शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 19:24 IST

Shashi Tharoor on Donald Trump 50% Tariff: 'इथे २०० वर्षापूर्वीची राजेशाही व्यवस्था सुरू नाहीये. कोणताही जबाबदार देश असे करत नाही', अशा शब्दात काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर सडकून टीका केली. 

Shashi Tharoor on 50% tariff News: "डोनाल्ड ट्रम्प व्यापारासाठी प्रसिद्ध आहेत. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावणे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण खूप सारे देश रशियाकडून तेल खरेदी करत आहेत. चीनच्या सामानावर ३० टक्के टॅरिफ आहे. चीनला ९० दिवसांचा वेळ दिला गेला. मग डोनाल्ड ट्रम्प यांचे प्राधान्य कशाला आहे. भारताने आता या सगळ्यांचा गोष्टींचा विचार करायला हवा", अशी भूमिका काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मांडली. भारत-अमेरिकेमध्ये होऊ घातलेल्या व्यापार कराराबद्दलही थरूर यांनी मोदी सरकारला मोलाचा सल्ला दिला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एनडीटीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार शशी थरूर म्हणाले, "चीनच्या सामानावर ३० टक्केच टॅरिफ लागणार आहे. मग ट्रम्प यांचे प्राधान्य कशाला आहे? यामुळे भारतासोबतच्या राजनैतिक संबंधावर काय परिणाम होतील? चीनसोबतच्या अमेरिकेच्या स्पर्धेबद्दल काय सुरू आहे? या सगळ्या  गोष्टींचा भारताना विचार करायला हवा."

भारताने आत्मसन्मानाचा विचार करायला हवा 

"कदाचित असेही असू शकते की ट्रम्प हे सगळं व्यापार करारासाठी दबाव टाकण्यासाठी करत असावेत. पण, ट्रम्प यांनी अनेकवेळा अशा भाषेचा वापर केला आहे की, भारताने आपल्या आत्मसन्मानाचाही विचार करायला हवा. हे खूप दुर्दैवी आहे", असे थरूर म्हणाले.  

"भारत सरकारने कठोर शब्दात उत्तर देऊ नये, पण उत्तर द्यायलाच हवे. दोन्ही देशांचे संबंध एकमेकांचा आदर ठेवून असायला हवेत. इथे आता २०० वर्षांपूर्वीची राजेशाही पद्धत सुरू नाहीये. कोणताही जबाबदार देश असे करत नाही. चर्चा नेहमी देवाण-घेवाणीनेच होतात. कोणतेही संबंध असे एकतर्फी चालत नाहीत. आपल्या इतर बाजारपेठा शोधाव्या लागतील", असे शशी थरूर म्हणाले.  

...तर भारताने गुड बाय म्हणावं -थरूर

"आपले अमेरिकेसोबत चांगले संबंध राहिले आहेत. फक्त अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या म्हणण्यामुळे आपले संबंध खराब होणार नाहीत. पण, भारताला आता राष्ट्रहित समोर ठेवून निर्णय घ्यावे लागतील. ट्रम्प वाटाघाटीच्या चर्चेसाठी येत नाहीत. ते त्यांचं म्हणणं मांडत आहेत, पण जेव्हा समोरासमोर या चर्चा होतील, तेव्हा आपल्या शिष्टमंडळाच्या हा दबाव झुगारावा लागेल", असे थरूर म्हणाले. 

"जिथे गोष्टी सोडल्या जाऊ शकतात, तिथे त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. मात्र, जिथे देशहिताचे नुकसान होईल, अशा अमेरिकेच्या अटी असतील, त्यावर ठामपणे आपली बाजू मांडावी. हे सगळं होऊनही अमेरिकेसोबत व्यापार करार होत नसेल, तर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणून परत यावं आणि अमेरिकेतून येणाऱ्या सामानावर ५० टक्के टॅरिफ लावावा", असा सल्ला शशी थरूर यांनी मोदी सरकारला दिला. 

टॅग्स :Trade Tariff Warटॅरिफ युद्धShashi Tharoorशशी थरूरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारत