शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

“वायनाडमधून नाही, राहुल गांधींनी युपीतून निवडणूक लढवावी”; INDIA गटातील नेत्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 18:47 IST

Opposition INDIA Alliance: उत्तर प्रदेशात काँग्रेस जिंकू शकत नाही. त्यामुळेच राहुल गांधी केरळमध्ये आले, अशी टीका इंडिया आघाडीतील एका नेत्याने केली आहे.

Opposition INDIA Alliance: पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच विरोधकांच्या इंडिया आघाडीची होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यातच आता विरोधकांच्या आघाडीत सामील असलेल्या एका पक्षाच्या नेत्याने एक सल्ला दिला आहे. वाडनाडमधून नाही, तर राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवावी, असे म्हटले आहे. 

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठा पराभव झाल्यानंतर इंडिया आघाडीत सामील असलेले पक्ष काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी दक्षिण भारतात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे हिंदी पट्ट्यात काँग्रेसची पकड कमकुवत होऊ लागली आहे, असे दावा करत, सीपीएम नेते एमव्ही गोविंदन यांनी राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. केरळमध्ये भाजप नाही. राहुल गांधींनी एलडीएफ विरोधात नव्हे तर भाजपविरोधात निवडणूक लढवावी, असा सल्ला गोविंदन यांनी दिला आहे. 

राहुल गांधींनी वायनाडमधून पुढची निवडणूक लढवू नये

कॉमन सेंस असलेली कोणतीही व्यक्ती सांगेल की, आता राहुल गांधींनी वायनाडमधून पुढील निवडणूक लढवू नये. असे केल्यास काँग्रेसची हिंदी बहुल भागातील पकड कमकुवत होईल. पुन्हा केरळमधून निवडणूक लढवली, तर राहुल गांधींना भाजपविरोधात नाही तर डाव्या पक्षांविरोधात निवडणूक लढवायची आहे, असा संकेत जाईल, असा तर्क गोविंदन यांनी मांडला आहे. असे ते म्हणाले. गेल्या २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढवली होती आणि विक्रमी मतांनी विजय मिळवला होता.

दरम्यान, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सीपीएमसह अनेक पक्षांनी काँग्रेसवर टीका केली आहे. केरळमध्ये मुस्लिम लीगने काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्याशिवाय काँग्रेसला काही करता आले नसते. उत्तर प्रदेशात काँग्रेस जिंकू शकत नाही आणि त्यामुळेच राहुल गांधी केरळमध्ये आले आहे. यावरून हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेसचा तितकासा प्रभाव नाही, हे स्पष्ट होते, असेही गोविंदन यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी