शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

इतरांना मिळत नाहीत, केंद्राच्या कृषी खात्याने पाच वर्षांत १ लाख कोटी रुपये परत केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 14:06 IST

अनेक खाती आपल्याला गेल्यावेळपेक्षा जास्तीचा निधी मिळावा यासाठी झगडत असतात. परंतु, देशातील बहुतांश लोकसंख्या ज्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, त्या क्षेत्राच्या खात्याने जी आकडेवारी जारी केलीय ती धक्कादायक आहे.

लोकसभा निवडणुकीचे वारे सुरु झाले आहेत, त्यातच अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. केंद्र सरकार काय घोषणा करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक खाती आपल्याला गेल्यावेळपेक्षा जास्तीचा निधी मिळावा यासाठी झगडत असतात. परंतु, देशातील बहुतांश लोकसंख्या ज्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, त्या क्षेत्राच्या खात्याने गेल्या पाच वर्षांत तब्बल १ लाख कोटींचा निधी न खर्चताच परत पाठविला आहे. 

केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने एक लाख कोटींहून अधिकचा निधी सरेंडर केला आहे. कृषी मंत्रालयाच्या एका अहवालातून हे समोर आले आहे. अर्थ मंत्रालयाने दरवर्षी कृषी खात्याच्या निधीत मोठी वाढ केलेली आहे. परंतु, हा निधी या खात्याला खर्चच करता आलेला नाहीय. 

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने (DA&FW) गेल्या आर्थिक वर्षात (2022-2023) 1.24 लाख कोटी रुपयांच्या वार्षिक निधीपैकी 21,005.13 कोटी रुपये परत केले आहेत. Accounts at a Glance for the Year 2022-2023 या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 2021-22 मध्ये या विभागाने 5,152.6 करोड़ रुपये परत केले होते. 2020-21 मध्ये 23,824.53 करोड़ रुपये, 2019-20 में 34,517.7 करोड़ रुपये आणि 2018-19 में 21,043.75 करोड़ रुपये या विभागाने सरेंडर केले आहेत. 

मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाला देखील निधीचा वापर करता आलेला नाहीय. 2022-23 मध्ये ९ लाख रुपये अखर्चित राहिले होते. ही रक्कम तुलनेने कमी असली तरी 2021-22 मध्ये 1.81 कोटी रुपये व व 2020-21 मध्ये 600 कोटी रुपये परत केले होते. 2019-20 मध्ये 232.62 कोटी रुपये आणि 2018-2019 मध्ये 7.9 कोटी रुपये परत करण्यात आले होते. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रBudgetअर्थसंकल्प 2023Farmerशेतकरी