शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

फक्त एका वर्षात हवा प्रदूषणामुळे भारतात 14 लाख लोकांचा मृत्यू

By admin | Updated: September 9, 2016 08:07 IST

भारतामध्ये 2013 साली हवा प्रदूषणामुळे तब्बल 14 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर चीनमध्ये 16 लाख लोकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे.

- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - भारतामध्ये 2013 साली हवा प्रदूषणामुळे तब्बल 14 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर चीनमध्ये 16 लाख लोकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. वर्ल्ड बँक, इन्सिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युएशन यांनी संयुक्तरित्या प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
 
हवा प्रदुषणामुळे झालेल्या वेगवेगळ्या आजारांमुळे जगभरात 2013 साली एकूण 50 लाख लोकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती या अहवालात देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामधील 60 टक्के मृत्यू सर्वात जास्त लोकसंख्या असणा-या चीन आणि भारतात झाले आहेत. हवा प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, स्ट्रोक, ह्रद्याचे आजार होतात, ज्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे.
 
भारत आणि चीनला लोकसंख्या जास्त असल्याचा फटका बसला आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. 1 लाख लोकांच्या मागे मृत्यूचं प्रमाण पाहिल्यास जगभरातील देशांमध्ये चीन सहाव्या तर भारत चौथ्या क्रमांकावर आहे. सोबतच बांगलादेश 11, श्रीलंका 12 आणि पाकिस्तान 15व्या क्रमांकावर आहे.