शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

"भाजपने माझं म्हणणं खरं ठरवलं"; गुजरातमधल्या दगडफेकीवरुन राहुल गांधी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 12:32 IST

Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुजरात काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर झालेल्या दगडफेकीबाबत भाष्य केले.

Gujarat Congress Office Protest : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेवरुन लोकसभेत मोठा गोंधळ उडाला. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करताना हिंदू समाजाबाबत एक विधान केले होते. राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन गुजरातमधील अहमदाबाद येथील गुजरात प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पोस्टरला काळे फासले. त्यानंतर मंगळवारी गुजरात काँग्रेस मुख्यालयाबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेकही केली. यावरुन आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला.

अधिवेशनादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, गुजरातमध्येही इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे, असे राहुल गांधी म्हणाले. इंडिया आघाडी तुम्हाला गुजरातमध्ये पराभूत करणार आहे, असेही राहुल गांधीनी म्हटलं होतं. त्याआधी राहुल गांधी यांनी स्वत:ला हिंदू म्हणवून घेणारे भाजपवाले हिंसा आणि द्वेष पसरवत आहेत, ते हिंदू असूच शकत नाहीत, असं विधान केलं होतं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणून हिणवणं अत्यंत गंभीर आहे, असं विधान केलं होतं. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे पडसाद गुजरातमध्ये उमटले. 

राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये घडलेल्या घटनेनंतर सोशल मिडिया पोस्टमधून भाजपला पुन्हा लक्ष्य केलं. "गुजरात काँग्रेसच्या कार्यालयावर झालेल्या भ्याड आणि हिंसक हल्ल्याने भाजप आणि संघ परिवाराविषयीचे माझं वक्तव्य खरं ठरवत आहे. हिंसाचार आणि द्वेष पसरवणाऱ्या भाजपच्या लोकांना हिंदू धर्माची मूलभूत तत्त्वेच कळत नाहीत. गुजरातची जनता त्यांच्या खोटेपणावरून स्पष्टपणे पाहू शकते आणि भाजप सरकारला निर्णायक धडा शिकवेल. मी पुन्हा सांगतोय गुजरातमध्ये इंडिया आघाडी जिंकणार आहे!," असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गुजरात काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर झालेल्या दगडफेकीनंतर दोन्ही बाजूंच्या अनेक कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पालडी परिसरात घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. शांततापूर्ण आंदोलनावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी हिंसाचार सुरू केल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांना जबाबदार धरले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाGujaratगुजरातcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी