शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

“वायनाडमधून नाही, राहुल गांधींनी युपीतून निवडणूक लढवावी”; INDIA गटातील नेत्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 18:47 IST

Opposition INDIA Alliance: उत्तर प्रदेशात काँग्रेस जिंकू शकत नाही. त्यामुळेच राहुल गांधी केरळमध्ये आले, अशी टीका इंडिया आघाडीतील एका नेत्याने केली आहे.

Opposition INDIA Alliance: पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच विरोधकांच्या इंडिया आघाडीची होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यातच आता विरोधकांच्या आघाडीत सामील असलेल्या एका पक्षाच्या नेत्याने एक सल्ला दिला आहे. वाडनाडमधून नाही, तर राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवावी, असे म्हटले आहे. 

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठा पराभव झाल्यानंतर इंडिया आघाडीत सामील असलेले पक्ष काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी दक्षिण भारतात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे हिंदी पट्ट्यात काँग्रेसची पकड कमकुवत होऊ लागली आहे, असे दावा करत, सीपीएम नेते एमव्ही गोविंदन यांनी राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. केरळमध्ये भाजप नाही. राहुल गांधींनी एलडीएफ विरोधात नव्हे तर भाजपविरोधात निवडणूक लढवावी, असा सल्ला गोविंदन यांनी दिला आहे. 

राहुल गांधींनी वायनाडमधून पुढची निवडणूक लढवू नये

कॉमन सेंस असलेली कोणतीही व्यक्ती सांगेल की, आता राहुल गांधींनी वायनाडमधून पुढील निवडणूक लढवू नये. असे केल्यास काँग्रेसची हिंदी बहुल भागातील पकड कमकुवत होईल. पुन्हा केरळमधून निवडणूक लढवली, तर राहुल गांधींना भाजपविरोधात नाही तर डाव्या पक्षांविरोधात निवडणूक लढवायची आहे, असा संकेत जाईल, असा तर्क गोविंदन यांनी मांडला आहे. असे ते म्हणाले. गेल्या २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढवली होती आणि विक्रमी मतांनी विजय मिळवला होता.

दरम्यान, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सीपीएमसह अनेक पक्षांनी काँग्रेसवर टीका केली आहे. केरळमध्ये मुस्लिम लीगने काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्याशिवाय काँग्रेसला काही करता आले नसते. उत्तर प्रदेशात काँग्रेस जिंकू शकत नाही आणि त्यामुळेच राहुल गांधी केरळमध्ये आले आहे. यावरून हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेसचा तितकासा प्रभाव नाही, हे स्पष्ट होते, असेही गोविंदन यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी