शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 14:37 IST

Operation Sindoor News: भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांचे अड्डे उडवत पहलगाम हल्ल्याचे उत्तर दिले. भारताच्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेबद्दल शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी प्रतिक्रिया दिली. 

Avimukteshwaranand Saraswati News: पहलगामध्ये दहशतवाद्यांनी क्रूरतेचा कळस गाठला. कुणाला पतीसमोर, तर कुणाला मुलांसमोर गोळ्या घातल्या. दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूरतेला भारतीय लष्कराने जशास तसे उत्तर दिले. ७ मे रोजीच्या रात्री भारताने दहशतवाद्यांची आणि त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानची झोपच उडवली. पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी कौतुक केले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पहलगाममधील बैसरन पठारावर २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. त्याचबरोबर १७ पर्यटक या हल्ल्यात जखमी झाले. या घटनेनंतर भारतातच नव्हे तर जगभरात पडसाद उमटले. भारतीयांनी आणि जगभरातील देशांनी या हल्ल्याची निंदा केली. तसेच दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही केली गेली. 

भारताने ७ मे रोजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांना धडा शिकवला. भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत ९ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. तर ९० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईचे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी स्वागत केले. 

आता कुंकवाचा पराक्रम कळला असेल?

"बघा सिंदूर (कुंकू) आपली आन, बाण आणि शान आहे. आमच्या माता-भगिनी जेव्हा तो लावतात, तेव्हा त्यांचा प्रकट होतो. त्या कुंकवाचा तुम्ही अपमान केला आहे. एक भगिनीसमोर तुम्ही तिच्या पतीला मारलं. तर हे स्वाभाविक आहे की, जे कुंकू तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न केला, त्याच कुंकवासाठी आमच्या सरकारने ऑपरेशन केलं. आता तुम्हाला कळेल की, कुंकवाचा काय पराक्रम आहे", असे अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले. 

बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय उडवले

भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरमध्ये या हे मुख्यालयच उडवले. भारताने डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. हल्ल्यानंतर त्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. मसूद अजहर आणि त्याचे कुटुंबीयही इथे राहत होते, अशीही माहिती समोर आली आहे. 

भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील १० लोक ठार झाले आहेत. तर ४ जवळच्या लोकांचाही खात्मा करण्यात आला.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक