शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

...तर तब्बल 50 कोटी मोबाईल नंबर बंद होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 09:03 IST

सरकारकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू

मुंबई: खासगी कंपन्यांना आधार क्रमांक देण्याची गरज नाही, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालायानं काही दिवसांपूर्वी दिला. यामुळे मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. देशातील कोट्यवधी ग्राहकांनी सिम कार्ड घेताना आधार कार्ड क्रमांक दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कंपन्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. केवळ आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतलेल्या तब्बल 50 कोटी ग्राहकांची सेवा खंडित केली जाऊ शकते. टाईम्स ऑफ इंडियानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.खासगी क्षेत्रातील कंपन्यांना आधार कार्ड क्रमांक देण्याची गरज नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी दिला. त्यामुळे आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतलेल्या ग्राहकांचं करायचं काय, असा प्रश्न कंपन्यांसमोर आहे. केवळ आधार कार्ड देऊन घेतलेल्या मोबाईल क्रमांकांची संख्या 50 कोटी इतकी आहे. हे सर्व मोबाईल क्रमांक बंद झाल्यास त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे याबद्दल उच्च स्तरावर चर्चा सुरू आहे. या ग्राहकांना नवीन कागदपत्रं जमा करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल, असे संकेत सरकारकडून देण्यात आले.काल दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी मोबाईल कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. याशिवाय दूरसंचार विभागानं यूनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरटी ऑफ इंडियाशी चर्चा करुन या प्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. सरकारला मोबाईल ग्राहकांची चिंता असल्यानं लवकरच यातून मार्ग काढला जाईल, अशी माहिती अरुणा सुंदरराजन यांनी दिली. आधार क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेणाऱ्यांमध्ये रिलायन्स जिओच्या ग्राहकांचं प्रमाण सर्वाधित आहे. जिओनं सप्टेंबर 2016 मध्ये सेवा देण्यास सुरुवात केली होती.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डMobileमोबाइल