शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
2
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
3
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
4
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
5
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
6
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
7
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
8
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
9
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
10
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
11
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
12
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
13
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
14
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
15
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
16
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
17
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
18
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
19
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
20
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 22:49 IST

Operation Sindoor:या कारवाईनंतर भारताविरोधात आक्रमक झालेल्या पाकिस्तानचे अवसान पुरते गळाले आहे. तसेच आम्ही संयम पाळू, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी म्हटले आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी मंगळवारी रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर जबरदस्त एअर स्ट्राईक केली होती. या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश ए मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनांचं जबर नुकसान झालं आहे. तसेच भारतीय सैन्यदलांनी थेट पाकिस्तानमधील काही अड्ड्यांना लक्ष्य केल्याने पाकिस्तानी लष्कराची पुरती नाचक्की झाली आहे. दरम्यान, या कारवाईनंतर भारताविरोधात आक्रमक झालेल्या पाकिस्तानचे अवसान पुरते गळाले आहे. तसेच आम्ही संयम पाळू, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे परराष्टमंत्री इसाक डार यांनी भारताने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या कारवाईचा विषय आणखी न वाढवण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणीलले की, मी किमान २६ देशांच्या प्रमुखांशी बोललो आहे. सर्वांनी भारत आणि पाकिस्तान यांनी सध्याचा निर्माण झालेला तणाव हा अधिक वाढवता कामा नये, असा सल्ला दिला आहे. आम्हीही संयम बाळगू असं आश्वासन त्यांना दिलं आहे. आम्ही काल रात्री भारताच्या हल्ल्यांना प्रभावीपणे उत्तर दिलं आहे. आता भारताने पुन्हा काही कारवाई केली तर त्याला आणखी जोरदार प्रत्युत्तर देऊ, अशी धमकीही त्यांनी दिली.

यावेळी सिंधू पाणी कराराबाबत इशाक डार म्हणाले की, जगातील कुठलाही देश आपल्या वाट्याचं एक थेंबही पाणी सोडू इच्छित नाही. आम्हाला याबाबत एकत्र बसून बोलावं लागेल, असं प्रत्येकजण म्हणतोय. मात्र याबाबत कुठलीही चर्चा होत नाही आहे. भारत आपल्या प्रसारमाध्यमांच्या मदतीने या प्रकरणी हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पुलवामाच्या वेळीही त्यांनी असंच केलं होतं, असा आरोपही त्यांनी केला.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तान