शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

राज्यसभेचे उपसभापतीपद विरोधी पक्षाला, भाजपाचा दावा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 03:57 IST

संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरु होणार असून यात उपसभापतीपदाची निवड होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकेत दिले आहेत

हरीश गुप्तानवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरु होणार असून यात उपसभापतीपदाची निवड होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकेत दिले आहेत की, उपसभापतीपद हे राज्यसभेतील विरोधी पक्षातील एखाद्या सदस्यास दिले जावे. विद्यमान उपसभापती पी.जे कुरीयन हे निवृत्त होत असल्याने ही जागा रिक्त होत आहे.असे समजले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी अमित शहा यांच्यासह पक्षाच्या संसदीय समितीशी यावर विचारविनिमय केला आहे आणि असे संकेत दिले आहेत की, भाजप या पदावर दावा करणार नाही. सत्तारुढ भाजप राज्यसभेत ६९ सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेस व समविचारी पक्ष राज्यसभेत इच्छित संख्या गाठू शकणार नाहीत. २४४ सदस्यसंख्येच्या सभागृहात भाजपा आणि सहकारी पक्षांकडे १०९ सदस्य आहेत. शरद यादव यांची एक जागा रिक्त आहे. तीन सदस्यांच्या नियुक्तीनंतर एनडीएची संख्या ११२ वर पोहचेल. जर बीजेडीने भाजपचा प्रस्ताव स्वीकारला तर ही संख्या ११७ वर जाते. जर टीआरएसही (६) राजी झाले तर हा आकडा १२३ वर जाईल. म्हणजेच एनडीएकडे बहुमत होईल.हे पद बिजू जनता दल किंवा तेलंगणा राष्ट्र समिती वा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला देण्याचा विचार आहे. हे पक्ष भाजपा- काँग्रेसपासून समान अंतर राखून आहेत.भाजपाच्या मते तृणमूलचे ज्येष्ठ नेते शुबेंदू शेखर रॉय हे या पदासाठी सक्षम आहेत.तेलंगणा राष्ट्रीय समिती वा बीजू जनता दल यापैकी कुणीही हे पद स्वीकारले तर भाजपला त्याचा अतिशय आनंद होईल. कारण, अन्य विरोधी पक्ष याला विरोध करु शकणार नाहीत.

टॅग्स :BJPभाजपा