शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

भाजपला सत्तेतून हटविण्यासाठी हवी विरोधी पक्षांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 04:28 IST

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करणे ही गोष्ट सध्याच्या स्थितीत काँग्रेससाठी कठीण आहे, असे मत त्या पक्षाचे नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले आहे.

कोलकाता : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करणे ही गोष्ट सध्याच्या स्थितीत काँग्रेससाठी कठीण आहे, असे मत त्या पक्षाचे नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले आहे. भाजपला सत्तेतून घालविण्यासाठीच विरोधी पक्षांची आघाडी स्थापन झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.खुर्शीद म्हणाले की, काँग्रेसवर मर्यादा येणार नाहीत याची दक्षता विरोधी पक्षांबरोबर आघाडी करताना घेण्यात यावी. अशी आघाडी करताना प्रत्येकाला काही ना काही त्याग करावाच लागेल. तशाच मनोभूमिकेतून विरोधी पक्षांनी चर्चेत सहभागी झाले पाहिजे. स्वबळावर सरकार स्थापन करण्याचे उद्दिष्ट मनात असेल, तर त्यादृष्टीने काँग्रेसला पुढील पाच वर्षे काम करावे लागेल. विरोधी पक्षांच्या आघाडीत तीन वर्षे राहिल्यानंतर त्यातून एकदम बाहेर पडून पुढची दोन वर्षे स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी काम करायला जाल, तर ते अयोग्य ठरेल. कोणत्याही उद्दिष्टासाठी त्याच विचाराने पुढील निवडणुका येईपर्यंत सातत्याने काम करायला हवे. विद्यमान स्थितीत काँग्रेसला आघाडी करण्याची इच्छा असून, ती प्रत्यक्षात येण्यासाठी आमचे जोरकस प्रयत्न सुरू आहेत.ते म्हणाले की, देशात सर्व राज्यांत जागा जिंकू शकेल असा विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. बाकी पक्ष आपापल्या राज्यात उत्तम कामगिरी बजावू शकतात. देशातील लोकसभेच्या एकूण जागा व एखाद्या राज्यातील जागा यांच्या वाटपाबाबत होणाऱ्या चर्चेमध्ये खूपच फरक असतो. जागावाटपामध्ये व्यावहारिक तोडगा काढणे जास्त महत्त्वाचे आहे. आघाडीत सामील होणाºया विरोधी पक्षांनी हे भान राखायला हवे.>आघाडीच्या स्थापनेत अनेक अडचणीकाँग्रेसने आघाडीचा प्रयत्न चालविला असला तरी ते उद्दिष्ट साध्य होण्यात अनेक अडचणी आहेत. बसपाच्या प्रमुख मायावती यांनी मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ येथील विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याचे जाहीर केले आहे.मध्यप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने काँग्रेसबरोबर युती करण्यास नकार दिला आहे. काँग्रेस आघाडी फार काळ टिकवत नाही, असा या पक्षाचा आरोप आहे.सलमान खुर्शीद म्हणाले की, मोदी सरकारचा लोकसभा निवडणुकांत पराभव करणे हाच आघाडी स्थापन करण्यामागचा उद्देश आहे. हा मूळ हेतूच विसरला गेला, तर अपेक्षित यश मिळणार नाही. त्यात आघाडीतील प्रत्येक पक्षाचे व पर्यायाने देशाचेही नुकसान होईल.

टॅग्स :congressकाँग्रेस