शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

नितीशकुमार यांचा तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 07:02 IST

भूमिका केली स्पष्ट; अनेक मुद्यांवर मतभेद

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जनता दल (संयुक्त) या पक्षाने केंद्र सरकारच्या तिहेरी तलाकविरोधी विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आमचा पक्ष या विधेयकाला राज्यसभेत विरोध करील, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जाहीर केले आहे.याआधीही जनता दल (संयुक्त)ने तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला विरोधच केला होता. राज्यसभेत भाजपचे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे आतापर्यंत तिहेरी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर झाले नव्हते आणि केंद्र सरकारला वटहुकूम काढावा लागला होता.आता नव्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने संमती दिली असली आणि ते लोकसभेत मंजूर होणार, हे स्पष्ट असले तरी राज्यसभेत विरोधी पक्ष त्याला पाठिंबा देणार नाहीत आणि त्यांच्यासमवेत जनता दल (संयुक्त)चे सदस्यही असतील.

केवळ तिहेरी तलाकविरोधी विधेयकालाच नितीशकुमार यांच्या पक्षाचा विरोध नसून, जम्मू-काश्मीरबाबतचे ३७0 कलम, समान नागरी कायदा आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी या मुद्यांवरही भाजप व नितीशकुमार यांच्या पक्षामध्ये मतभेद आहेत. आमचा पक्ष केंद्रात भाजपप्रणीत रालोआमध्ये सहभागी असला तरी त्याचा अर्थ आम्हाला भाजपचे सारे म्हणणे मान्य आहे, असा होत नाही, हे जनता दलाने आधीच स्पष्ट केले आहे. तिहेरी तलाकविरोधी विधेयकाबाबत सरकारने अल्पसंख्यांक समाजातील लोकांशी चर्चा करायला हवी, त्यांचे म्हणणे जाणून घ्यायला हवे, सरकारने आपली भूमिका त्यांना पटवायला हवी. तसे न करता बहुमताच्या जोरावर विधेयक मान्य करून घेण्याचा प्रयत्न झाल्यास त्यातून त्या समाजात अस्वस्थता निर्माण होईल, हे जनता दलाचे म्हणणे आहे.राम मंदिराबाबतही दोन्ही समाजांत एकमत व्हायला हवे आणि त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा, असे जनता दलाला वाटत आहे.फक्त केंद्रात सोबतच्जनता दल (संयुक्त) हा पक्ष केंद्रातील भाजपप्रणीत रालोआमध्ये सहभागी आहे. याचा अर्थ आम्ही बिहारखेरीज अन्य राज्यांत विधानसभेच्या निवडणुका लढवू नयेत, असे होत नाही. आम्ही किमान चार राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहोत, असेही त्या पक्षाने म्हटले आहे.काश्मीरविषयीच्या ३७0 कलम रद्द करण्याला जनता दलाचा विरोध आहे. तसा प्रयत्न केल्यास काश्मीरमध्ये अशांततेची व दुहीची आणखी बीजे पेरली जातील. संपूर्ण खोऱ्यातील लोकांना भारताविषयी राग उत्पन्न होईल, असे जनता दलाच्या एका नेत्याने बोलून दाखवले.च्त्यामुळे आधी काश्मिरी जनतेशी संवाद साधायला हवा, तेथील जनतेत विश्वास निर्माण करायला हवा. राजकीय सामोपचारातूनच काश्मीर प्रश्न सुटेल, त्याकडे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न समजून चालणार नाही, अशी त्या पक्षाची भूमिका आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारtriple talaqतिहेरी तलाक