शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 19:46 IST

"गेली 100 दिवस विरोधक काय काय बोलले, हे आपण बघितले आहे. माझी खिल्ली उडवली गेली. विविध प्रकारचे तर्क वितर्क दिले गेले, मजा उडवली गेली. एवढे होऊनही मोदी गप्प का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. एवढी खिल्ली उडवली जात होती. अपमान केला जात आहे. पण..."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांचा हिशेब जनते समोर मांडला. यावेळी ते म्हणाले, या काळात आपली प्रचंड खिल्ली उडवली गेली, चेष्टा केली गेली, अपमानित केले गेले. मात्र आपण लक्ष्य साध्य करण्यासाठी सातत्याने कार्यरत होतो. यामुळे सर्व काही शांतपणे सहन करत होतो. ते अहमदाबादमध्ये विविध विकास कामांच्या शुभारंभ आणि लोकार्पणासाठी आयोजित कार्यक्रमावेळी बोलत होते.

पंतप्रधान म्हणाले, देशातील जनतेने 60 वर्षांनंतर एक नवा इतिहास रचला आहे. एका सरकारला सलग तिसऱ्यांदा देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे. ही भारताच्या लोकशाहीतील एक मोठी घटना आहे. मी निवडणूक काळात देशातील जनतेला गॅरंटी दिली होती की, सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्या 100 दिवसांत देशासाठी अभूतपूर्व निर्णय घेण्यात येतील. गेल्या 100 दिवसांत मी दिवस, रात्र बघितली नाही. 100 दिवसांचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकद झोकून दिली. देशात असो वा परदेशात जेथे जे प्रयत्न करायचे होते, ते केले. कुठलीही कसर बाकी ठेवली नाही.

विरोधकांवर आपली खिल्ली उडवल्याचा आरोप करत मोदी म्हणाले, "गेली 100 दिवस विरोधक काय काय बोलले, हे आपण बघितले आहे. माझी खिल्ली उडवली गेली. विविध प्रकारचे तर्क वितर्क दिले गेले, मजा उडवली गेली. एवढे होऊनही मोदी गप्प का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. एवढी खिल्ली उडवली जात होती. अपमान केला जात आहे. पण, माझ्या गुजराती बंधू-भगिनींनो हा सरदार पटेलांच्या भूमीत जन्माला आलेला मुलगा आहे. सर्व प्रकारच्या खिल्ल्या आणि अपमान सहन करत, एक प्रण करत 100 दिवसांत आपल्या कल्याणासाठी धोरणे बनवण्यात आणि तुमच्या कल्याणाचे निर्णय घेण्यात व्यस्त राहिलो. ज्यांना ज्या पद्धतीने खिल्ली उडवायची आहे, उडवा. त्यांना पण तर आनंद वाटावा. घ्या... मी कसल्याही प्रकारचे उत्तर द्यायचे नाही, हे निश्चित केले होते."

मोदी म्हणाले, "या 100 दिवसांत 15 लाख कोटींहून अधिक योजनांवर काम सुरू झाले आहे. ३ कोटी कुटुंबांना घरे देण्याच्या योजनेवर वेगाने काम सुरू आहे. 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची हमी पूर्ण करण्यात आली आहे. या 100 दिवसांत तरुणांच्या रोजगारासाठी मोठे निर्णय घेण्यात आले. तरुणांसाठी 2 लाख कोटी रुपयांचे विशेष पीएम पॅकेज जाहीर करण्यात आले. याचा फायदा 4 कोटींहून अधिक तरुणांना होणार आहे. आता कंपनीत पहिल्या नोकरीची पहिली सॅलरीही सरकार देईल. तिसऱ्या टर्मच्या पहिल्या 100 दिवसांत गुजरातसह संपूर्ण देशात 11 लाख नवीन लखपती दिदी तयार झाल्या आहेत."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGujaratगुजरात