शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

"राहुल गांधींसारखे नेते विरोधी पक्षात राहिले तर आमचं काम सोपं आहे," योगी आदित्यनाथांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 23:19 IST

योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींना टोला लगावत काँग्रेसला इशाराही दिला आहे.

संसदेचं कामकाज सुरळीत न चालू दिल्याचं म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. “विरोधक नकारात्मक विचाराने काम करत आहेत. अफवा आणि खोट्या प्रचाराला ते माध्यम बनवतायत. त्यांचा देशासाठी कोणताही अजेंडा नाही. निहित स्वार्थासाठी आरोप-प्रत्यारोप करणे हे विरोधकांचे काम आहे, त्यामुळे ते संसदेत व्यत्यय आणतात आणि कोणत्याही कार्यक्रमापूर्वी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात,” असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला. दरम्यान, त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. जोपर्यंत त्यांच्यासारखे नेते विरोधी पक्षात राहतील तोपर्यंत आमचं काम सोपं होईल, असंही ते म्हणाले. 

राहुल गांधींसारखा नेता जोपर्यंत विरोधी पक्षात राहिल, तोपर्यंत आमचे काम सोपे होते. ते भाजपसाठी अनुकूल वातावरण तयार करतात असं प्रत्येक जण म्हणतो,” असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. टाईम्स नाऊला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांन यावर भाष्य केलं. भारत जोडो यात्रेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, “आम्ही जेव्हा यात्रा काढली तेव्हा त्याचा एक उद्देश होता. त्याची संपूर्ण माहिती आम्ही मांडली होती. भारत जोडो यात्रेचा उद्देश काय आहे आणि याद्वारे ते देशातील जनतेला काय सांगू इच्छितात हे खुद्द राहुलजींनाच माहीत नव्हते? हा त्यांच्या पक्षाचा स्वतःचा अजेंडा आहे. पक्ष आपले काम करत आहे.”

नकारात्मकता पसरवण्याचा आरोपकाँग्रेसवर नकारात्मकता पसरवून देशातील जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत काँग्रेससारख्या मोठ्या पक्षानं नकारात्मकता पसरवून देशाची प्रतिमा डागाळण्यासारख्या गोष्टी करण्यापासून दूर राहावं, असं ते म्हणाले. काँग्रेसनं हे केले नाही तर त्यांच्यासमोरही अस्तित्वाचं संकट उभं राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा