शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
3
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
4
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
5
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
6
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
7
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
8
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
9
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
10
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
11
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
12
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
13
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
14
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
16
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
17
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
18
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
19
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
20
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

विरोधकांचा आरोप राजकीय हेतूनेच टीप : सदर बातमी आजच अंबडला पाठविणे अपेक्षित

By admin | Updated: March 18, 2016 23:59 IST

दत्ता गायकवाड : रिझर्व्ह बॅँकेचे निकष पूर्ण केल्याने आठ शाखांना परवानगी

दत्ता गायकवाड : रिझर्व्ह बॅँकेचे निकष पूर्ण केल्याने आठ शाखांना परवानगीनाशिकरोड : नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँकेने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विविध संस्थांकडून ११ पुरस्कार मिळाले आहे. व्यवसायात झालेली लक्षणीय वाढ व बॅँकेची झालेली चौफेर प्रगती याला नजरेआड करत विरोधी गटाच्या संचालकांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन आरोप केले असल्याचे प्रतिउत्तर बॅँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी दिले आहे. रिझर्व्ह बॅँकेकडून व्यापारी बॅँकेला आठ नवीन शाखा उघडण्याची परवानगी दिली आहे. याबाबत विरोधी गटाच्या पाच संचालकांनी नवीन शाखा उघडण्यास विरोध दर्शवून बॅँक नुकसानीच्या दिशेने वाटचाल करेल असा आरोप केला होता. याबाबत शुक्रवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गायकवाड यांनी गेल्या पाच-सहा वर्षांत बॅँकेने अद्ययावत डाटा सेंटर, रिझर्व्ह बॅँकेने दिलेल्या निर्धारित वेळेच्या आत पूर्ण केलेले कोअर बॅँकिंग, एटीएम सेंटर सुविधा या बाबींची पूर्तता केली. २००४ साली बॅँकेचा ढोबळ एनपीए ४९ टक्के असताना बॅँकेस १ कोटी २० लाख रुपयांचा तोटा झाला होता. रिझर्र्व्ह बॅँकेच्या निर्बंधामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बॅँकेला वाटचाल करावी लागली. विद्यमान संचालकांच्या कार्यकाळात बॅँकेच्या व्यवसायात लक्षणीय वाढ होऊन बॅँकेने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याने बॅँकेने नवीन शाखांची परवानगी मागितली होती. नवीन शाखांसाठी रिझर्व्ह बॅँकेचे आवश्यक असलेले सीआरएआर १० टक्क्यापेक्षा जास्त, ढोबळ एनपीए ७ टक्क्यापेक्षा कमी व निव्वळ एनपीए ३ टक्क्यांपेक्षा कमी, गेल्या ४ वर्षांपैकी सलग ३ वर्षे बॅँक सतत नफ्यात असावी, मागील आर्थिक वर्षात सीआरआर / एसएलआर यांचे उल्लंघन नसावे. सशक्त अंतर्गत नियमन प्रणाली व संचालक मंडळात कमीत कमी दोन व्यावसायिक संचालकांची नेमणूक, बॅँक कोअर बॅँकिंग सोल्युशनने पूर्ण असावी, गेल्या तीन वर्षात आरबीआय कडून कोणत्याही प्रकारचा आर्थिक दंड झालेला नसावा किंवा नियमांचा भंग केल्याबद्दल आरबीआयकडून ताकीद मिळालेली नसावी, हे सर्व निकष बॅँकेने पाळल्यानेच बॅँकेला नवीन शाखांना परवानगी मिळाल्याचे स्पष्टीकरण दिले. विरोधी संचालकांनी नवीन शाखा सुरू केल्यास बॅँकेची आर्थिक स्थिती ढासळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ती चुकीची असून व्यवसायाच्या शाखा वाढल्या तरच व्यवसायाची भरभराट होते हे लक्षात घ्यायला हवे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, उपाध्यक्ष सुधाकर जाधव, रंजना बोराडे, डॉ. डी. जी. पेखळे, श्याम चाफळकर, डॉ. प्रशांत भुतडा, मनोहर कोरडे, भाऊसाहेब पाळदे आदि संचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)