शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

भाजपला सत्तेतून हटविण्यासाठी हवी विरोधी पक्षांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 04:28 IST

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करणे ही गोष्ट सध्याच्या स्थितीत काँग्रेससाठी कठीण आहे, असे मत त्या पक्षाचे नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले आहे.

कोलकाता : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करणे ही गोष्ट सध्याच्या स्थितीत काँग्रेससाठी कठीण आहे, असे मत त्या पक्षाचे नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले आहे. भाजपला सत्तेतून घालविण्यासाठीच विरोधी पक्षांची आघाडी स्थापन झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.खुर्शीद म्हणाले की, काँग्रेसवर मर्यादा येणार नाहीत याची दक्षता विरोधी पक्षांबरोबर आघाडी करताना घेण्यात यावी. अशी आघाडी करताना प्रत्येकाला काही ना काही त्याग करावाच लागेल. तशाच मनोभूमिकेतून विरोधी पक्षांनी चर्चेत सहभागी झाले पाहिजे. स्वबळावर सरकार स्थापन करण्याचे उद्दिष्ट मनात असेल, तर त्यादृष्टीने काँग्रेसला पुढील पाच वर्षे काम करावे लागेल. विरोधी पक्षांच्या आघाडीत तीन वर्षे राहिल्यानंतर त्यातून एकदम बाहेर पडून पुढची दोन वर्षे स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी काम करायला जाल, तर ते अयोग्य ठरेल. कोणत्याही उद्दिष्टासाठी त्याच विचाराने पुढील निवडणुका येईपर्यंत सातत्याने काम करायला हवे. विद्यमान स्थितीत काँग्रेसला आघाडी करण्याची इच्छा असून, ती प्रत्यक्षात येण्यासाठी आमचे जोरकस प्रयत्न सुरू आहेत.ते म्हणाले की, देशात सर्व राज्यांत जागा जिंकू शकेल असा विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. बाकी पक्ष आपापल्या राज्यात उत्तम कामगिरी बजावू शकतात. देशातील लोकसभेच्या एकूण जागा व एखाद्या राज्यातील जागा यांच्या वाटपाबाबत होणाऱ्या चर्चेमध्ये खूपच फरक असतो. जागावाटपामध्ये व्यावहारिक तोडगा काढणे जास्त महत्त्वाचे आहे. आघाडीत सामील होणाºया विरोधी पक्षांनी हे भान राखायला हवे.>आघाडीच्या स्थापनेत अनेक अडचणीकाँग्रेसने आघाडीचा प्रयत्न चालविला असला तरी ते उद्दिष्ट साध्य होण्यात अनेक अडचणी आहेत. बसपाच्या प्रमुख मायावती यांनी मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ येथील विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याचे जाहीर केले आहे.मध्यप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने काँग्रेसबरोबर युती करण्यास नकार दिला आहे. काँग्रेस आघाडी फार काळ टिकवत नाही, असा या पक्षाचा आरोप आहे.सलमान खुर्शीद म्हणाले की, मोदी सरकारचा लोकसभा निवडणुकांत पराभव करणे हाच आघाडी स्थापन करण्यामागचा उद्देश आहे. हा मूळ हेतूच विसरला गेला, तर अपेक्षित यश मिळणार नाही. त्यात आघाडीतील प्रत्येक पक्षाचे व पर्यायाने देशाचेही नुकसान होईल.

टॅग्स :congressकाँग्रेस