शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 10:32 IST

India-Pakistan ceasefire, Operation Sindoor: एकीकडे पाकिस्तानी ड्रोन एकामागोमाग एक पाडले जात होते, तर भारताची मिसाईल बिनदिक्कत लष्करी तळांवर आदळत होती. १० मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये युद्धविरामाची चर्चा झाली होती.

भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट येत आहे. युद्धविरामाची मुदत येत्या १८ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. नवी दिल्ली आणि इस्लामाबादचे डीजीएमओ लवकरच चर्चा करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. 

दोन्ही देशांच्या डीजीएमओंच्या हॉटलाईनवरील चर्चेवेळी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती एनडीटीव्हीला सुत्रांनी दिली आहे. १० मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये युद्धविरामाची चर्चा झाली होती. यानुसार सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी अतिदक्षता पातळी कमी करणे, पाकिस्तानी लष्कराकडून हल्ले थांबविणे आदींवर सहतमी बनली होती. यानंतर पुन्हा १२ मे रोजी चर्चा झाली. यावेळी सामंजस्य करारानुसार सैन्याची सतर्कतेची पातळी कमी करणे आणि दोन्ही देशांदरम्यान विश्वास निर्माण करण्याचे उपाय सुरु ठेवण्यावर चर्चा झाली होती. 

भारत-पाकिस्तानमध्ये चार दिवस मिसाईल आणि ड्रोन हल्ले सुरु होते. भारताने पाकिस्तानचे दहशतवादी तळ तर उध्वस्त केलेच परंतू १३ पैकी ११ एअरबेसनाही नुकसान पोहोचविले होते. एकीकडे पाकिस्तानी ड्रोन एकामागोमाग एक पाडले जात होते, तर भारताची मिसाईल बिनदिक्कत लष्करी तळांवर आदळत होती. यामुळे नामोहरम झालेल्या पाकिस्तानने अखेर १० तारखेला दुपारी साडेतीन वाजता भारताला फोन फिरविला व हल्ले थांबविण्याची विनंती केली. भारताने ती मान्य करत यापुढे पाकव्याप्त काश्मीरवरच पाकिस्तानसोबत चर्चा होऊ शकते अशी अट ठेवली आहे.

भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या इस्लामाबादनेही आता शांती हवी असल्याचा जप करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. तसेच भारताने पाणी सोडण्याचीही इस्लाबादकडून विनंती करण्यात आली आहे. परंतू, भारताने ती फेटाळली आहे.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Armyभारतीय जवान