शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 23:56 IST

Operation Sindoor: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे.

Operation Sindoor: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आज(8 मे) रात्री 9 च्या सुमारास अचानक भारतावर हल्ले सुरू केले. आधीपासून तयारीत असलेल्या भारतीय सैन्यानेही या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. विशेष म्हणजे, भारताने फक्त पाकिस्तानचे हल्लेच हाणून पाडले नाही, तर पाकिस्तानात घुसून अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली. या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे.

सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दहशतवादाचा जोरदार मुकाबला करण्यासाठी भारताला पाठिंबा जाहीर केला. जयशंकर यांनी ट्विट करून पाकिस्तानला कडक इशाराही दिला आहे. जर पाकिस्तानने भारतावर कोणताही लष्करी हल्ला केला, तर त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे जयशंकर म्हणाले.

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी युरोपियन युनियनच्या मानवाधिकार प्रमुखांशीही चालू घडामोडींवर चर्चा केली. त्यांनी सांगितले की भारताने आपल्या कृतींमध्ये संयम बाळगला आहे. पण, कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला कडक प्रत्युत्तर दिले जाईल. जयशंकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आज मी अमेरिकेचे सचिव मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत काम करण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेचे मी मनापासून कौतुक करतो. दहशतवाद वाढवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाS. Jaishankarएस. जयशंकरPakistanपाकिस्तान