शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
3
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
4
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
5
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
6
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
9
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
10
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
11
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
12
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
13
‘सैयारा’- एक अख्खी पिढी इतकी पागल का झाली आहे?
14
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
15
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
16
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
17
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
19
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
20
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  

ओपिनिअन पोलमुळे मतदान घटले? पक्ष बाजुलाच राहिले! पहिल्या टप्प्यावरून निवडणूक आयोगच चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 15:20 IST

लोकसभेला पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये तीन टक्क्यांची घट दिसून आली आहे. २०१९ मध्ये ६९ टक्के मतदान झाले होते. परंतु यंदा पहिल्या टप्प्यात ६६ टक्के मतदान झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान कमी झाल्याने निवडणूक आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिलला पार पडला. सोशल मीडिया, एसएमएस, फोन आदींवरून राजकीय पक्षांनी प्रचार केला. याचबरोबर निवडणूक आयोगानेही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. एवढे करूनही २०१९ च्या तुलनेत कमी मतदान झाल्याने निवडणूक आयोग चिंतेत आला आहे. राजकीय पक्षांची धाकधूक वाढलेली असताना आयोगाने उरलेल्या टप्प्यांत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नवीन तयारी सुरु केली आहे. 

या लोकसभेला पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये तीन टक्क्यांची घट दिसून आली आहे. २०१९ मध्ये ६९ टक्के मतदान झाले होते. परंतु यंदा पहिल्या टप्प्यात ६६ टक्के मतदान झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान कमी झाल्याने निवडणूक आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी लोकांमध्ये उत्साह होता, परंतु ते मतदान केंद्रावर येऊन मतदान करतील एवढा नव्हता, असे आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. मतदान वाढविण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. स्वीप कार्यक्रमानुसार मतदान वाढविण्याची मोहिम आखण्यात आली आहे. प्रसिद्ध व्यक्तींना निवडणूक आयोगाचा दूत बनवून लोकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मतदान केंद्रांनाही चांगले बनविण्यात आले आहे. परंतु असे वाटतेय की हे प्रयत्न पुरेसे नसतात, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

कमी मतदाना का झाले, याची चौकशी निवडणूक आयोग करत आहे. यामागे काही कारणेही आयोगाच्या लक्षात आली आहेत. या आठवड्याच्या अखेरीस असलेल्या बैठकांमध्ये यावर चर्चा केली जाणार आहे. मतदान कमी होण्यामागे उष्णता हे देखील एक कारण असू शकते, असे सुत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले. यावेळी २०१९ च्या तुलनेत ८ दिवस उशिराने निवडणूक सुरु झाली आहे. तसेच मतदानाच्या पूर्वीच काही संस्था, चॅनेल्स कल कोणाकडे आहे हे दाखवितात यामुळे देखील मतदारांमध्ये मतदानाविषयी उदासिनता दिसत आहे. तसेच लग्नसमारंभ, हवामान आदी देखील कारणीभूत असल्याचे आयोगाला वाटत आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग