शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

विरोधकांची ‘ईडी’वर धाड; बॅरिकेड्स अन् प्रचंड फौजफाट्याने मोर्चा अडवला, जेपीसीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 06:25 IST

काँग्रेससह १६ विरोधी पक्षांच्या या मोर्चात तृणमूलचा सहभाग नव्हता.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अदानी प्रकरणाच्या संसदीय समिती चौकशीची (जेपीसी) मागणी करत संसद भवनापासून ईडी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढणाऱ्या काँग्रेससह १६ विरोधी पक्षांच्या नेत्यांना दिल्ली पोलिसांनी बुधवारी बॅरिकेड्स उभारून विजय चौकाजवळ रोखले. पुढे जाणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विरोधकांनी मोर्चा स्थगित केला.

पोलिसांनी ध्वनिक्षेपकाचा वापर करून आंदोलक खासदारांना क्षेत्र रिकामे करण्याचे आवाहन केले. जेव्हा नेते बॅरिकेड ओलांडू शकले नाहीत, तेव्हा त्यांनी आपला मोर्चा मागे घेतला. विरोधी पक्षांच्या या मोर्चात तृणमूलचा भाग नव्हता. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती वाढल्याच्या निषेधार्थ त्यांच्या खासदारांनी संसद भवन संकुलातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली.

सरकार लोकशाही कमकुवत करतेय : काँग्रेस

मोदी सरकारवर एका उद्योगपतीला वाचवण्यासाठी संसदेचे कामकाज ठप्प करून देशातील लोकशाही पोकळ आणि कमकुवत केल्याचा आरोप केला. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सरकार संसदेत जे काही करत आहे, ते देशातील लोकशाहीचा ऱ्हास होत असल्याचा पुरावा आहे.

संसदेत ‘ॲक्शन रिप्ले’ 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही आदल्या दिवशीच्या कामकाजाचा ‘ॲक्शन रिप्ले’ दाखवल्यासारखे कामकाज झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लंडनमधील वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी रान उठवले, तर विरोधकांनी अदानी प्रकरणात संसदीय समिती चौकशीची (जेपीसी) मागणी लावून धरली. गदारोळातच दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करावे लागले.

‘इलारा’-अदानी’बद्दल प्रश्नचिन्ह

- अदानी समूहाचा मोठा गुंतवणूकदार याच कंपनीच्या संरक्षणविषयक कंपनीत भागीदार असल्याचा दावा करणाऱ्या एका वृत्ताबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला. 

- ‘इलारा इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड’ ही कंपनी मॉरिशसमध्ये नोंदणीकृत चारपैकी एक कंपनी आहे, जी अदानी ग्रुप ऑफ कंपनीजची प्रमुख भागधारक आहे. बंगळुरूस्थित संरक्षण कंपनी ‘अल्फा डिझाइन टेक्नॉलॉजी’मध्ये अदानी समूहासोबत एलारा आयओएफ मालकांपैकी एक आहे.  

- इस्रो आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) या कंपनीशी जवळून काम करते. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड का केली जात आहे, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

भारतातील लोकशाहीवर हल्ले चढविण्यात येत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली होती.सरकारवर देशात किंवा परदेशात टीका करण्याचा नागरिकाला हक्क आहे. त्यासाठी त्याला देशविरोधी ठरविता येणार नाही,नागरिकाने आपल्या सरकारवर देशात किंवा परदेशात टीका करणे ही काही नवीन घटना नाही. मोदी यांनीही विदेश दौऱ्यांमध्ये आपल्या विरोधकांवर टीका होती. - कपिल सिब्बल, राज्यसभेचे खासदार  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ParliamentसंसदEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय