शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

स्टेशनवर आयोजित करा विवाह सोहळा आणि अन्य समारंभ

By admin | Updated: December 29, 2016 00:51 IST

रेल्वे स्टेशन म्हणताच, डोळ्यासमोर येतो तिथला गोंधळ, कलकलाट, गाड्या येताच होणारी धावपळ आणि एक विशिष्ट वास. मोठ्या शहरांमध्ये प्रत्येक प्लॅटफॉर्मवर प्रचंड

नवी दिल्ली : रेल्वे स्टेशन म्हणताच, डोळ्यासमोर येतो तिथला गोंधळ, कलकलाट, गाड्या येताच होणारी धावपळ आणि एक विशिष्ट वास. मोठ्या शहरांमध्ये प्रत्येक प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी, उभे राहायलाही नसलेली जागा आणि उपनगरी गाडी येताच त्यातून उतरण्यासाठी आणि आत शिरण्यासाठी उडणारी झुंबड. अशा रेल्वे स्टेशनवर कुणाच्या विवाह समारंभ आयोजित करावा, असा विचार आतापर्यंत कोणाच्या मनातही डोकावला नसेल. पण यापुढे रेल्वे स्टेशनवरही विवाह सोहळे आणि बँड, बाजा, बारात हे चित्र पाहायला मिळाले, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. प्लॅटफॉर्मवर यज्ञासमोर बसून भटजी मंत्र पुटपुटत आहेत, आंतरपाट धरून काही जण उभे आहेत, दोन्ही बाजुंना वधू-वर हातात हार धरून उभे आहेत, सात प्रदक्षिणा घेत आहेत, सात जन्म एकत्र राहण्याचे वचन एकमेकांना देत आहेत, मंगलाष्टके सुरू असताना हातात अक्षता असलेल्यांची गर्दी आणि एकमेकांना हार घालताच सुरू होणारा सनई-चौघडा आणि त्यानंतर लगेचच जेवणाच्या पहिल्याच पंगतीत बसण्यासाठी काहींची धावपळ असे चित्र रेल्वे प्लॅटर्फार्मवर पाहायला मिळू शकेल. किंबहुना विवाह सोहळ्यांसाठी रेल्वेचे प्लॅटफॉर्म देण्याची तयारी रेल्वे मंत्रालयाने सुरूही केली आहे. याच्याच तयारीला सध्या रेल्वे मंत्रालय लागले आहे. त्यामुळे आता लवकरच किमान या २00 रेल्वे स्टेशनवर मंगलाष्टके आणि सनई चौघडे ऐकू येण्याची शक्यता आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) - नोव्हेंबरमध्ये झालेल्या रेल्वे विकास शिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी रेल्वेचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासंदर्भात चर्चा केली होती. तसेच काही सल्लेही दिले होते. त्यातूनच रेल्वेने आपले उत्पन्न वाढवण्यासाठी स्टेशनचा वापर लग्नकार्य किंवा अन्य सोहळ्यांसाठी देण्याचा विचार करावा, अशी कल्पना समोर आली. २00 स्टेशन मोकळीच!- रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात जवळपास आठ हजार रेल्वे स्टेशन्स आहेत. यापैकी किमान २00 स्टेशनवर दिवसातून एक वा दोन गाड्याच येतात वा तिथे थांबतात. या स्टेशनवर प्लॅटफॉर्मशिवाय बरीच जागा उपलब्ध असून, तिचा क्वचितच वापर केला जातो. या स्टेशनकडून रेल्वेला फारसे उत्पन्नही मिळत नाही. त्यामुळे ही रेल्वो स्टेशन नफ्यात आणण्यासाठी त्यांचे प्लॅटफॉर्म लग्नकार्य आणि अन्य सोहळ्यांसाठी देण्याच्या कल्पनेवर रेल्वे विचार करत आहे. यातील काही रेल्वे स्टेशन ग्रामीण भागात आहेत. तिथे सहजच या स्टेशनचा वापर लग्नकार्य किंवा अन्य कार्यक्रमांसाठी करता येईल, असे केल्यामुळे रेल्वेचे उत्पन्न होईल आणि दुसरीकडे लोकांना चांगली सुविधाही मिळू शकेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांना वाटत आहे.