शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

इतरांना मिळत नाहीत, केंद्राच्या कृषी खात्याने पाच वर्षांत १ लाख कोटी रुपये परत केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 14:06 IST

अनेक खाती आपल्याला गेल्यावेळपेक्षा जास्तीचा निधी मिळावा यासाठी झगडत असतात. परंतु, देशातील बहुतांश लोकसंख्या ज्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, त्या क्षेत्राच्या खात्याने जी आकडेवारी जारी केलीय ती धक्कादायक आहे.

लोकसभा निवडणुकीचे वारे सुरु झाले आहेत, त्यातच अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. केंद्र सरकार काय घोषणा करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक खाती आपल्याला गेल्यावेळपेक्षा जास्तीचा निधी मिळावा यासाठी झगडत असतात. परंतु, देशातील बहुतांश लोकसंख्या ज्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, त्या क्षेत्राच्या खात्याने गेल्या पाच वर्षांत तब्बल १ लाख कोटींचा निधी न खर्चताच परत पाठविला आहे. 

केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने एक लाख कोटींहून अधिकचा निधी सरेंडर केला आहे. कृषी मंत्रालयाच्या एका अहवालातून हे समोर आले आहे. अर्थ मंत्रालयाने दरवर्षी कृषी खात्याच्या निधीत मोठी वाढ केलेली आहे. परंतु, हा निधी या खात्याला खर्चच करता आलेला नाहीय. 

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने (DA&FW) गेल्या आर्थिक वर्षात (2022-2023) 1.24 लाख कोटी रुपयांच्या वार्षिक निधीपैकी 21,005.13 कोटी रुपये परत केले आहेत. Accounts at a Glance for the Year 2022-2023 या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 2021-22 मध्ये या विभागाने 5,152.6 करोड़ रुपये परत केले होते. 2020-21 मध्ये 23,824.53 करोड़ रुपये, 2019-20 में 34,517.7 करोड़ रुपये आणि 2018-19 में 21,043.75 करोड़ रुपये या विभागाने सरेंडर केले आहेत. 

मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाला देखील निधीचा वापर करता आलेला नाहीय. 2022-23 मध्ये ९ लाख रुपये अखर्चित राहिले होते. ही रक्कम तुलनेने कमी असली तरी 2021-22 मध्ये 1.81 कोटी रुपये व व 2020-21 मध्ये 600 कोटी रुपये परत केले होते. 2019-20 मध्ये 232.62 कोटी रुपये आणि 2018-2019 मध्ये 7.9 कोटी रुपये परत करण्यात आले होते. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रBudgetअर्थसंकल्प 2023Farmerशेतकरी