शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

धक्कादायक! मोदी सरकारच्या काळात 2.8 कोटी ग्रामीण महिलांनी गमावल्या नोकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 13:46 IST

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली-  राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्षं 2004-05मध्ये पाच कोटी ग्रामीण महिलांनानोकरी गमवावी लागली होती. 2011-12नंतर महिला सहभागामध्ये 7 टक्क्यांची घट झाली असून, जवळपास 2.8 कोटी महिला नोकरीच्या शोधात असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयानं केलेल्या (PLFS) 2017-18च्या रिपोर्टनुसार, 15 ते 59 वर्षांच्या मधील महिलांमध्ये नोकरी गमावण्याचं प्रमाण अधिक आहे. ग्रामीण महिलांची भागीदारी 2004-05मध्ये 49.5 टक्क्यांहून कमी होऊन 2011-12मध्ये 35.8 टक्के आहे. 2017-18मध्ये ती संख्या घटून 24.6 टक्क्यांवर आली आहे. 2004-05मध्ये महिलांचं काम करण्याचं वय कमी झालेलं आहे.नाव न छापण्याच्या अटीवर एका तज्ज्ञानंही यासंदर्भात माहिती दिली आहे. शिक्षण क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे. परंतु सांस्कृतिक क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे महिलांच्या नोकऱ्यांमध्ये कमी आलेली आहे. 2017-18च्या सहा वर्षांत महिलांचा सहभाग 0.4 टक्क्यानं वाढला आहे. नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांमध्ये 12 लाख महिलांचा समावेश आहे.2011-12 आणि 2017-18मध्ये ग्रामीण भारतात जवळपास 3.2 कोटी मजुरांनी नोकऱ्या गमावल्या आहेत, जे गेल्या सर्वेक्षणामध्ये 29.2 टक्के होती. नोकरी गमावणाऱ्या लोकांमध्ये जवळपास 3 कोटी शेतकरी आहेत. एनएसएसओद्वारा जारी पीरियोडिक लेबर फोर्स सर्व्हे(पीएलएफएस) 2017-18ची एक रिपोर्टनुसार, 2011-12मध्ये शेती करणाऱ्यांमध्येही 40 टक्के घट नोंदवली गेली आहे.  

टॅग्स :Womenमहिलाjobनोकरी