शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

'मतचोरी' विरोधात विरोधक एकवटले; ३०० खासदारांचा आयोगावर महामोर्चा, 'इंडिया' आघाडीची एकी, 'आप'ही सामील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 06:11 IST

संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या दिशेने कूच करणाऱ्या खासदारांना पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले, नंतर संसद परिसरात नेऊन सोडून दिले

नवी दिल्ली: बिहारमधील मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणासह कथित 'मत चोरी' विरुद्ध संसदेत सातत्याने आक्रमक असलेले काँग्रेससह इतर विरोधी पक्ष सोमवारी संसदेबाहेरही एकवटले. विरोधी पक्षाच्या जवळपास ३०० खासदारांसह नेत्यांनी संसदेपासून निवडणूक आयोगाच्या दिशेने मोर्चाच्या माध्यमातून कूच केली. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा अडवत नेत्यांना ताब्यात घेतले. विरोधकांची ही निदर्शने म्हणजे देशात अराजक व अस्थिरता पसरविण्याचा डाव असल्याची टीका भाजपने केली आहे.

या मोर्चात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह तृणमूल काँग्रेस, द्रमुक तसेच इतर पक्षांचे नेते सहभागी झाले होते. 'इंडिया' आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केलेल्या 'आप'चे खासदार संजय सिंह हे पण मोर्चात सहभागी होते. राहुल गांधी यांनी मतदारयाद्यांत कथित घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर विरोधी पक्षांची ही पहिलीच निदर्शने आहेत. राहुल गांधी यांनी बंगळुरूच्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी मांडून ७ ऑगस्ट रोजी आरोप केला होता की 'व्होट चोरी'चे हे मॉडेल भाजपला लाभ देण्यासाठी लागू करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल मीडियावर नमूद केले की, 'भाजपची ही भेकड हुकूमशाही चालू देणार नाही. जनतेच्या मताचा अधिकार जपण्यासाठीची, लोकशाही वाचवण्यासाठीची ही लढाई आहे. 'इंडिया' आघाडीचे सदस्य संविधानाची ही वाईट अवस्था करू पाहणाऱ्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाहीत.' दिल्लीतील एका पोलिस अधिकाऱ्यानुसार, या मोर्चासाठी किंवा निदर्शनासाठी कुणीच परवानगी मागितलेली नव्हती.

मोईत्रा, घोष जाटव आक्रमक

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि सागरिका घोष, काँग्रेसचे ज्योतिमणी, संजना जाटव हे नेते थेट बॅरिकेटवर उभारले व त्यांनी सरकारविरुद्ध घोषणा सुरू केल्या. खासदारांना बसममध्ये बसवून नेत असताना महुआ मोईत्रा यांना अस्वस्थ वाटू लागले होते.

खा. मिताली घोष बेशुद्धः हे आंदोलन सुरू असताना तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिताली घोष यांची अचानक शुद्ध हरपली. राहुल गांधी आणि इतरांनी त्यांना मदत केली. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मतदारयाद्यांवरून काँग्रेसलाच घेरणाऱ्या कर्नाटकच्या मंत्र्याची हकालपट्टी 

कर्नाटकचे सहकारमंत्री व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे विश्वासू सहकारमंत्री के. एन. राजन्ना यांनी सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. कर्नाटकातील मतदारयाद्यांतील घोटाळ्यांवरून राजन्ना यांनी आपल्याच पक्षावर याकडे मुद्दाम डोळेझाक केल्याचा आरोप केला होता. सिद्धरामय्या यांनी त्यांना ताबडतोब राजीनामा मागितला.

सर्वोच्च न्यायालयापेक्षा आयोग मोठा आहे का? उद्धव ठाकरे यांचा सवाल 

मुंबई वगळलेल्या मतदारांची नावे सर्वोच्च न्यायालयाला देणे बंधनकारक नाही, असे केंद्रीय निवडणूक आयोग म्हणत असेल तर हा न्यायालयाचा अपमान नाही का? सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोगाचे आयुक्त मोठे आहेत का? असा सवाल उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

'ही लढाई राजकीय नाही, तर संविधान वाचविण्यासाठीची लढाई आहे. 'एक व्यक्ती एक व्होट'चा हा लढा आहे. आम्हाला एक पारदर्शक आणि योग्य मतदारयादी हवी आहे.'- राहुल गांधी 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगParliamentसंसद