शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

भारतात परतण्यासाठी ५ लाखांवर केरळी नागरिकांनी केली नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 03:43 IST

भारतात येऊ इच्छिणाऱ्या लोकांनी नाव नोंदणी करावी म्हणून केरळ सरकारने वेबसाईट सुरू केल्यानंतर अवघ्या बारा तासांतच हा प्रतिसाद लाभला आहे.

तिरुअनंतपुरम : विदेशात नोकरी- व्यवसायासाठी गेलेल्या केरळच्या मूळ रहिवाशांपैकी ५ लाखांहून अधिक लोकांनी भारतात पुन्हा येण्याची तयारी दर्शविली आहे. ‘कोविड-१९’चा जोर कमी होऊन विमानसेवेला प्रारंभहोताच, भारतात येऊ इच्छिणाऱ्या लोकांनी नाव नोंदणी करावी म्हणून केरळ सरकारने वेबसाईट सुरू केल्यानंतर अवघ्या बारा तासांतच हा प्रतिसाद लाभला आहे.भारतात परत येऊ इच्छिणाऱ्यांमध्ये मध्य पूर्वेतील देशांत राहणाºया केरळी नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातही संयुक्त अरब अमिरातीतील केरळींची संख्या लक्षणीय आहे. केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेनंतर केरळ सरकारने अशा लोकांच्या नावनोंदणीसाठी वेबसाईट सुरू केली.विविध राज्यांतील नागरिक विदेशांत नोकरी, व्यवसायासाठी गेले आहेत. त्यातील किती लोक परत येऊ इच्छितात याची माहिती घ्यावी, असा आदेश केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना दिला होता. यासंदर्भात केरळने सुरू केलेल्या प्रयत्नांची कॅबिनेट सचिवांनी प्रशंसा केली व केरळचे अनुकरण अन्य राज्यांनी करावे, असे नमूद केले.केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, विमानसेवा पुन्हा सुरू होताच विदेशातून केरळी नागरिक राज्यात परत येऊ लागले की, त्यांच्यापैकी ज्यांना ‘कोविड’सदृश लक्षणे जाणवत असतील त्यांना रुग्णालयात क्वारंटाइन केले जाईल. ज्यांना ही लक्षणे जाणवत नाहीत त्यांना घरीच क्वारंटाइन ठेवण्यात येईल. केरळमधील विविध होस्टेल, हॉटेल, खासगी रुग्णालये तसेच हाऊसबोटमध्ये क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात येणार आहे.>२५ लाख केरळीविदेशात स्थलांतरितकेरळमधून सुमारे पंचवीस लाख नागरिक विदेशात नोकरी-व्यवसायासाठी गेले आहेत. त्यातील ९० टक्के लोक हे मध्य पूर्वेतील देशांमध्ये आहेत. लोक विमानसेवा सुरू होताच त्यांच्यापैकी भारतात परत येणाºयांचे प्रमाण लक्षणीय असेल. आतापर्यंत ५लाखांहून अधिक लोकांनी केरळ सरकारच्या वेबसाईटवर आपली नावे नोंदविली आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या