शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

शबरीमलासह अन्य धार्मिक विषय मोठ्या घटनापीठाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 06:30 IST

केरळमधील शबरीमला देवस्थानातील १० ते ५० या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याच्या प्रथेवर सात न्यायाधीशांचं घटनापीठ करणार सुनावणी

नवी दिल्ली : केरळमधील शबरीमला देवस्थानातील १० ते ५० या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याच्या प्रथेसह मुस्लीम व झोरास्ट्रियन (पारशी) धर्मांमधील अशाच प्रथांची वैधता राज्यघटनेच्या कसोटीवर तपासून यातून वारंवार निर्माण होणाऱ्या वादांत कायमचा तोडगा काढण्यासाठी हे विषय निवाड्यासाठी सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाचा हा निर्णय एकमताने झाला नाही. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. अजय खानविलकर व न्या. इंदू मल्होत्रा या तीन न्यायाधीशांनी वरीलप्रमाणे निकाल दिला. मात्र न्या. रोहिंग्टन नरिमन व न्या. धनंजय चंद्रचूड यांनी त्यास विरोध करून असहमतीचे स्वतंत्र निकालपत्र दिले. भारतात विविध धर्मांचे अनुयायी असले तरी सर्वांचा राज्यघटना हाच सर्वात पवित्र धर्मग्रंथ आहे व त्याचे पालन करणे सर्वांचेच आद्य कर्तव्य आहे, असे या दोघांनी ठामपणे नमूद केले.शबरीमला मंदिरातील प्रथा घटनाबाह्य ठरवून ती रद्द करण्याचा निकाल याच घटनापीठाने गेल्या वर्षी दिला. त्याच्या फेरविचारासाठी केलेल्या याचिकांखेरीज त्याच विषयाच्या नव्या याचिकांवरही सुनावणी झाली. परंतु तीन न्यायाधीशांचे मत पडले की, मुस्लिमांच्या दर्ग्यात महिलांना प्रवेश न दिला जाणे, अन्यधर्मीय पुरुषाशी विवाह केलेल्या पारशी महिलेस अग्यारीत प्रवेश नाकारणे आणि मुली वयात येण्याआधीच त्यांची सुंथा करण्याची दाऊदी बोहरा समाजातील प्रथा याविषयीच्या याचिकाही याच न्यायालयात प्रलंबित आहेत. यातील कायद्याचे (पान ६ वर)(पान १ वरून) मुद्दे सामायिक व परस्परावलंबी असल्याने स्वतंत्रपणे निकाल करण्याऐवजी सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने या सर्व विषयांचा एकत्रित निवाडा करणे संयुक्तिक ठरेल.धर्म व श्रद्धेनुसार असलेल्या स्वातंत्र्याच्या मर्यादा कोणत्या, अशा धामिक बाबींमध्ये सरकार किती प्रमाणात हस्तक्षेप करू शकते, एखादी रूढ परंपरा त्या धर्माचा अविभाज्य भाग आहे की नाही हे कसे ठरवावे, एकाच धर्मातील विविध पंथांमध्ये रुढी व परंपरांच्या बाबतीत असलेल्या विविधतेतून सामायिक सूत्र कसे काढायचे, यासह संबंधित विषय सात न्यायाधीशांनी हाताळावेत, असे बहुमत असलेल्या न्यायाधीशांनी म्हटले.न्या. नरिमन व न्या. चंद्रचूड यांना मात्र हे पटले नाही. जे विषय अन्य खंडपीठांकडे आहेत त्यात या घटनापीठाने असा हस्तक्षेप करणे त्यांना अमान्य होते. शिवाय घटनापीठाने निकाल दिल्यावर तो न्यायालयासह सर्वांवर बंधनकारक असतो. अशा प्रकारे संभाव्य विवाद्य मुद्दे अधिकाधिक मोठ्या पीठांकडे पाठविले गेले तर न्यायनिर्णयांना कधीच अंतिम स्वरूप येणार नाही व त्यांची बंधनकारकताही राहणार नाही, असे स्पष्ट मत या दोघांनी नोंदविले.सात न्यायाधीशांचा निर्णय होईपर्यंत शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश सुरु राहील, असेही नमूद करण्यात आले.

 

टॅग्स :Sabarimala Templeशबरीमला मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय