शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

रेल्वेचं तिकीट कन्फर्म न झाल्यास मिळणार विमानाने प्रवास करण्याचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 10:02 IST

अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे चेअरमन असताना हा प्रस्ताव रेल्वेसमोर ठेवला होता. मात्र त्यावेळी रेल्वेकडून कोणतंही सकारात्मक उत्तर किंवा प्रतिसाद आला नव्हता. आता जेव्हा अश्वनी लोहानी स्वत: रेल्वे बोर्डाचे चेअरमन झाले आहेत, तेव्हा त्यांनी एअर इंडियाने असा प्रस्ताव पुन्हा ठेवल्यास आपण त्याला मंजुरी देऊ असं सांगितलं आहे

ठळक मुद्देराजधानी एक्स्प्रेसने प्रवास करताना एसी-1 किंवा एसी-2 चं तिकीट कन्फर्म झालं नसेल तर विमानाने प्रवास करण्याचा पर्यायट्रेन आणि विमानाच्या तिकीट दरात जितका फरक असेल, तितके पैसे तुम्हाला भरावे लागणारअश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे चेअरमन असताना हा प्रस्ताव रेल्वेसमोर ठेवला होता

नवी दिल्ली - जर तुम्ही राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करत असाल, आणि एसी-1 किंवा एसी-2 चं तिकीट कन्फर्म झालं नसेल तर तुम्हाला विमानाने प्रवास करण्याचा पर्याय मिळू शकतो. पण ट्रेन आणि विमानाच्या तिकीट दरात जितका फरक असेल, तितके पैसे तुम्हाला भरावे लागतील. अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे चेअरमन असताना हा प्रस्ताव रेल्वेसमोर ठेवला होता. मात्र त्यावेळी रेल्वेकडून कोणतंही सकारात्मक उत्तर किंवा प्रतिसाद आला नव्हता. आता जेव्हा अश्वनी लोहानी स्वत: रेल्वे बोर्डाचे चेअरमन झाले आहेत, तेव्हा त्यांनी एअर इंडियाने असा प्रस्ताव पुन्हा ठेवल्यास आपण त्याला मंजुरी देऊ असं सांगितलं आहे. 

रेल्वेमध्ये मागणी आणि पुरवठ्यात खूप मोठा फरक असल्या कारणाने कन्फर्म तिकीट न मिळणा-या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे एअर इंडियाचे चेअरमन असताना अश्वनी लोहानी यांनी ही संकल्पना समोर मांडली होती. त्यानुसार जर रेल्वेने अशा प्रवाशांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स एअर इंडियासोबत शेअर केल्यास त्यांनी विमानातून प्रवास करण्याची ऑफर दिली जाऊ शकते. यासाठी जास्त पैसेही खर्च करावे लागणार नाहीत. अश्वनी लोहानी यांनी सांगितल्यानुसार, 'राजधानीच्या एसी-2 च्या भाड्यात आणि विमानाच्या तिकीट दरात जास्त अंतर नाही'.

दरम्यान, दुसरीकडे सरकार एअर इंडियाचं खासगीकरण करण्याचा प्रयत्न असून खासगी कंपनीला विकणार असल्याची माहिती आहे. प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत एअर इंडिया पुन्हा रेल्वेसमोर हा प्रस्ताव ठेवते का हे पाहावं लागेल. 

एअर इंडियाशी संबंधित एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, 'सरकारी एअरलाईन असल्याचा हा फायदा असून, रेल्वे आपल्या कन्फर्म न झालेल्या प्रवाशांना आमच्याकडे पाठवू शकतात. अश्वनी लोहानी यांची ही संकल्पना खरंच चांगली आहे. मात्र रेल्व एका खासगी एअरलाइनसोबत असं करु शकेल का ? त्यांच्यावर खासगी कंपनीला फायदा पोहोचवण्याचा आरोप करण्यात येईल'.

अश्वनी लोहानी यांना रेल्वे बोर्डाचं चेअरमन करण्यात आल्यानंतर, एअर इंडियाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळणा-या वरिष्ठ आयएएस अधिकारी राजीव बन्सल यांनी आपण या प्रस्तावावर काही प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याचं सांगितलं आहे. 'मी पहिल्यांदाच असं काहीतरी ऐकत आहे. ट्रेन आणि विमानाच्या तिकीट दरात फरक असतो'. 

 

टॅग्स :Rajdhani Expressराजधानी एक्स्प्रेसAirportविमानतळ