शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

नऊ महिन्यात पाकिस्तानकडून 2050 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारताचं चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 15:45 IST

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांचं चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली: सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार केला जात आहे. भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून दररोज सुरू आहे. या वर्षात पाकिस्ताननं 2050 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. यामध्ये 21 भारतीयांना प्राण गमवावा लागला. पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं रविवार एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं. पाकिस्ताननं आपल्या सुरक्षा दलांना शस्त्रसंधीचं पालन करण्याच्या सूचना द्याव्यात, असं भारतानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. पाकिस्ताननं नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शांतता राखावी, असं आवाहन भारताकडून करण्यात आलं आहे. भारताकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला जशास तसं उत्तर दिलं जात आहे. याशिवाय पाकिस्तानी सैन्याच्या मदतीनं होणारी घुसखोरी रोखण्याचे प्रयत्नदेखील सुरू आहेत. याआधी दहशतवाद्याच्या मुद्द्यावरुन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तावर टीकास्त्र सोडलं होतं. पाकिस्ताननं दहशतवादाला लगाम घालावा. अन्यथा देशाचे तुकडे होतील आणि त्याला कोणीही रोखू शकणार नाही, असा इशारा राजनाथ यांनी दिला. भारतात अल्पसंख्यांक सुरक्षित होते, सुरक्षित राहतील आणि यापुढेही सुरक्षित राहतील. भारत धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडत नाहीत, असंदेखील ते पुढे म्हणाले. काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय पाकिस्तानला पचवता आलेला नाही. त्यामुळे सध्या पाकिस्तान संयुक्त राष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असंदेखील सिंह यांनी म्हटलं.  

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPakistanपाकिस्तानIndiaभारत