शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 09:48 IST

लोकसभा सभागृहात ऑपरेशन सिंदूर यावर चर्चा सुरू होती. त्यात खासदार राशीद यांनी सहभाग घेतला.

नवी दिल्ली - लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच जम्मू काश्मीरच्या बारामुला मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले खासदार इंजिनिअर राशीद यांनी या चर्चेत सहभाग घेतला. आता यापुढे मी इथं येऊ शकत नाही. हे माझं अखेरचं बोलणे आहे. कारण माझ्याकडे इतका पैसा नाही ज्यामुळे मी संसदेत येऊ शकेन असं चर्चेवेळी राशीद यांनी म्हटलं. 

खासदार राशीद तिहार जेलमध्ये बंद आहेत. त्यांना संसदेत आणण्यासाठी आणि परत घेऊन जाण्यासाठी खूप संरक्षण द्यावे लागते. मागील दिवसांत त्यांच्यावर १७ लाखांचा दंड आकारला गेला आहे. हा दंड त्यांच्यावर केवळ संसदेत ने-आण करण्यासाठी लावण्यात आला आहे. संसदेत खासदार राशीद यांना आणण्यासाठी दीड लाखाहून अधिक खर्च होतो. कोर्टाच्या सुनावणीत हा खर्च खासदारांना उचलावा लागेल असं सांगण्यात आले आहे. त्यामुळे संसदेत भाषण करताना राशीद यांनी माझ्याकडे इतका पैसा नाही, की मी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी इतकी मोठी रक्कम भरू शकेन. आता मी संसदेत येऊ शकत नाही. आज दीड लाख खर्च करून इथं आलोय, त्यामुळे मला बोलू द्या असं खासदार राशीद यांनी लोकसभेत सांगितले.

संसदेत काय बोलले खासदार राशीद?

लोकसभा सभागृहात ऑपरेशन सिंदूर यावर चर्चा सुरू होती. त्यात खासदार राशीद यांनी सहभाग घेतला. ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर माझ्या मतदारसंघातच झाले. आज तिथे लोक त्रस्त आहेत, मला बोलू द्यावे. पुन्हा मी संसदेत येऊ शकत नाही कारण माझ्याकडे दीड लाख रूपये नाहीत. कुठून आणू इतका पैसा, त्यामुळे मला बोलू द्यायला हवे. आम्ही काश्मिरींपेक्षा जास्त पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबाचं दु:ख जाणतो कारण आम्ही १९८९ पासून हजारो लोक गमावले आहेत. काश्मीरात जितकं नुकसान झालं ते आमच्यापेक्षा जास्त कुणाला समजणार नाही. आम्ही मृतदेह उचलताना पाहिलेत. पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला माणुसकीचा खून आहे असं त्यांनी म्हटलं. 

कोर्टाच्या सुनावणीत ठेवल्या होत्या अटी

बारामुला मतदारसंघाचे खासदार इंजिनिअर राशीद अनेक वर्षापासून जेलमध्ये आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूकही जेलमधून लढवली होती. टेरर फंडिंगच्या आरोपाखाली NIA ने त्यांना अटक केली होती. संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी राशीद यांनी जामीन मागितला होता. पॅरोल कस्टडी अंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेत त्यांना सोडले जाते. यावेळी त्यांच्यासोबत अनेक पोलीस हजर असतात. इंजिनिअर राशीद यांना कोर्टाकडून २४ जुलै ४ ऑगस्टपर्यंत पॅरोल मिळाला आहे मात्र कोर्टाने त्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. राशीद यांना त्यांच्या प्रवासासाठी आणि सुरक्षेसाठी होणारा खर्च स्वत: भागवावा लागेल. म्हणजेच राशीद जर एक दिवसासाठी संसदेत गेले तर त्यासाठी दीड लाखाच्या आसपास त्यांना खर्च द्यावा लागेल. त्यामुळेच ऑपरेशन सिंदूरवर चर्चेवेळी त्यांनी हे विधान केले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरlok sabhaलोकसभाPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाParliamentसंसद