शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

शबरीमलासह अन्य धार्मिक विषय मोठ्या घटनापीठाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 06:30 IST

केरळमधील शबरीमला देवस्थानातील १० ते ५० या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याच्या प्रथेवर सात न्यायाधीशांचं घटनापीठ करणार सुनावणी

नवी दिल्ली : केरळमधील शबरीमला देवस्थानातील १० ते ५० या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याच्या प्रथेसह मुस्लीम व झोरास्ट्रियन (पारशी) धर्मांमधील अशाच प्रथांची वैधता राज्यघटनेच्या कसोटीवर तपासून यातून वारंवार निर्माण होणाऱ्या वादांत कायमचा तोडगा काढण्यासाठी हे विषय निवाड्यासाठी सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाचा हा निर्णय एकमताने झाला नाही. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. अजय खानविलकर व न्या. इंदू मल्होत्रा या तीन न्यायाधीशांनी वरीलप्रमाणे निकाल दिला. मात्र न्या. रोहिंग्टन नरिमन व न्या. धनंजय चंद्रचूड यांनी त्यास विरोध करून असहमतीचे स्वतंत्र निकालपत्र दिले. भारतात विविध धर्मांचे अनुयायी असले तरी सर्वांचा राज्यघटना हाच सर्वात पवित्र धर्मग्रंथ आहे व त्याचे पालन करणे सर्वांचेच आद्य कर्तव्य आहे, असे या दोघांनी ठामपणे नमूद केले.शबरीमला मंदिरातील प्रथा घटनाबाह्य ठरवून ती रद्द करण्याचा निकाल याच घटनापीठाने गेल्या वर्षी दिला. त्याच्या फेरविचारासाठी केलेल्या याचिकांखेरीज त्याच विषयाच्या नव्या याचिकांवरही सुनावणी झाली. परंतु तीन न्यायाधीशांचे मत पडले की, मुस्लिमांच्या दर्ग्यात महिलांना प्रवेश न दिला जाणे, अन्यधर्मीय पुरुषाशी विवाह केलेल्या पारशी महिलेस अग्यारीत प्रवेश नाकारणे आणि मुली वयात येण्याआधीच त्यांची सुंथा करण्याची दाऊदी बोहरा समाजातील प्रथा याविषयीच्या याचिकाही याच न्यायालयात प्रलंबित आहेत. यातील कायद्याचे (पान ६ वर)(पान १ वरून) मुद्दे सामायिक व परस्परावलंबी असल्याने स्वतंत्रपणे निकाल करण्याऐवजी सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने या सर्व विषयांचा एकत्रित निवाडा करणे संयुक्तिक ठरेल.धर्म व श्रद्धेनुसार असलेल्या स्वातंत्र्याच्या मर्यादा कोणत्या, अशा धामिक बाबींमध्ये सरकार किती प्रमाणात हस्तक्षेप करू शकते, एखादी रूढ परंपरा त्या धर्माचा अविभाज्य भाग आहे की नाही हे कसे ठरवावे, एकाच धर्मातील विविध पंथांमध्ये रुढी व परंपरांच्या बाबतीत असलेल्या विविधतेतून सामायिक सूत्र कसे काढायचे, यासह संबंधित विषय सात न्यायाधीशांनी हाताळावेत, असे बहुमत असलेल्या न्यायाधीशांनी म्हटले.न्या. नरिमन व न्या. चंद्रचूड यांना मात्र हे पटले नाही. जे विषय अन्य खंडपीठांकडे आहेत त्यात या घटनापीठाने असा हस्तक्षेप करणे त्यांना अमान्य होते. शिवाय घटनापीठाने निकाल दिल्यावर तो न्यायालयासह सर्वांवर बंधनकारक असतो. अशा प्रकारे संभाव्य विवाद्य मुद्दे अधिकाधिक मोठ्या पीठांकडे पाठविले गेले तर न्यायनिर्णयांना कधीच अंतिम स्वरूप येणार नाही व त्यांची बंधनकारकताही राहणार नाही, असे स्पष्ट मत या दोघांनी नोंदविले.सात न्यायाधीशांचा निर्णय होईपर्यंत शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश सुरु राहील, असेही नमूद करण्यात आले.

 

टॅग्स :Sabarimala Templeशबरीमला मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय