शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दोन शालेय विद्यार्थी रातोरात बनले करोडपती; एकाच्या बँक खात्यात 900 कोटी तर दुसऱ्याच्या 60 कोटींपेक्षा जास्त रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 10:02 IST

over 900 crore deposited in bank accounts of 2 boys : ज्या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा झाले आहे. ती दोन्ही मुले आजमनगर पोलीस ठाण्याच्या बाघोरा पंचायतीमध्ये असलेल्या पस्टिया गावातील रहिवासी आहेत.

पटना :  बिहारमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लोकांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरूच आहे. येथील खगरियामध्ये एका तरुणाच्या बँक खात्यात साडेपाच लाख रुपये जमा झाल्याचे प्रकरण अजून संपलेले नाही, तोपर्यंत आणखी एक नवीन प्रकरण समोर आले आहे. जिल्ह्यातील दोन शालेय विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये 960 कोटी रुपये आले आहेत. दोन बँक खात्यांमध्ये 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाहिल्यानंतर बँक अधिकाऱ्यांना सुद्धा काहीही समजले नाही. (over 900 crore deposited in bank accounts of 2 boys in bihar)

सरकारी किंवा बँक अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणानंतर, लोक त्यांचे खाते तपासण्यासाठी बँक किंवा सीएसपी सेंटर गाठत आहेत. बँका आणि सीएसपी सेंटरबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हे पैसे त्यांच्या खात्यात आल्याची भीती काही लोकांना आहे. तर 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. यावरून काही लोक मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. तसेच, या घोषणेचे पैसे आता मिळत आहेत का? हे पाहण्यासाठी लोक आपल्या बँक खात्याची माहिती घेत आहेत.

ज्या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा झाले आहे. ती दोन्ही मुले आजमनगर पोलीस ठाण्याच्या बाघोरा पंचायतीमध्ये असलेल्या पस्टिया गावातील रहिवासी आहेत. दरम्यान, बिहारमधील शालेय विद्यार्थ्यांना युनिफॉर्मसाठी राज्य सरकारकडून पैसे दिले जातात. हे पैसे थेट मुलांच्या बँक खात्यात जमा होतात. गुरुचंद्र विश्वास आणि असित कुमार हे बँक खात्यातील युनिफॉर्मच्या पैशांची चौकशी करण्यासाठी सीएसपी सेंटरमध्ये गेले होते.

यावेळी दोघांना समजले की त्यांच्या बँक खात्यांमध्ये  कोट्यावधी रुपये जमा आहेत. हे ऐकून मुलांना धक्का बसला आणि तिथे उपस्थित इतरांनाही धक्का बसला. विद्यार्थी असित कुमारच्या 1008151030208001 या बँक खात्यात 900 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाले. तर गुरुचंद्र विश्वास याच्या 1008151030208081 या बँक खात्यामध्ये 60 कोटींपेक्षा रक्कम जमा झाली आहे. दोन्ही खाती उत्तर बिहार ग्रामीण बँक भेलागंज शाखेची आहेत.

दरम्यान,  ग्रामीण बँकेच्या भेलागंजचे शाखा व्यवस्थापक मनोज गुप्ता देखील मुलांच्या खात्यातील बॅलन्स पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांनी दोन्ही मुलांच्या खात्यातून लगेच पैसे भरणे बंद केले आणि खाती गोठवताना ते म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :Biharबिहार