शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

तामिळनाडूत जातीची भिंत कोसळली, 400 दलितांनी स्वीकारला इस्लाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 13:35 IST

तामिळनाडूतल्या कोईम्बतूर जिल्ह्यात जवळपास 400 दलितांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चेन्नईः तामिळनाडूतल्या कोईम्बतूर जिल्ह्यात जवळपास 400 दलितांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तमीळ पुलिगल काची नावाच्या एक दलित संघटनेनं हा दावा केला आहे. संघटनेच्या माहितीनुसार, 5 जानेवारीनंतर जवळपास 40 कुटुंबीयांचं धर्मांतर करण्यात आलं असून, ही प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे. दलितांनी अचानक एवढ्या मोठ्या संख्येनं धर्मांतर करण्याच्या मागे भिंत कोसळल्याचं कारण देण्यात येत आहे, ज्यात 17 जणांचा मृत्यू झाला होता. दलित ग्रामवासीयांच्या मते, त्यांच्या समुदायाला कमीपणा दाखवण्यासाठी ती भिंत बांधण्यात आली होती.  इस्लाम स्वीकारणाऱ्या दलितांनी प्रतिज्ञापत्रात सांगितलं की, आमच्या इच्छेनुसार हे धर्मांतर केलं जात आहे. CNN-News18च्या हाती लागलेल्या प्रतिज्ञापत्रात लिहिलेलं आहे की, गेल्या तीन वर्षांपासून इस्लाम धर्मानं आम्ही प्रेरित होतो. आता मी इस्लामचे धार्मिक कायदे आणि सिद्धांतांच्या कारणास्तव धर्माचं पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणा दुसऱ्याच्या सांगण्यावरून मी हा निर्णय घेतलेला नाही. आम्ही प्रामाणिकपणे इस्लाम धर्म स्वीकारत आहोत. तसेच स्वेच्छेनं मुस्लिम नावं स्वीकारत आहोत. जे लोक कायद्यानुसार धर्मांतर करत आहेत, त्यांना पोलिसांकडून धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जण धर्मांतरबाबत उघड उघड बोलत नाहीत. तसेच काही जण धर्म परिवर्तन केल्याचं स्वीकारणास धजावत आहेत. तमीळ पुलिगल काचीच्या सदस्यांनी सांगितलं की, आमच्यासोबत वारंवार भेदभाव, हल्ला आणि अपमान होतो आहे. आम्हाला अस्पृश्य समजलं जात आहे. आम्हाला मंदिरात प्रवेश करणं आणि दुसऱ्यांसोबत दुकानात चहा प्यायण्याची परवानगी नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घोषणा करण्यात आली होती की, जिल्ह्यात 3,000 लोक जानेवारी 2020पर्यंत इस्लाम धर्म स्वीकारतील. दलितांच्या या भूमिकेमुळे ग्रामीण भागातील एक वर्ग नाराज आहे.