शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 19:46 IST

"गेली 100 दिवस विरोधक काय काय बोलले, हे आपण बघितले आहे. माझी खिल्ली उडवली गेली. विविध प्रकारचे तर्क वितर्क दिले गेले, मजा उडवली गेली. एवढे होऊनही मोदी गप्प का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. एवढी खिल्ली उडवली जात होती. अपमान केला जात आहे. पण..."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांचा हिशेब जनते समोर मांडला. यावेळी ते म्हणाले, या काळात आपली प्रचंड खिल्ली उडवली गेली, चेष्टा केली गेली, अपमानित केले गेले. मात्र आपण लक्ष्य साध्य करण्यासाठी सातत्याने कार्यरत होतो. यामुळे सर्व काही शांतपणे सहन करत होतो. ते अहमदाबादमध्ये विविध विकास कामांच्या शुभारंभ आणि लोकार्पणासाठी आयोजित कार्यक्रमावेळी बोलत होते.

पंतप्रधान म्हणाले, देशातील जनतेने 60 वर्षांनंतर एक नवा इतिहास रचला आहे. एका सरकारला सलग तिसऱ्यांदा देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे. ही भारताच्या लोकशाहीतील एक मोठी घटना आहे. मी निवडणूक काळात देशातील जनतेला गॅरंटी दिली होती की, सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्या 100 दिवसांत देशासाठी अभूतपूर्व निर्णय घेण्यात येतील. गेल्या 100 दिवसांत मी दिवस, रात्र बघितली नाही. 100 दिवसांचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकद झोकून दिली. देशात असो वा परदेशात जेथे जे प्रयत्न करायचे होते, ते केले. कुठलीही कसर बाकी ठेवली नाही.

विरोधकांवर आपली खिल्ली उडवल्याचा आरोप करत मोदी म्हणाले, "गेली 100 दिवस विरोधक काय काय बोलले, हे आपण बघितले आहे. माझी खिल्ली उडवली गेली. विविध प्रकारचे तर्क वितर्क दिले गेले, मजा उडवली गेली. एवढे होऊनही मोदी गप्प का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. एवढी खिल्ली उडवली जात होती. अपमान केला जात आहे. पण, माझ्या गुजराती बंधू-भगिनींनो हा सरदार पटेलांच्या भूमीत जन्माला आलेला मुलगा आहे. सर्व प्रकारच्या खिल्ल्या आणि अपमान सहन करत, एक प्रण करत 100 दिवसांत आपल्या कल्याणासाठी धोरणे बनवण्यात आणि तुमच्या कल्याणाचे निर्णय घेण्यात व्यस्त राहिलो. ज्यांना ज्या पद्धतीने खिल्ली उडवायची आहे, उडवा. त्यांना पण तर आनंद वाटावा. घ्या... मी कसल्याही प्रकारचे उत्तर द्यायचे नाही, हे निश्चित केले होते."

मोदी म्हणाले, "या 100 दिवसांत 15 लाख कोटींहून अधिक योजनांवर काम सुरू झाले आहे. ३ कोटी कुटुंबांना घरे देण्याच्या योजनेवर वेगाने काम सुरू आहे. 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची हमी पूर्ण करण्यात आली आहे. या 100 दिवसांत तरुणांच्या रोजगारासाठी मोठे निर्णय घेण्यात आले. तरुणांसाठी 2 लाख कोटी रुपयांचे विशेष पीएम पॅकेज जाहीर करण्यात आले. याचा फायदा 4 कोटींहून अधिक तरुणांना होणार आहे. आता कंपनीत पहिल्या नोकरीची पहिली सॅलरीही सरकार देईल. तिसऱ्या टर्मच्या पहिल्या 100 दिवसांत गुजरातसह संपूर्ण देशात 11 लाख नवीन लखपती दिदी तयार झाल्या आहेत."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGujaratगुजरात