शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नितीशकुमार यांचा तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 07:02 IST

भूमिका केली स्पष्ट; अनेक मुद्यांवर मतभेद

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जनता दल (संयुक्त) या पक्षाने केंद्र सरकारच्या तिहेरी तलाकविरोधी विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आमचा पक्ष या विधेयकाला राज्यसभेत विरोध करील, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जाहीर केले आहे.याआधीही जनता दल (संयुक्त)ने तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला विरोधच केला होता. राज्यसभेत भाजपचे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे आतापर्यंत तिहेरी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर झाले नव्हते आणि केंद्र सरकारला वटहुकूम काढावा लागला होता.आता नव्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने संमती दिली असली आणि ते लोकसभेत मंजूर होणार, हे स्पष्ट असले तरी राज्यसभेत विरोधी पक्ष त्याला पाठिंबा देणार नाहीत आणि त्यांच्यासमवेत जनता दल (संयुक्त)चे सदस्यही असतील.

केवळ तिहेरी तलाकविरोधी विधेयकालाच नितीशकुमार यांच्या पक्षाचा विरोध नसून, जम्मू-काश्मीरबाबतचे ३७0 कलम, समान नागरी कायदा आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी या मुद्यांवरही भाजप व नितीशकुमार यांच्या पक्षामध्ये मतभेद आहेत. आमचा पक्ष केंद्रात भाजपप्रणीत रालोआमध्ये सहभागी असला तरी त्याचा अर्थ आम्हाला भाजपचे सारे म्हणणे मान्य आहे, असा होत नाही, हे जनता दलाने आधीच स्पष्ट केले आहे. तिहेरी तलाकविरोधी विधेयकाबाबत सरकारने अल्पसंख्यांक समाजातील लोकांशी चर्चा करायला हवी, त्यांचे म्हणणे जाणून घ्यायला हवे, सरकारने आपली भूमिका त्यांना पटवायला हवी. तसे न करता बहुमताच्या जोरावर विधेयक मान्य करून घेण्याचा प्रयत्न झाल्यास त्यातून त्या समाजात अस्वस्थता निर्माण होईल, हे जनता दलाचे म्हणणे आहे.राम मंदिराबाबतही दोन्ही समाजांत एकमत व्हायला हवे आणि त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा, असे जनता दलाला वाटत आहे.फक्त केंद्रात सोबतच्जनता दल (संयुक्त) हा पक्ष केंद्रातील भाजपप्रणीत रालोआमध्ये सहभागी आहे. याचा अर्थ आम्ही बिहारखेरीज अन्य राज्यांत विधानसभेच्या निवडणुका लढवू नयेत, असे होत नाही. आम्ही किमान चार राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहोत, असेही त्या पक्षाने म्हटले आहे.काश्मीरविषयीच्या ३७0 कलम रद्द करण्याला जनता दलाचा विरोध आहे. तसा प्रयत्न केल्यास काश्मीरमध्ये अशांततेची व दुहीची आणखी बीजे पेरली जातील. संपूर्ण खोऱ्यातील लोकांना भारताविषयी राग उत्पन्न होईल, असे जनता दलाच्या एका नेत्याने बोलून दाखवले.च्त्यामुळे आधी काश्मिरी जनतेशी संवाद साधायला हवा, तेथील जनतेत विश्वास निर्माण करायला हवा. राजकीय सामोपचारातूनच काश्मीर प्रश्न सुटेल, त्याकडे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न समजून चालणार नाही, अशी त्या पक्षाची भूमिका आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारtriple talaqतिहेरी तलाक