेट बँकेत ट्रस्टचे खाते सुरू करण्यात येईल. बँक खात्याचे काम गोविंद देवगिरी महाराज, चंपत राय व डॉ. अनिलकुमार मिश्रा पाहतील. ट्रस्टवर उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिनिधी म्हणून सनदी अधिकारी अवनीश अवस्थी व अयोध्येचे जिल्हाधिकारी अनुजकुमार झा यांना घेण्यात आले आहे. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून ज्ञानेश कुमार असतील.२0२४ पर्यंत मंदिर पूर्ण?या मंदिराचे काम कधीही सुरू झाले तरी ते २0२४ पर्यंत कोणत्याही स्थितीत पूर्ण व्हावे, असा ट्रस्ट प्रयत्न करेल. किंबहुना ते मंदिर तोपर्यंत बांधून पूर्ण करायचे, असेच ठरविण्यात आले आहे. लोकसभेच्या पुढील निवडणुका २0२४ मध्ये होतील. त्याआधी मंदिर झाले, तर त्याचा फायदा भाजपला मिळेल, असे त्या पक्षाच्या तसेच संघ परिवारातील मंडळींचे म्हणणे आहे. आम्ही आमची घोषणा पूर्ण केली, असे सरकारही तेव्हा सांगू शकेल.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या