शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 22:49 IST

Operation Sindoor:या कारवाईनंतर भारताविरोधात आक्रमक झालेल्या पाकिस्तानचे अवसान पुरते गळाले आहे. तसेच आम्ही संयम पाळू, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी म्हटले आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी मंगळवारी रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर जबरदस्त एअर स्ट्राईक केली होती. या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश ए मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनांचं जबर नुकसान झालं आहे. तसेच भारतीय सैन्यदलांनी थेट पाकिस्तानमधील काही अड्ड्यांना लक्ष्य केल्याने पाकिस्तानी लष्कराची पुरती नाचक्की झाली आहे. दरम्यान, या कारवाईनंतर भारताविरोधात आक्रमक झालेल्या पाकिस्तानचे अवसान पुरते गळाले आहे. तसेच आम्ही संयम पाळू, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे परराष्टमंत्री इसाक डार यांनी भारताने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या कारवाईचा विषय आणखी न वाढवण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणीलले की, मी किमान २६ देशांच्या प्रमुखांशी बोललो आहे. सर्वांनी भारत आणि पाकिस्तान यांनी सध्याचा निर्माण झालेला तणाव हा अधिक वाढवता कामा नये, असा सल्ला दिला आहे. आम्हीही संयम बाळगू असं आश्वासन त्यांना दिलं आहे. आम्ही काल रात्री भारताच्या हल्ल्यांना प्रभावीपणे उत्तर दिलं आहे. आता भारताने पुन्हा काही कारवाई केली तर त्याला आणखी जोरदार प्रत्युत्तर देऊ, अशी धमकीही त्यांनी दिली.

यावेळी सिंधू पाणी कराराबाबत इशाक डार म्हणाले की, जगातील कुठलाही देश आपल्या वाट्याचं एक थेंबही पाणी सोडू इच्छित नाही. आम्हाला याबाबत एकत्र बसून बोलावं लागेल, असं प्रत्येकजण म्हणतोय. मात्र याबाबत कुठलीही चर्चा होत नाही आहे. भारत आपल्या प्रसारमाध्यमांच्या मदतीने या प्रकरणी हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पुलवामाच्या वेळीही त्यांनी असंच केलं होतं, असा आरोपही त्यांनी केला.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तान