शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

"राहुल गांधींसारखे नेते विरोधी पक्षात राहिले तर आमचं काम सोपं आहे," योगी आदित्यनाथांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 23:19 IST

योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींना टोला लगावत काँग्रेसला इशाराही दिला आहे.

संसदेचं कामकाज सुरळीत न चालू दिल्याचं म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. “विरोधक नकारात्मक विचाराने काम करत आहेत. अफवा आणि खोट्या प्रचाराला ते माध्यम बनवतायत. त्यांचा देशासाठी कोणताही अजेंडा नाही. निहित स्वार्थासाठी आरोप-प्रत्यारोप करणे हे विरोधकांचे काम आहे, त्यामुळे ते संसदेत व्यत्यय आणतात आणि कोणत्याही कार्यक्रमापूर्वी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात,” असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला. दरम्यान, त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. जोपर्यंत त्यांच्यासारखे नेते विरोधी पक्षात राहतील तोपर्यंत आमचं काम सोपं होईल, असंही ते म्हणाले. 

राहुल गांधींसारखा नेता जोपर्यंत विरोधी पक्षात राहिल, तोपर्यंत आमचे काम सोपे होते. ते भाजपसाठी अनुकूल वातावरण तयार करतात असं प्रत्येक जण म्हणतो,” असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. टाईम्स नाऊला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांन यावर भाष्य केलं. भारत जोडो यात्रेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, “आम्ही जेव्हा यात्रा काढली तेव्हा त्याचा एक उद्देश होता. त्याची संपूर्ण माहिती आम्ही मांडली होती. भारत जोडो यात्रेचा उद्देश काय आहे आणि याद्वारे ते देशातील जनतेला काय सांगू इच्छितात हे खुद्द राहुलजींनाच माहीत नव्हते? हा त्यांच्या पक्षाचा स्वतःचा अजेंडा आहे. पक्ष आपले काम करत आहे.”

नकारात्मकता पसरवण्याचा आरोपकाँग्रेसवर नकारात्मकता पसरवून देशातील जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत काँग्रेससारख्या मोठ्या पक्षानं नकारात्मकता पसरवून देशाची प्रतिमा डागाळण्यासारख्या गोष्टी करण्यापासून दूर राहावं, असं ते म्हणाले. काँग्रेसनं हे केले नाही तर त्यांच्यासमोरही अस्तित्वाचं संकट उभं राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा