शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

"भाजपने माझं म्हणणं खरं ठरवलं"; गुजरातमधल्या दगडफेकीवरुन राहुल गांधी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 12:32 IST

Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुजरात काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर झालेल्या दगडफेकीबाबत भाष्य केले.

Gujarat Congress Office Protest : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेवरुन लोकसभेत मोठा गोंधळ उडाला. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करताना हिंदू समाजाबाबत एक विधान केले होते. राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन गुजरातमधील अहमदाबाद येथील गुजरात प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पोस्टरला काळे फासले. त्यानंतर मंगळवारी गुजरात काँग्रेस मुख्यालयाबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेकही केली. यावरुन आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला.

अधिवेशनादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, गुजरातमध्येही इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे, असे राहुल गांधी म्हणाले. इंडिया आघाडी तुम्हाला गुजरातमध्ये पराभूत करणार आहे, असेही राहुल गांधीनी म्हटलं होतं. त्याआधी राहुल गांधी यांनी स्वत:ला हिंदू म्हणवून घेणारे भाजपवाले हिंसा आणि द्वेष पसरवत आहेत, ते हिंदू असूच शकत नाहीत, असं विधान केलं होतं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणून हिणवणं अत्यंत गंभीर आहे, असं विधान केलं होतं. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे पडसाद गुजरातमध्ये उमटले. 

राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये घडलेल्या घटनेनंतर सोशल मिडिया पोस्टमधून भाजपला पुन्हा लक्ष्य केलं. "गुजरात काँग्रेसच्या कार्यालयावर झालेल्या भ्याड आणि हिंसक हल्ल्याने भाजप आणि संघ परिवाराविषयीचे माझं वक्तव्य खरं ठरवत आहे. हिंसाचार आणि द्वेष पसरवणाऱ्या भाजपच्या लोकांना हिंदू धर्माची मूलभूत तत्त्वेच कळत नाहीत. गुजरातची जनता त्यांच्या खोटेपणावरून स्पष्टपणे पाहू शकते आणि भाजप सरकारला निर्णायक धडा शिकवेल. मी पुन्हा सांगतोय गुजरातमध्ये इंडिया आघाडी जिंकणार आहे!," असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गुजरात काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर झालेल्या दगडफेकीनंतर दोन्ही बाजूंच्या अनेक कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पालडी परिसरात घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. शांततापूर्ण आंदोलनावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी हिंसाचार सुरू केल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांना जबाबदार धरले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाGujaratगुजरातcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी