शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

ऑपरेशन कावेरी : सुदानमधून 600 हून अधिक नागरिक सुरक्षितपणे भारतात दाखल, 3500 भारतीय अजूनही अडकले आहेत; बचावकार्य सुरूच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 13:45 IST

सुदानमधील संकटात अडकलेल्या भारतीय नागरिकांना 'ऑपरेशन कावेरी' अंतर्गत भारतात आणले जात आहे.

नवी दिल्ली : सुदानमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. त्यामुळे सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सरकार भारतीय लष्कराच्या मदतीने बचाव मोहीम राबवत आहे. सुदानमधील संकटात अडकलेल्या भारतीय नागरिकांना 'ऑपरेशन कावेरी' अंतर्गत भारतात आणले जात आहे. या ऑपरेशनअंतर्गत आतापर्यंत किती भारतीयांना आपल्या देशात परत आणण्यात आले आहे, यासंदर्भात परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितले की, "15 एप्रिलपासून संघर्ष सुरू झाल्यानंतर आम्ही सुदानमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत. सुदानमध्ये जवळपास 3500 भारतीय आणि 1000 पीआयओ असल्याचा आमचा अंदाज आहे." याशिवाय, सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी तिसरे नौदलाचे जहाज आयएनएस तरकश देखील आज सुदान बंदरावर पोहोचले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीत त्यांनी आढावा घेतला आणि अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जवळपास 600 लोक भारतात पोहोचले आहेत. 246 लोकांना महाराष्ट्र राज्यात पाठवले जात आहे", असे विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितले. तसेच, भारताला अनेक विनंत्या मिळाल्या आहेत, ज्यामध्ये इतर देशांच्या नागरिकांनाही स्थलांतर करण्यास सांगण्यात आले आहे, अशीही  परराष्ट्र सचिवांनी माहिती दिली. 

आतापर्यंत सुमारे 600 भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आफ्रिकन देश सुदानमधून आतापर्यंत सुमारे 600 भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी 360 भारतीयांना सौदी अरेबियातून चार्टर फ्लाइटद्वारे भारतात सुखरूप आणण्यात आले. 246 प्रवाशांना सी-17 विमानातून महाराष्ट्रात पाठवले जात आहे. तसेच, मिळालेल्या माहितीनुसार, 495 भारतीय अजूनही जेद्दाहमध्ये आहेत, त्यांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्याची तयारी सुरू आहे.

सर्वाधिक प्रभावित क्षेत्र खार्तूमसुदानमधील सर्वाधिक प्रभावित क्षेत्र असलेल्या खार्तूममधून भारतीयांना सुदानच्या सुरक्षित बंदरात आणण्यासाठी बसेसचा वापर केला जात आहे. मात्र, तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, अशा परिस्थितीत सर्वांना सुरक्षित ठेवणे हे मोठे आव्हान आहे. सर्वांना खार्तूमहून सुदान बंदरात आणले जात आहेत, जिथे भारतीय नौदलाचे जहाज आयएनएस तरकश आधीच उपस्थित आहे. 

टॅग्स :Indiaभारत