शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 22:49 IST

Operation Sindoor:या कारवाईनंतर भारताविरोधात आक्रमक झालेल्या पाकिस्तानचे अवसान पुरते गळाले आहे. तसेच आम्ही संयम पाळू, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी म्हटले आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी मंगळवारी रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर जबरदस्त एअर स्ट्राईक केली होती. या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश ए मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनांचं जबर नुकसान झालं आहे. तसेच भारतीय सैन्यदलांनी थेट पाकिस्तानमधील काही अड्ड्यांना लक्ष्य केल्याने पाकिस्तानी लष्कराची पुरती नाचक्की झाली आहे. दरम्यान, या कारवाईनंतर भारताविरोधात आक्रमक झालेल्या पाकिस्तानचे अवसान पुरते गळाले आहे. तसेच आम्ही संयम पाळू, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे परराष्टमंत्री इसाक डार यांनी भारताने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या कारवाईचा विषय आणखी न वाढवण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणीलले की, मी किमान २६ देशांच्या प्रमुखांशी बोललो आहे. सर्वांनी भारत आणि पाकिस्तान यांनी सध्याचा निर्माण झालेला तणाव हा अधिक वाढवता कामा नये, असा सल्ला दिला आहे. आम्हीही संयम बाळगू असं आश्वासन त्यांना दिलं आहे. आम्ही काल रात्री भारताच्या हल्ल्यांना प्रभावीपणे उत्तर दिलं आहे. आता भारताने पुन्हा काही कारवाई केली तर त्याला आणखी जोरदार प्रत्युत्तर देऊ, अशी धमकीही त्यांनी दिली.

यावेळी सिंधू पाणी कराराबाबत इशाक डार म्हणाले की, जगातील कुठलाही देश आपल्या वाट्याचं एक थेंबही पाणी सोडू इच्छित नाही. आम्हाला याबाबत एकत्र बसून बोलावं लागेल, असं प्रत्येकजण म्हणतोय. मात्र याबाबत कुठलीही चर्चा होत नाही आहे. भारत आपल्या प्रसारमाध्यमांच्या मदतीने या प्रकरणी हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पुलवामाच्या वेळीही त्यांनी असंच केलं होतं, असा आरोपही त्यांनी केला.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तान