शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
3
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
4
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
5
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
8
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
9
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
10
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
11
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
12
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
13
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
14
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
15
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
16
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
17
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
18
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
19
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
20
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा

भारतात परतण्यासाठी ५ लाखांवर केरळी नागरिकांनी केली नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 3:42 AM

भारतात येऊ इच्छिणाऱ्या लोकांनी नाव नोंदणी करावी म्हणून केरळ सरकारने वेबसाईट सुरू केल्यानंतर अवघ्या बारा तासांतच हा प्रतिसाद लाभला आहे.

तिरुअनंतपुरम : विदेशात नोकरी- व्यवसायासाठी गेलेल्या केरळच्या मूळ रहिवाशांपैकी ५ लाखांहून अधिक लोकांनी भारतात पुन्हा येण्याची तयारी दर्शविली आहे. ‘कोविड-१९’चा जोर कमी होऊन विमानसेवेला प्रारंभहोताच, भारतात येऊ इच्छिणाऱ्या लोकांनी नाव नोंदणी करावी म्हणून केरळ सरकारने वेबसाईट सुरू केल्यानंतर अवघ्या बारा तासांतच हा प्रतिसाद लाभला आहे.भारतात परत येऊ इच्छिणाऱ्यांमध्ये मध्य पूर्वेतील देशांत राहणाºया केरळी नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातही संयुक्त अरब अमिरातीतील केरळींची संख्या लक्षणीय आहे. केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेनंतर केरळ सरकारने अशा लोकांच्या नावनोंदणीसाठी वेबसाईट सुरू केली.विविध राज्यांतील नागरिक विदेशांत नोकरी, व्यवसायासाठी गेले आहेत. त्यातील किती लोक परत येऊ इच्छितात याची माहिती घ्यावी, असा आदेश केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना दिला होता. यासंदर्भात केरळने सुरू केलेल्या प्रयत्नांची कॅबिनेट सचिवांनी प्रशंसा केली व केरळचे अनुकरण अन्य राज्यांनी करावे, असे नमूद केले.केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, विमानसेवा पुन्हा सुरू होताच विदेशातून केरळी नागरिक राज्यात परत येऊ लागले की, त्यांच्यापैकी ज्यांना ‘कोविड’सदृश लक्षणे जाणवत असतील त्यांना रुग्णालयात क्वारंटाइन केले जाईल. ज्यांना ही लक्षणे जाणवत नाहीत त्यांना घरीच क्वारंटाइन ठेवण्यात येईल. केरळमधील विविध होस्टेल, हॉटेल, खासगी रुग्णालये तसेच हाऊसबोटमध्ये क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात येणार आहे.>२५ लाख केरळीविदेशात स्थलांतरितकेरळमधून सुमारे पंचवीस लाख नागरिक विदेशात नोकरी-व्यवसायासाठी गेले आहेत. त्यातील ९० टक्के लोक हे मध्य पूर्वेतील देशांमध्ये आहेत. लोक विमानसेवा सुरू होताच त्यांच्यापैकी भारतात परत येणाºयांचे प्रमाण लक्षणीय असेल. आतापर्यंत ५लाखांहून अधिक लोकांनी केरळ सरकारच्या वेबसाईटवर आपली नावे नोंदविली आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या