शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरात २ हजार ठिकाणी कार्यक्रम होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 04:18 IST

एकाचवेळी वाहणाार श्रद्धांजली; ऑगस्ट क्रांती मैदानात विशेष आयोजन

मुंबई : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३० जानेवारीला एकाचवेळी देशभरात २ हजार ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सायंकाळी ५.१७ वाजता सर्व ठिकाणी दोन मिनिटे मौन पाळून अहिंसा आणि सद्भावनेचा संदेश दिला जाणार आहे. मुंबईतही मणी भवन येथे गांधीजींच्या स्मृतींना उजाळा देऊन आॅगस्ट क्रांती मैदान येथे विशेष कार्यक्रम पार पडणार आहे.अभिवादन कार्यक्रमासाठी विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था व संघटना, कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांत अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास म्हणाल्या की, महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे निमित्त साधत ३० जानेवारीला असलेल्या पुण्यतिथीनिमित्त अहिंसा व सद्भावनेचा संदेश देण्यात येणार आहे. या मोहिमेत सामाजिक संस्थांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, आम आदमी पार्टी अशा विविध राजकीय पक्षांनीही सामील होण्यास पाठिंबा दिला आहे.या अभिवादनपर कार्यक्रमात सकाळी ११ वाजता मुंबईतील विविध शाळा, महाविद्यालये, सामुदायिक केंद्रांच्या ठिकाणी दोन मिनिटे मौन पाळून महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली जाईल. भारतीय विद्या भवन, अंजुमन-ए-इस्लाम, जय हिंद महाविद्यालय, सिडनेम महाविद्यालय, अकबर पीरभॉय, भवन्स महाविद्यालय, हाजी अली दरगाह अशा विविध ठिकाणीही कार्यक्रम पार पडतील. दुपारी ३ वाजता सर्व संस्था व संघटना मणी भवन येथे एकवटतील. येथून नाना चौकमार्गे सर्व नागरिक आॅगस्ट क्रांती मैदानापर्यंत मूक रॅली काढतील.सायंकाळी ४.३० वाजता आॅगस्ट क्रांती मैदानात पोहोचल्यानंतर गांधीजींच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या गीत आणि भजनांचे गायन केले जाईल. तसेच शांती, सद्भाव आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची शपथ नागरिक घेतील. सायंकाळी ५.१७ वाजता दोन मिनिटांचे मौन बाळगून गांधीजींना श्रद्धांजली वाहिली जाईल.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी