शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

२०२४ साठी नव्या चेहऱ्यांना संधी; मंत्रिमंडळ विस्तारासोबत भाजपा संघटनेत होणार बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 21:40 IST

पक्ष संघटनेच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी दोन बड्या मंत्र्यांकडे दिली जाऊ शकते, अशा बातम्या येत आहेत.

नवी दिल्ली - पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने ही माहिती दिली. पक्षाच्या संघटनेत मोठे फेरबदल केले जाऊ शकतात, असंही सांगण्यात आले. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू होती. जानेवारी महिन्यात विस्तार होईल बोलले गेले. त्यानंतर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी विस्ताराबाबत निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा होती. 

यानंतर १० जून ही नवीन तारीख आली. ही तारीखही निघून गेली. त्यानंतर चर्चा सुरू झाली की, PM मोदींच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे. पंतप्रधान याच आठवड्यात अमेरिकेला रवाना होत आहेत. मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण होत असताना भाजप देशभरात महिनाभर महासंपर्क अभियान राबवत आहे. ३१ मेपासून सुरू झालेला हा उपक्रम ३० जूनपर्यंत चालणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेहून परतणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला देशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

जुलै २०२१ मध्ये मंत्रिमंडळात फेरबदलज्यासाठी भाजपा एनडीएचा विस्तार करण्यात व्यस्त आहे. तेलगू देसम पक्ष, जेडीएस, अकाली दल आणि हम सारख्या पक्षांशी सतत चर्चा सुरू आहे. याशिवाय इतर काही प्रादेशिक पक्षांसोबत युतीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. २०१९ मध्ये मोदी पार्ट-२ सरकार स्थापन झाल्यापासून जुलै २०२१ मध्ये एकदाच फेरबदल झाला आहे. यानंतर १८ मे रोजी किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय घेण्यात आले. त्यांच्या जागी अर्जुन राम मेघनाद यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. तर मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात तीन मोठे फेरबदल करण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याची तयारी सुरू आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून काही लोकांना पक्षसंघटनेत पाठवले जाऊ शकते. तसेच संघटनेतील अनेक बड्या चेहऱ्यांना डच्चू दिला जाईल असं निश्चित मानलं जात आहेत. भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने सांगितले की, कोण बाहेर आणि कोण आत हे फक्त पंतप्रधान मोदी आणि अमित शाह या दोनच लोकांना हे माहित आहे, बाकी सर्व अंदाज वर्तवत आहेत.

पक्ष संघटनेच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी दोन बड्या मंत्र्यांकडे दिली जाऊ शकते, अशा बातम्या येत आहेत. लोकसभेतील खासदारांना मंत्रिमंडळात प्राधान्य द्यावे, असे बोलले जात आहे. ज्या मंत्र्यांची कामगिरी चांगली आहे त्यांना काढलं जाणार नाही. गेल्या फेरबदलात प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांना वगळण्यात आले होते. जेडीयू एनडीएपासून वेगळे झाल्यानंतर आरसीपी सिंह यांचीही जागा रिक्त आहे. शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटालाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र, बिहार आणि बंगाल ही राज्ये भाजपासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. या राज्यांतील नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो, अशी बातमी आहे.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारBJPभाजपा