शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

"आमची कन्हैया तोफ ‘एनडीए’च्या नेत्यांना लोळवणार, बिहारमध्ये आता महाआघाडीचे सरकार येणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 07:09 IST

भाजपचा आलेख हा सतत घसरत आहे. यावेळी बिहारही त्यांच्या हातून जाईल आणि महाआघाडीचे सरकार येईल असा दावा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि मंडळ सदस्य भालचंद्र कानगो यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

विकास झाडे

नवी दिल्ली : नितीशकुमार यांनी बिहारमध्ये पंधरा वर्षांत कोणती विकासकामे केलीत? असा प्रश्न त्यांना मतदार विचारत आहेत. मान खाली घालण्याशिवाय त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नाही. दुसरीकडे २०१९ पासून भाजप कुठेही स्वबळावर सरकार स्थापन करू शकले नाही. भाजपचा आलेख हा सतत घसरत आहे. यावेळी बिहारही त्यांच्या हातून जाईल आणि महाआघाडीचे सरकार येईल असा दावा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि मंडळ सदस्य भालचंद्र कानगो यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

कानगो म्हणाले, निव्वळ पैसा ओतून निवडणूक जिंकता येते हे समीकरण महाविकास आघाडी यंदा बिहारच्या निवडणुकीत बदलणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सीपीएम आणि सीपीएमएल मिळून महाआघाडीसोबत २९ जागांवर मैदानात आहे. बिहारमधील कन्हैयाकुमार, अतुलकुमार अंजान, अमरजित कौर यांच्यासारखे नेते बिहारमधील सभा गाजवीत आहेत.

आमचा एकटा कन्हैयाकुमार भाजपला भारी पडणारा आहे. भाजप नितीशकुमारांचे उमेदवार कसे पडतील याचे डावपेच आखत आहे. लोजपाला याकामासाठीच भाजपने स्वतंत्र केले आहे. यात नितीशकुमार यांना फटका तर बसणारच आहे; परंतु भाजपचेही उमेदवार पराभूत होतील.

भाजपची ‘जादू’ नाही : कानगो म्हणाले, दिल्ली, मध्यप्रदेश, हरियाणा, गोवा, मणिपूर, राजस्थान आदी राज्यांत भाजपला किती जागा मिळाल्या हे बघितले तर भाजपची जादू आता उरली नाही. बिहार भाजपच्या ताब्यात यावा म्हणून नितीशकुमारांविरोधात छुपा अजेंडा राबविला जात आहे. नितीशकुमारही यात मागे नाहीत. त्यांच्याकडूनही भाजपचे उमेदवार पाडण्याचे प्रयत्न होतील.

बिहारमध्ये श्रमिकांच्या हाताला काम नाही. आरोग्यसेवा संपूर्ण ढासळली आहे. लोक उपचाराविना मरताहेत. स्थलांतरित मजुरांना बिहार सरकार रोजगार देऊ शकले नाही. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकkanhaiya kumarकन्हैय्या कुमारBiharबिहारElectionनिवडणूक