शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

वर्षानुवर्षे नशिराबादकरांच्या नशिबी पाणीटंचाईचा सामना

By admin | Updated: March 11, 2016 22:26 IST

नशिराबाद- वर्षानुवर्षापासून कायमस्वरुपी स्वतंत्र पाणी योजनाच कार्यान्वित न झाल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईच झळ बसत आहेत. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती होत आहे. वाघूर धरणातून पाणी मिळूनही नियोजनाअभावी सध्या आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळत आहे. स्वातंत्र्यानंतर अवघ्या पाच वर्षातच म्हणजे सन १९५२ मध्ये मुंबई इलाख्यात पहिल्यांदाच पाणीपुरवठा योजना करणारी आदर्श ग्रामपंचायत असलेली नशिराबादची जनता आज मात्र गेल्या २५ वर्षांपासून तहानलेलीच आहे.

नशिराबाद- वर्षानुवर्षापासून कायमस्वरुपी स्वतंत्र पाणी योजनाच कार्यान्वित न झाल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईच झळ बसत आहेत. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती होत आहे. वाघूर धरणातून पाणी मिळूनही नियोजनाअभावी सध्या आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळत आहे. स्वातंत्र्यानंतर अवघ्या पाच वर्षातच म्हणजे सन १९५२ मध्ये मुंबई इलाख्यात पहिल्यांदाच पाणीपुरवठा योजना करणारी आदर्श ग्रामपंचायत असलेली नशिराबादची जनता आज मात्र गेल्या २५ वर्षांपासून तहानलेलीच आहे.
गावाला पाणीपुरवठा होणारे जलस्त्रोतांची पातळी खालावल्याने यंदा जानेवारीपासून पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. स्वतंत्र पाणी योजनाच अद्यापपर्यंत कार्यान्वित न झाल्याने दरवर्षी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसीचे थकबाकीमुळे पाणी मिळण्यास अडचणी आल्या. त्यासाठी मंत्रालयापर्यंत धावही घेण्यात आली. लवकरच एमआयडीसीचे पाणी मिळेल असे सांगण्यात येत आहे. त्याचा मुहूर्त केव्हा? हे त्यांनाच ठाऊक.
दरम्यान, गावाच्या वाढत्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडावे अशी मागणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री ना.एकनाथराव खडसे यांच्याकडे करण्यात आली होती. जिल्हाधिकारींनी त्यास मंजुरी दिल्याने वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. त्यातच विजेच्या कमी-अधिक प्रवाहामुळे विद्युत पंप जळाले. त्यामुळे टंचाईत अधिक भर पडली. ग्रामपंचायतीच्या नियोजनामुळे पाण्यासाठी भटकंती वाढली. त्यातच पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले. नवीन वीजपंप बसवून पाणीपुरवठा सुरळीत झाला. बेळी येथे स्वतंत्र वीज कनेक्शन व ट्रान्सफॉर्मर बसविण्यासंदर्भात वीज कंपनीला ग्रामपंचायतीने निवेदन दिले असून लवकरच त्यासंदर्भात काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते.
सुमारे १७ कोटी रुपयांचे जलशुध्दीकरण पाणी योजनेचे काम सुरू आहे. यंदाही शुद्ध पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे.
चौकट-
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या नशिराबादकरांना पाणीटंचाई पाचवीलाच पुजली आहे. गावातील मतदारांनी ग्राम पंचायतींपासून जिल्हा परिषदेसह केंद्रात प्रतिनिधीत्व केले आहे. असा इतिहास असताना गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

नागरिकांचे बोल-
राजकारण करु नका
नशिराबादकरांना मोठमोठे राजकीय पद मिळूनही पाणीटंचाई समस्या सोडविण्यात असमर्थ ठरले हे दुर्दैवच आहे. पाण्यासाठी राजकारण करुन नये, लोकप्रतिनिधींनी एकत्र पाणी समस्या सोडवावी, अशी अपेक्षा आहे.
-प्रा.अरुण पाटील
पाणी रे पाणी
आज नशिराबाद म्हटले की, पाणी रे पाणी असे जणू आता समीकरणच होऊ पाहत आहे. पाणीटंचाई कधी मिटेल हे देवालाच ठाऊक! पाणीप्रश्नी सर्वांनी ठाम प्रयत्न करावे हीच अपेक्षा.
-संजय देवीदास चौधरी
दिशाभूल करु नका
पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ हतबल झाले असून आता समस्या सुटली, पाणी मिळाले असे प्रकारची दिशाभूल ग्रामस्थांच करु नका, कायमस्वरुपी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावे.
-गणपत सोमा पाटील