शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

शबरीमलासह अन्य धार्मिक विषय मोठ्या घटनापीठाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 06:30 IST

केरळमधील शबरीमला देवस्थानातील १० ते ५० या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याच्या प्रथेवर सात न्यायाधीशांचं घटनापीठ करणार सुनावणी

नवी दिल्ली : केरळमधील शबरीमला देवस्थानातील १० ते ५० या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याच्या प्रथेसह मुस्लीम व झोरास्ट्रियन (पारशी) धर्मांमधील अशाच प्रथांची वैधता राज्यघटनेच्या कसोटीवर तपासून यातून वारंवार निर्माण होणाऱ्या वादांत कायमचा तोडगा काढण्यासाठी हे विषय निवाड्यासाठी सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाचा हा निर्णय एकमताने झाला नाही. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. अजय खानविलकर व न्या. इंदू मल्होत्रा या तीन न्यायाधीशांनी वरीलप्रमाणे निकाल दिला. मात्र न्या. रोहिंग्टन नरिमन व न्या. धनंजय चंद्रचूड यांनी त्यास विरोध करून असहमतीचे स्वतंत्र निकालपत्र दिले. भारतात विविध धर्मांचे अनुयायी असले तरी सर्वांचा राज्यघटना हाच सर्वात पवित्र धर्मग्रंथ आहे व त्याचे पालन करणे सर्वांचेच आद्य कर्तव्य आहे, असे या दोघांनी ठामपणे नमूद केले.शबरीमला मंदिरातील प्रथा घटनाबाह्य ठरवून ती रद्द करण्याचा निकाल याच घटनापीठाने गेल्या वर्षी दिला. त्याच्या फेरविचारासाठी केलेल्या याचिकांखेरीज त्याच विषयाच्या नव्या याचिकांवरही सुनावणी झाली. परंतु तीन न्यायाधीशांचे मत पडले की, मुस्लिमांच्या दर्ग्यात महिलांना प्रवेश न दिला जाणे, अन्यधर्मीय पुरुषाशी विवाह केलेल्या पारशी महिलेस अग्यारीत प्रवेश नाकारणे आणि मुली वयात येण्याआधीच त्यांची सुंथा करण्याची दाऊदी बोहरा समाजातील प्रथा याविषयीच्या याचिकाही याच न्यायालयात प्रलंबित आहेत. यातील कायद्याचे (पान ६ वर)(पान १ वरून) मुद्दे सामायिक व परस्परावलंबी असल्याने स्वतंत्रपणे निकाल करण्याऐवजी सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने या सर्व विषयांचा एकत्रित निवाडा करणे संयुक्तिक ठरेल.धर्म व श्रद्धेनुसार असलेल्या स्वातंत्र्याच्या मर्यादा कोणत्या, अशा धामिक बाबींमध्ये सरकार किती प्रमाणात हस्तक्षेप करू शकते, एखादी रूढ परंपरा त्या धर्माचा अविभाज्य भाग आहे की नाही हे कसे ठरवावे, एकाच धर्मातील विविध पंथांमध्ये रुढी व परंपरांच्या बाबतीत असलेल्या विविधतेतून सामायिक सूत्र कसे काढायचे, यासह संबंधित विषय सात न्यायाधीशांनी हाताळावेत, असे बहुमत असलेल्या न्यायाधीशांनी म्हटले.न्या. नरिमन व न्या. चंद्रचूड यांना मात्र हे पटले नाही. जे विषय अन्य खंडपीठांकडे आहेत त्यात या घटनापीठाने असा हस्तक्षेप करणे त्यांना अमान्य होते. शिवाय घटनापीठाने निकाल दिल्यावर तो न्यायालयासह सर्वांवर बंधनकारक असतो. अशा प्रकारे संभाव्य विवाद्य मुद्दे अधिकाधिक मोठ्या पीठांकडे पाठविले गेले तर न्यायनिर्णयांना कधीच अंतिम स्वरूप येणार नाही व त्यांची बंधनकारकताही राहणार नाही, असे स्पष्ट मत या दोघांनी नोंदविले.सात न्यायाधीशांचा निर्णय होईपर्यंत शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश सुरु राहील, असेही नमूद करण्यात आले.

 

टॅग्स :Sabarimala Templeशबरीमला मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय