शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

वर्षानुवर्षे नशिराबादकरांच्या नशिबी पाणीटंचाईचा सामना

By admin | Updated: March 11, 2016 22:26 IST

नशिराबाद- वर्षानुवर्षापासून कायमस्वरुपी स्वतंत्र पाणी योजनाच कार्यान्वित न झाल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईच झळ बसत आहेत. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती होत आहे. वाघूर धरणातून पाणी मिळूनही नियोजनाअभावी सध्या आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळत आहे. स्वातंत्र्यानंतर अवघ्या पाच वर्षातच म्हणजे सन १९५२ मध्ये मुंबई इलाख्यात पहिल्यांदाच पाणीपुरवठा योजना करणारी आदर्श ग्रामपंचायत असलेली नशिराबादची जनता आज मात्र गेल्या २५ वर्षांपासून तहानलेलीच आहे.

नशिराबाद- वर्षानुवर्षापासून कायमस्वरुपी स्वतंत्र पाणी योजनाच कार्यान्वित न झाल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईच झळ बसत आहेत. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती होत आहे. वाघूर धरणातून पाणी मिळूनही नियोजनाअभावी सध्या आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळत आहे. स्वातंत्र्यानंतर अवघ्या पाच वर्षातच म्हणजे सन १९५२ मध्ये मुंबई इलाख्यात पहिल्यांदाच पाणीपुरवठा योजना करणारी आदर्श ग्रामपंचायत असलेली नशिराबादची जनता आज मात्र गेल्या २५ वर्षांपासून तहानलेलीच आहे.
गावाला पाणीपुरवठा होणारे जलस्त्रोतांची पातळी खालावल्याने यंदा जानेवारीपासून पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. स्वतंत्र पाणी योजनाच अद्यापपर्यंत कार्यान्वित न झाल्याने दरवर्षी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसीचे थकबाकीमुळे पाणी मिळण्यास अडचणी आल्या. त्यासाठी मंत्रालयापर्यंत धावही घेण्यात आली. लवकरच एमआयडीसीचे पाणी मिळेल असे सांगण्यात येत आहे. त्याचा मुहूर्त केव्हा? हे त्यांनाच ठाऊक.
दरम्यान, गावाच्या वाढत्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडावे अशी मागणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री ना.एकनाथराव खडसे यांच्याकडे करण्यात आली होती. जिल्हाधिकारींनी त्यास मंजुरी दिल्याने वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. त्यातच विजेच्या कमी-अधिक प्रवाहामुळे विद्युत पंप जळाले. त्यामुळे टंचाईत अधिक भर पडली. ग्रामपंचायतीच्या नियोजनामुळे पाण्यासाठी भटकंती वाढली. त्यातच पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले. नवीन वीजपंप बसवून पाणीपुरवठा सुरळीत झाला. बेळी येथे स्वतंत्र वीज कनेक्शन व ट्रान्सफॉर्मर बसविण्यासंदर्भात वीज कंपनीला ग्रामपंचायतीने निवेदन दिले असून लवकरच त्यासंदर्भात काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते.
सुमारे १७ कोटी रुपयांचे जलशुध्दीकरण पाणी योजनेचे काम सुरू आहे. यंदाही शुद्ध पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे.
चौकट-
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या नशिराबादकरांना पाणीटंचाई पाचवीलाच पुजली आहे. गावातील मतदारांनी ग्राम पंचायतींपासून जिल्हा परिषदेसह केंद्रात प्रतिनिधीत्व केले आहे. असा इतिहास असताना गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

नागरिकांचे बोल-
राजकारण करु नका
नशिराबादकरांना मोठमोठे राजकीय पद मिळूनही पाणीटंचाई समस्या सोडविण्यात असमर्थ ठरले हे दुर्दैवच आहे. पाण्यासाठी राजकारण करुन नये, लोकप्रतिनिधींनी एकत्र पाणी समस्या सोडवावी, अशी अपेक्षा आहे.
-प्रा.अरुण पाटील
पाणी रे पाणी
आज नशिराबाद म्हटले की, पाणी रे पाणी असे जणू आता समीकरणच होऊ पाहत आहे. पाणीटंचाई कधी मिटेल हे देवालाच ठाऊक! पाणीप्रश्नी सर्वांनी ठाम प्रयत्न करावे हीच अपेक्षा.
-संजय देवीदास चौधरी
दिशाभूल करु नका
पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ हतबल झाले असून आता समस्या सुटली, पाणी मिळाले असे प्रकारची दिशाभूल ग्रामस्थांच करु नका, कायमस्वरुपी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावे.
-गणपत सोमा पाटील