शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

रेल्वेचं तिकीट कन्फर्म न झाल्यास मिळणार विमानाने प्रवास करण्याचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 10:02 IST

अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे चेअरमन असताना हा प्रस्ताव रेल्वेसमोर ठेवला होता. मात्र त्यावेळी रेल्वेकडून कोणतंही सकारात्मक उत्तर किंवा प्रतिसाद आला नव्हता. आता जेव्हा अश्वनी लोहानी स्वत: रेल्वे बोर्डाचे चेअरमन झाले आहेत, तेव्हा त्यांनी एअर इंडियाने असा प्रस्ताव पुन्हा ठेवल्यास आपण त्याला मंजुरी देऊ असं सांगितलं आहे

ठळक मुद्देराजधानी एक्स्प्रेसने प्रवास करताना एसी-1 किंवा एसी-2 चं तिकीट कन्फर्म झालं नसेल तर विमानाने प्रवास करण्याचा पर्यायट्रेन आणि विमानाच्या तिकीट दरात जितका फरक असेल, तितके पैसे तुम्हाला भरावे लागणारअश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे चेअरमन असताना हा प्रस्ताव रेल्वेसमोर ठेवला होता

नवी दिल्ली - जर तुम्ही राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करत असाल, आणि एसी-1 किंवा एसी-2 चं तिकीट कन्फर्म झालं नसेल तर तुम्हाला विमानाने प्रवास करण्याचा पर्याय मिळू शकतो. पण ट्रेन आणि विमानाच्या तिकीट दरात जितका फरक असेल, तितके पैसे तुम्हाला भरावे लागतील. अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे चेअरमन असताना हा प्रस्ताव रेल्वेसमोर ठेवला होता. मात्र त्यावेळी रेल्वेकडून कोणतंही सकारात्मक उत्तर किंवा प्रतिसाद आला नव्हता. आता जेव्हा अश्वनी लोहानी स्वत: रेल्वे बोर्डाचे चेअरमन झाले आहेत, तेव्हा त्यांनी एअर इंडियाने असा प्रस्ताव पुन्हा ठेवल्यास आपण त्याला मंजुरी देऊ असं सांगितलं आहे. 

रेल्वेमध्ये मागणी आणि पुरवठ्यात खूप मोठा फरक असल्या कारणाने कन्फर्म तिकीट न मिळणा-या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे एअर इंडियाचे चेअरमन असताना अश्वनी लोहानी यांनी ही संकल्पना समोर मांडली होती. त्यानुसार जर रेल्वेने अशा प्रवाशांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स एअर इंडियासोबत शेअर केल्यास त्यांनी विमानातून प्रवास करण्याची ऑफर दिली जाऊ शकते. यासाठी जास्त पैसेही खर्च करावे लागणार नाहीत. अश्वनी लोहानी यांनी सांगितल्यानुसार, 'राजधानीच्या एसी-2 च्या भाड्यात आणि विमानाच्या तिकीट दरात जास्त अंतर नाही'.

दरम्यान, दुसरीकडे सरकार एअर इंडियाचं खासगीकरण करण्याचा प्रयत्न असून खासगी कंपनीला विकणार असल्याची माहिती आहे. प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत एअर इंडिया पुन्हा रेल्वेसमोर हा प्रस्ताव ठेवते का हे पाहावं लागेल. 

एअर इंडियाशी संबंधित एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, 'सरकारी एअरलाईन असल्याचा हा फायदा असून, रेल्वे आपल्या कन्फर्म न झालेल्या प्रवाशांना आमच्याकडे पाठवू शकतात. अश्वनी लोहानी यांची ही संकल्पना खरंच चांगली आहे. मात्र रेल्व एका खासगी एअरलाइनसोबत असं करु शकेल का ? त्यांच्यावर खासगी कंपनीला फायदा पोहोचवण्याचा आरोप करण्यात येईल'.

अश्वनी लोहानी यांना रेल्वे बोर्डाचं चेअरमन करण्यात आल्यानंतर, एअर इंडियाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळणा-या वरिष्ठ आयएएस अधिकारी राजीव बन्सल यांनी आपण या प्रस्तावावर काही प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याचं सांगितलं आहे. 'मी पहिल्यांदाच असं काहीतरी ऐकत आहे. ट्रेन आणि विमानाच्या तिकीट दरात फरक असतो'. 

 

टॅग्स :Rajdhani Expressराजधानी एक्स्प्रेसAirportविमानतळ