शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 15:43 IST

Operation sindoor updates: ऑपरेशन सिंदूरबद्दल भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेऊन या मोहिमेबद्दल महत्त्वाचे अपडेट्स दिले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये बदल झाल्याचे यावेळी डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले. 

२२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी पहलगाममधील बैसरन पठारावर पर्यटकांवर हल्ला केला. २६ पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केली. दहशतवाद्यांकडून गेल्या काही वर्षात नागरिकांनाही लक्ष्य केलं जात असल्याचा मुद्दा आज भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी अधोरेखित केला. २०१४ पासून सुरू झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यांच्या पापाचा घडा पहलगाममध्ये भरला, असे ते म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

लष्कराच्या तिन्ही दलाच्या अधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेबद्दलची अधिक माहिती दिली. यावेळी लष्कराच्या अधिकाऱ्याने पाकिस्तानचे हल्ले कसे हाणून पाडले, याचेही पुरावेही दाखवले. 

पहलगाममध्ये त्यांच्या पापाचा घडा भरला -राजीव घई

डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, "दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये बदल होत चालले आहेत. लष्करासोबतच आता निष्पाप नागरिकांवर, जे स्वतःचे संरक्षण करण्यात अपयशी ठरतात. त्यांच्यावरही हल्ले केले जात आहेत."

वाचा >>'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान

"२०२४ मध्ये जम्मूमधील शिवखोरी मंदिराकडे जाताना भाविकांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आता यावर्षी एप्रिलमध्ये पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर हल्ला करण्यात आला. हा दहशतवादी हल्ल्यांचा ट्रेंड बदलला असल्याची उदाहरणे आहेत. शिवखोरीनंतर पहलगामममध्ये त्यांच्या पापाचा घडा भरला होता. त्यानंतर जे घडलं आहे, त्याबद्दल आम्ही सविस्तर बोललो आहे", असे राजीव घई म्हणाले. 

'आम्हाला माहिती होतं की, पाकिस्तान हल्ले करणार'

"भारताने हवाई हल्ले केले. आम्हाला पूर्ण जाणिव होती की, पाकिस्तानचा हल्लाही अशाच प्रकारे असेल, त्यामुळे आम्ही आपली एअर डिफेन्स यंत्रणा पूर्णपणे सज्ज केलेली होती", अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 

"आम्ही सज्ज होतो. हवाई संरक्षण प्रणालीही तयार होती. आपली हवाई संरक्षण प्रणाली भिंतीसारखी तयार होती. पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडण्याची आम्ही आधीच तयारी केली होती. जब हौंसले बुलंद हो, तो मंजिले भी कदम चुमती है", असे उद्गार राजीव घई यांनी यावेळी काढले.     

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तान