शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

केजरीवालांच्या अटकेविरुद्ध आपचा सामूहिक उपवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 05:55 IST

देश-विदेशात केले शक्तिप्रदर्शन; आपला संपविण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : ‘जेल के ताले तुटेंगे, अरविंद केजरीवाल छुटेंगे,’ अशी घोषणा देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ रविवारी सत्ताधारी आपच्या समर्थकांनी देशभरात तसेच जगभरात अनेक ठिकाणी सामूहिक उपवासाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करीत केंद्रातील सरकारविरुद्ध निषेध आंदोलन छेडले. गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे  ईडी, सीबीआय, आयकर विभाग या संस्थांनी भाजपविरुद्ध काहीही पाहणार नाही, ऐकणार नाही आणि बोलणार नसल्याचे ठरवून टाकले आहे, अशी टीका आप नेते जस्मीन शहा यांनी केली. 

दिवसभर सामूहिक उपवासाचे आंदोलन करीत आपने केंद्रावरील दबाव कायम ठेवला. गेल्या २१ मार्चपासून तुरुंगात अटकेत असलेले केजरीवाल यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या समर्थकांना रविवारी सामूहिक ठेवण्याचे आवाहन आम आदमी पार्टीने केले होते. या आवाहनांतर्गत आपचे कार्यकर्ते सामूहिक उपवासावर गेले.

भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी उपवासआम आदमी पार्टी कट्टर बेईमान असून, भ्रष्टांना पाठीशी घालण्यासाठी सामूहिक उपवास करीत असल्याचा आरोप भाजपने केला. भाजपनेही आज दिल्लीचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या नेतृत्वाखाली पालिका बाजारासह ठिकठिकाणी ‘शराब से शीशमहल’ अशा घोषणा देत धरणेे दिले.

कारस्थान का रचले?ईडीच्या मनी लाँड्रिंग आरोपात तिहार तुरुंगात सहा महिन्यांचा कारावास भोगल्यानंतर जामिनावर सुटलेले संजय सिंह यांनी केंद्र सरकारचा आक्रमक शब्दात समाचार घेतला. सिसोदिया, संजय सिंह आणि केजरीवाल यांनी घोटाळे केले म्हणून त्यांना अटक करण्यात आली असे भाजप नेते म्हणत होते. पण, आता वस्तुस्थिती समोर येत असून, आपला संपविण्यासाठीच भाजपने हे कारस्थान रचल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोप दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी केला. अजित पवार, अशोक चव्हाण, छगन भुजबळ यांच्यावर स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप लावून आता त्यांचाच बचाव करणार्यांचे दुटप्पी व्यक्तिमत्त्व उघड झाले आहे, अशी टीका राय यांनी केली. यावेळी सर्वच नेत्यांनी  भाजपच्या हुकूमशाही कारभारावर कोरडे ओढले.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल