शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

भारतात परतण्यासाठी ५ लाखांवर केरळी नागरिकांनी केली नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 03:43 IST

भारतात येऊ इच्छिणाऱ्या लोकांनी नाव नोंदणी करावी म्हणून केरळ सरकारने वेबसाईट सुरू केल्यानंतर अवघ्या बारा तासांतच हा प्रतिसाद लाभला आहे.

तिरुअनंतपुरम : विदेशात नोकरी- व्यवसायासाठी गेलेल्या केरळच्या मूळ रहिवाशांपैकी ५ लाखांहून अधिक लोकांनी भारतात पुन्हा येण्याची तयारी दर्शविली आहे. ‘कोविड-१९’चा जोर कमी होऊन विमानसेवेला प्रारंभहोताच, भारतात येऊ इच्छिणाऱ्या लोकांनी नाव नोंदणी करावी म्हणून केरळ सरकारने वेबसाईट सुरू केल्यानंतर अवघ्या बारा तासांतच हा प्रतिसाद लाभला आहे.भारतात परत येऊ इच्छिणाऱ्यांमध्ये मध्य पूर्वेतील देशांत राहणाºया केरळी नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातही संयुक्त अरब अमिरातीतील केरळींची संख्या लक्षणीय आहे. केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेनंतर केरळ सरकारने अशा लोकांच्या नावनोंदणीसाठी वेबसाईट सुरू केली.विविध राज्यांतील नागरिक विदेशांत नोकरी, व्यवसायासाठी गेले आहेत. त्यातील किती लोक परत येऊ इच्छितात याची माहिती घ्यावी, असा आदेश केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना दिला होता. यासंदर्भात केरळने सुरू केलेल्या प्रयत्नांची कॅबिनेट सचिवांनी प्रशंसा केली व केरळचे अनुकरण अन्य राज्यांनी करावे, असे नमूद केले.केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, विमानसेवा पुन्हा सुरू होताच विदेशातून केरळी नागरिक राज्यात परत येऊ लागले की, त्यांच्यापैकी ज्यांना ‘कोविड’सदृश लक्षणे जाणवत असतील त्यांना रुग्णालयात क्वारंटाइन केले जाईल. ज्यांना ही लक्षणे जाणवत नाहीत त्यांना घरीच क्वारंटाइन ठेवण्यात येईल. केरळमधील विविध होस्टेल, हॉटेल, खासगी रुग्णालये तसेच हाऊसबोटमध्ये क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात येणार आहे.>२५ लाख केरळीविदेशात स्थलांतरितकेरळमधून सुमारे पंचवीस लाख नागरिक विदेशात नोकरी-व्यवसायासाठी गेले आहेत. त्यातील ९० टक्के लोक हे मध्य पूर्वेतील देशांमध्ये आहेत. लोक विमानसेवा सुरू होताच त्यांच्यापैकी भारतात परत येणाºयांचे प्रमाण लक्षणीय असेल. आतापर्यंत ५लाखांहून अधिक लोकांनी केरळ सरकारच्या वेबसाईटवर आपली नावे नोंदविली आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या