शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

नऊ महिन्यात पाकिस्तानकडून 2050 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारताचं चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 15:45 IST

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांचं चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली: सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार केला जात आहे. भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून दररोज सुरू आहे. या वर्षात पाकिस्ताननं 2050 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. यामध्ये 21 भारतीयांना प्राण गमवावा लागला. पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं रविवार एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं. पाकिस्ताननं आपल्या सुरक्षा दलांना शस्त्रसंधीचं पालन करण्याच्या सूचना द्याव्यात, असं भारतानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. पाकिस्ताननं नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शांतता राखावी, असं आवाहन भारताकडून करण्यात आलं आहे. भारताकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला जशास तसं उत्तर दिलं जात आहे. याशिवाय पाकिस्तानी सैन्याच्या मदतीनं होणारी घुसखोरी रोखण्याचे प्रयत्नदेखील सुरू आहेत. याआधी दहशतवाद्याच्या मुद्द्यावरुन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तावर टीकास्त्र सोडलं होतं. पाकिस्ताननं दहशतवादाला लगाम घालावा. अन्यथा देशाचे तुकडे होतील आणि त्याला कोणीही रोखू शकणार नाही, असा इशारा राजनाथ यांनी दिला. भारतात अल्पसंख्यांक सुरक्षित होते, सुरक्षित राहतील आणि यापुढेही सुरक्षित राहतील. भारत धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडत नाहीत, असंदेखील ते पुढे म्हणाले. काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय पाकिस्तानला पचवता आलेला नाही. त्यामुळे सध्या पाकिस्तान संयुक्त राष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असंदेखील सिंह यांनी म्हटलं.  

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPakistanपाकिस्तानIndiaभारत