शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

“वायनाडमधून नाही, राहुल गांधींनी युपीतून निवडणूक लढवावी”; INDIA गटातील नेत्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 18:47 IST

Opposition INDIA Alliance: उत्तर प्रदेशात काँग्रेस जिंकू शकत नाही. त्यामुळेच राहुल गांधी केरळमध्ये आले, अशी टीका इंडिया आघाडीतील एका नेत्याने केली आहे.

Opposition INDIA Alliance: पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच विरोधकांच्या इंडिया आघाडीची होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यातच आता विरोधकांच्या आघाडीत सामील असलेल्या एका पक्षाच्या नेत्याने एक सल्ला दिला आहे. वाडनाडमधून नाही, तर राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवावी, असे म्हटले आहे. 

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठा पराभव झाल्यानंतर इंडिया आघाडीत सामील असलेले पक्ष काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी दक्षिण भारतात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे हिंदी पट्ट्यात काँग्रेसची पकड कमकुवत होऊ लागली आहे, असे दावा करत, सीपीएम नेते एमव्ही गोविंदन यांनी राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. केरळमध्ये भाजप नाही. राहुल गांधींनी एलडीएफ विरोधात नव्हे तर भाजपविरोधात निवडणूक लढवावी, असा सल्ला गोविंदन यांनी दिला आहे. 

राहुल गांधींनी वायनाडमधून पुढची निवडणूक लढवू नये

कॉमन सेंस असलेली कोणतीही व्यक्ती सांगेल की, आता राहुल गांधींनी वायनाडमधून पुढील निवडणूक लढवू नये. असे केल्यास काँग्रेसची हिंदी बहुल भागातील पकड कमकुवत होईल. पुन्हा केरळमधून निवडणूक लढवली, तर राहुल गांधींना भाजपविरोधात नाही तर डाव्या पक्षांविरोधात निवडणूक लढवायची आहे, असा संकेत जाईल, असा तर्क गोविंदन यांनी मांडला आहे. असे ते म्हणाले. गेल्या २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढवली होती आणि विक्रमी मतांनी विजय मिळवला होता.

दरम्यान, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सीपीएमसह अनेक पक्षांनी काँग्रेसवर टीका केली आहे. केरळमध्ये मुस्लिम लीगने काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्याशिवाय काँग्रेसला काही करता आले नसते. उत्तर प्रदेशात काँग्रेस जिंकू शकत नाही आणि त्यामुळेच राहुल गांधी केरळमध्ये आले आहे. यावरून हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेसचा तितकासा प्रभाव नाही, हे स्पष्ट होते, असेही गोविंदन यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी