शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

काँग्रेसमध्ये कार्यकारिणीसह होणार संघटनात्मक फेरबदल?; सोनिया गांधी यांचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 09:55 IST

फेरबदल एकाचवेळी किंवा टप्प्याटप्प्यात केले जाऊ शकतात.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : पुढील दोन वर्षात विविध राज्यांत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आव्हानांला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा काँग्रेस कार्यकारिणीसह संघटनात्मक फेरबदल करण्याचा बेत आहे. हे फेरबदल एकाचवेळी किंवा टप्प्याटप्प्यात केले जाऊ शकतात.

लोकसभेच्या दोनशे जागांसाठी काँग्रेस आणि भाजपदरम्यान थेट लढत होणार असेल, तर पंजाब, राजस्थान, छत्तीसगढमधील सत्ता राखणे आणि मध्य प्रदेश, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, गोवा आणि उत्तराखंडमध्ये विजय मिळविणे, हेच काँग्रेसचे प्राधान्य आहे. याशिवाय महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार झारखंड, तेलंगणात निवडणूक पूर्व आणि निवडणुकीनंतर रणनितीक आघाडीने भाजपला रोखता येईल. २३ नेत्यांच्या समूहाचाही (जी २३) समावेश केला जाऊ शकतो. या भूपिंदर सिंह हुडा वगळता या समूहातील अन्य जनमाणसात प्रभाव असलेले नेते नसले, तरी ते अनुभवी आणि इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी निष्ठावंत आहेत. 

प्रियांका गांधींकडे मोठी जबाबदारी

उत्तर प्रदेशच्या प्रभारी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. या व्यतिरिक्त देशातील विविध प्रदेशांत संघटनात्मक जबाबदारी सांभाळण्यासाठी उपाध्यक्ष नियुक्त करण्याचीही चर्चा आहे. तांत्रिकदृष्ट्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या १२ सदस्यांची निवड निवडणुकीतून होते. काँग्रेस अध्यक्ष १२ सदस्य नियुक्त करतात; परंतु, १२ सदस्यांची निवडणूक पक्ष टाळत आले आहे. काँग्रेस संसदीय मंडळामुळे ( आता अस्तित्वात नाही. कारण त्याची जागा केंद्रीय निवडणूक समितीने घेतली आहे) संघटनात कटुता निर्माण होते, असा अनुभव असला तरी लोकप्रिय नेते ओळखण्याचा हाच एक मार्ग असू शकतो.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी