शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
3
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
4
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
5
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
6
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
7
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
8
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
9
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
10
'सैराट'मधील इंटिमेट सीनबद्दल पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू, म्हणाली- "मी घाबरले होते, पण..."
11
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
12
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
13
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
14
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
16
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
17
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
18
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
19
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:55 IST

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयासह 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.

Operation Sindoor: अखेर भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच आहे. मध्यरात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय लष्करी कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयासह 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यात शेकडो दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानने शरणागती पत्कारली आहे.

भारताने केलेल्या या हल्ल्याकडे दोन्ही देशांमधील युद्ध सुरू होण्याचे संकेत म्हणून पाहिले जात होते. पण, युद्ध सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, 'आम्ही भारताविरुद्ध कोणतीही शत्रुत्वाची कारवाई करत नाही आहोत, आम्ही फक्त आमच्या भूमीचे रक्षण करत आहोत. भारताने पुढील कारवाई केली नाही, तर आम्हीही काहीही करणार नाही.'

दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेजम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची गोळ्या घालून क्रुरपणे हत्या केली होती. त्या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होत होता. भारताने पाकिस्तानसोबत आरपारची लढाई करावी, अशी प्रत्येक भारतीयाची भावना होती. गेल्या काही दिवसांपासून याबाबत तयारीही सुरू होती. आता अखेर भारताने त्या घटनेचा बदला घेतलाच. बुधवारी मध्यरात्री 1-2 च्या सुमारास भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ले केले. या हल्ल्यात मोस्ट वॉन्टेड मसूद अझहाच्या कुटुंबातील 14 सदस्यांचाही खात्मा झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान