शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन कावेरी : सुदानमधून 600 हून अधिक नागरिक सुरक्षितपणे भारतात दाखल, 3500 भारतीय अजूनही अडकले आहेत; बचावकार्य सुरूच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 13:45 IST

सुदानमधील संकटात अडकलेल्या भारतीय नागरिकांना 'ऑपरेशन कावेरी' अंतर्गत भारतात आणले जात आहे.

नवी दिल्ली : सुदानमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. त्यामुळे सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सरकार भारतीय लष्कराच्या मदतीने बचाव मोहीम राबवत आहे. सुदानमधील संकटात अडकलेल्या भारतीय नागरिकांना 'ऑपरेशन कावेरी' अंतर्गत भारतात आणले जात आहे. या ऑपरेशनअंतर्गत आतापर्यंत किती भारतीयांना आपल्या देशात परत आणण्यात आले आहे, यासंदर्भात परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितले की, "15 एप्रिलपासून संघर्ष सुरू झाल्यानंतर आम्ही सुदानमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत. सुदानमध्ये जवळपास 3500 भारतीय आणि 1000 पीआयओ असल्याचा आमचा अंदाज आहे." याशिवाय, सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी तिसरे नौदलाचे जहाज आयएनएस तरकश देखील आज सुदान बंदरावर पोहोचले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीत त्यांनी आढावा घेतला आणि अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जवळपास 600 लोक भारतात पोहोचले आहेत. 246 लोकांना महाराष्ट्र राज्यात पाठवले जात आहे", असे विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितले. तसेच, भारताला अनेक विनंत्या मिळाल्या आहेत, ज्यामध्ये इतर देशांच्या नागरिकांनाही स्थलांतर करण्यास सांगण्यात आले आहे, अशीही  परराष्ट्र सचिवांनी माहिती दिली. 

आतापर्यंत सुमारे 600 भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आफ्रिकन देश सुदानमधून आतापर्यंत सुमारे 600 भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी 360 भारतीयांना सौदी अरेबियातून चार्टर फ्लाइटद्वारे भारतात सुखरूप आणण्यात आले. 246 प्रवाशांना सी-17 विमानातून महाराष्ट्रात पाठवले जात आहे. तसेच, मिळालेल्या माहितीनुसार, 495 भारतीय अजूनही जेद्दाहमध्ये आहेत, त्यांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्याची तयारी सुरू आहे.

सर्वाधिक प्रभावित क्षेत्र खार्तूमसुदानमधील सर्वाधिक प्रभावित क्षेत्र असलेल्या खार्तूममधून भारतीयांना सुदानच्या सुरक्षित बंदरात आणण्यासाठी बसेसचा वापर केला जात आहे. मात्र, तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, अशा परिस्थितीत सर्वांना सुरक्षित ठेवणे हे मोठे आव्हान आहे. सर्वांना खार्तूमहून सुदान बंदरात आणले जात आहेत, जिथे भारतीय नौदलाचे जहाज आयएनएस तरकश आधीच उपस्थित आहे. 

टॅग्स :Indiaभारत