शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

भाजपला सत्तेतून हटविण्यासाठी हवी विरोधी पक्षांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 04:28 IST

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करणे ही गोष्ट सध्याच्या स्थितीत काँग्रेससाठी कठीण आहे, असे मत त्या पक्षाचे नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले आहे.

कोलकाता : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करणे ही गोष्ट सध्याच्या स्थितीत काँग्रेससाठी कठीण आहे, असे मत त्या पक्षाचे नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले आहे. भाजपला सत्तेतून घालविण्यासाठीच विरोधी पक्षांची आघाडी स्थापन झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.खुर्शीद म्हणाले की, काँग्रेसवर मर्यादा येणार नाहीत याची दक्षता विरोधी पक्षांबरोबर आघाडी करताना घेण्यात यावी. अशी आघाडी करताना प्रत्येकाला काही ना काही त्याग करावाच लागेल. तशाच मनोभूमिकेतून विरोधी पक्षांनी चर्चेत सहभागी झाले पाहिजे. स्वबळावर सरकार स्थापन करण्याचे उद्दिष्ट मनात असेल, तर त्यादृष्टीने काँग्रेसला पुढील पाच वर्षे काम करावे लागेल. विरोधी पक्षांच्या आघाडीत तीन वर्षे राहिल्यानंतर त्यातून एकदम बाहेर पडून पुढची दोन वर्षे स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी काम करायला जाल, तर ते अयोग्य ठरेल. कोणत्याही उद्दिष्टासाठी त्याच विचाराने पुढील निवडणुका येईपर्यंत सातत्याने काम करायला हवे. विद्यमान स्थितीत काँग्रेसला आघाडी करण्याची इच्छा असून, ती प्रत्यक्षात येण्यासाठी आमचे जोरकस प्रयत्न सुरू आहेत.ते म्हणाले की, देशात सर्व राज्यांत जागा जिंकू शकेल असा विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. बाकी पक्ष आपापल्या राज्यात उत्तम कामगिरी बजावू शकतात. देशातील लोकसभेच्या एकूण जागा व एखाद्या राज्यातील जागा यांच्या वाटपाबाबत होणाऱ्या चर्चेमध्ये खूपच फरक असतो. जागावाटपामध्ये व्यावहारिक तोडगा काढणे जास्त महत्त्वाचे आहे. आघाडीत सामील होणाºया विरोधी पक्षांनी हे भान राखायला हवे.>आघाडीच्या स्थापनेत अनेक अडचणीकाँग्रेसने आघाडीचा प्रयत्न चालविला असला तरी ते उद्दिष्ट साध्य होण्यात अनेक अडचणी आहेत. बसपाच्या प्रमुख मायावती यांनी मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ येथील विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याचे जाहीर केले आहे.मध्यप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने काँग्रेसबरोबर युती करण्यास नकार दिला आहे. काँग्रेस आघाडी फार काळ टिकवत नाही, असा या पक्षाचा आरोप आहे.सलमान खुर्शीद म्हणाले की, मोदी सरकारचा लोकसभा निवडणुकांत पराभव करणे हाच आघाडी स्थापन करण्यामागचा उद्देश आहे. हा मूळ हेतूच विसरला गेला, तर अपेक्षित यश मिळणार नाही. त्यात आघाडीतील प्रत्येक पक्षाचे व पर्यायाने देशाचेही नुकसान होईल.

टॅग्स :congressकाँग्रेस