शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
2
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
3
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
4
मजुराला रस्त्याच्या कडेला सापडला एक दगड, घरी नेल्यावर कळलं की...; क्षणात आयुष्य बदलले!
5
दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास
6
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
7
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
8
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
9
Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक
10
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
11
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
12
वेस्ट इंडीजची टीम इंडियाला कडवी टक्कर; तब्बल १२ वर्षानंतर पाहावा लागला 'लाजिरवाणा' दिवस!
13
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
14
IND vs WI : दोन शतकवीरांसह शेपटीनं दमवलं! टीम इंडियावर चौथ्यांदा आली ही वेळ
15
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
16
भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
17
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
19
खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं
20
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी

Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 13:39 IST

Operation Sindoor : २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे.

शुभम आणि ऐशन्या यांचं लग्न होऊन दोन महिनेही झाले नव्हते. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूर करत चोख प्रत्युत्तर दिलं. लष्कराने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. ऐशन्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. "ऑपरेशन सिंदूर हे आमच्या वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर आहे, ज्यामध्ये शुभम आणि माझ्यासारख्या इतर महिलांचे पती दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. आमचं कुंकू आता शौर्य आणि देशभक्तीचा संकल्प बनलं आहे" असं म्हटलं.

२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांपैकी कानपूरचा शुभम हा एक होता. ऐशन्याच्या लग्नाला ६० दिवसही झाले नव्हते. "मला अभिमान आहे की, शुभमने देशासाठी आपलं बलिदान दिलं, पण माझं कुंकू हिरावून घेतलं. आता माझी प्रार्थना आहे की, इतर कोणत्याही महिलेला या वेदना सहन कराव्या लागू नयेत."

'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ

"ऑपरेशनचे नाव पाहून मी खूप भावनिक झाले"

"ऑपरेशन सिंदूर असं नाव देऊन त्यांनी आम्हाला एक पर्सनल मेसेज दिला आहे की, आम्ही तुमच्यासाठी बदला घेतला आहे. ऑपरेशनचे नाव पाहून मी खूप भावनिक झाले आहे, शुभमचा फोटो पाहून मी एकटीच खूप रडले. सरकारने असंही सांगितलं की त्यांनी असं उत्तर दिले आहे की आता तुमची आमच्या देशातील कोणत्याही मुलाला किंवा नागरिकाला मारण्याची हिंमत होणार नाही."

"हा बदला आहे"

"आता आणखी एक शुभम या देशातून जाणार नाही. मला विश्वास आहे की, दहशतवादाचा पूर्णपणे खात्मा करण्यासाठी, उर्वरित दहशतवाद्यांना देखील टार्गेट केलं जाईल. हा बदला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की, दहशतवाद्यांना आणू नका, त्यांना सांगू नका. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्या, सैन्यानेही तेच केलं" असंही ऐशन्याने म्हटलं आहे. 

"कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

लोक जनशक्ती पक्षाच्या खासदार शांभवी चौधरी यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सैन्याच्या शौर्याचं आणि पराक्रमाचं कौतुक केलं. "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं. आम्ही भारतीय सैन्याला सलाम करतो. आपल्या शांत झोपेमागे सैन्याचा पराक्रम आणि बलिदान आहे. दहशतवाद्यांचे अड्डे अत्यंत सावधगिरीने उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाममधील हिंदूंवरील हल्ल्याचा बदला आहे. भारताच्या अखंडतेवर आणि सार्वभौमत्वावर हल्ला करणाऱ्यांना योग्य उत्तर मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण झाला आहे. त्यांनी दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईचं आश्वासन दिलं होतं" असं शांभवी चौधरी यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Armyभारतीय जवान