शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

ओपिनिअन पोलमुळे मतदान घटले? पक्ष बाजुलाच राहिले! पहिल्या टप्प्यावरून निवडणूक आयोगच चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 15:20 IST

लोकसभेला पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये तीन टक्क्यांची घट दिसून आली आहे. २०१९ मध्ये ६९ टक्के मतदान झाले होते. परंतु यंदा पहिल्या टप्प्यात ६६ टक्के मतदान झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान कमी झाल्याने निवडणूक आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिलला पार पडला. सोशल मीडिया, एसएमएस, फोन आदींवरून राजकीय पक्षांनी प्रचार केला. याचबरोबर निवडणूक आयोगानेही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. एवढे करूनही २०१९ च्या तुलनेत कमी मतदान झाल्याने निवडणूक आयोग चिंतेत आला आहे. राजकीय पक्षांची धाकधूक वाढलेली असताना आयोगाने उरलेल्या टप्प्यांत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नवीन तयारी सुरु केली आहे. 

या लोकसभेला पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये तीन टक्क्यांची घट दिसून आली आहे. २०१९ मध्ये ६९ टक्के मतदान झाले होते. परंतु यंदा पहिल्या टप्प्यात ६६ टक्के मतदान झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान कमी झाल्याने निवडणूक आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी लोकांमध्ये उत्साह होता, परंतु ते मतदान केंद्रावर येऊन मतदान करतील एवढा नव्हता, असे आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. मतदान वाढविण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. स्वीप कार्यक्रमानुसार मतदान वाढविण्याची मोहिम आखण्यात आली आहे. प्रसिद्ध व्यक्तींना निवडणूक आयोगाचा दूत बनवून लोकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मतदान केंद्रांनाही चांगले बनविण्यात आले आहे. परंतु असे वाटतेय की हे प्रयत्न पुरेसे नसतात, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

कमी मतदाना का झाले, याची चौकशी निवडणूक आयोग करत आहे. यामागे काही कारणेही आयोगाच्या लक्षात आली आहेत. या आठवड्याच्या अखेरीस असलेल्या बैठकांमध्ये यावर चर्चा केली जाणार आहे. मतदान कमी होण्यामागे उष्णता हे देखील एक कारण असू शकते, असे सुत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले. यावेळी २०१९ च्या तुलनेत ८ दिवस उशिराने निवडणूक सुरु झाली आहे. तसेच मतदानाच्या पूर्वीच काही संस्था, चॅनेल्स कल कोणाकडे आहे हे दाखवितात यामुळे देखील मतदारांमध्ये मतदानाविषयी उदासिनता दिसत आहे. तसेच लग्नसमारंभ, हवामान आदी देखील कारणीभूत असल्याचे आयोगाला वाटत आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग