शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

पळा, पळा.. मिसाईल पडलं... इस्रायलमध्ये एका मोबाईल App ने वाचवला भारतीयांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 11:39 IST

Israel Palestine Conflict : इस्रायलमधील हल्ल्यादरम्यान एका एपने त्याच्यासारख्या अनेक भारतीयांना खूप मदत केली.

इस्रायलमधील विद्यार्थ्यांसह सुमारे 200 भारतीय शुक्रवारी पहाटे चार्टेर्ड फ्लाइटने दिल्लीत पोहोचले. गेल्या शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांनंतर या प्रदेशात तणाव पसरला, ज्याचा परिणाम म्हणून भारताने मायदेशी परत येऊ इच्छिणाऱ्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू केले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्ली विमानतळावर प्रवाशांचे स्वागत केले. त्यांनी हात जोडून सर्वांना अभिवादन केलं आणि 'घरी स्वागत आहे' असं म्हटलं. 

विद्यार्थ्यांनी याच दरम्यान न्यूज 18 इंडियासोबत त्यांचे अनुभव शेअर केले आणि क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यान मोबाईल एपने त्यांचा जीव कसा वाचवला ते सांगितलं. त्यांनी सांगितलं की, हल्ल्याचा इशारा मिळताच ते घरातून निघून बंकरमध्ये जायचे. केंद्र सरकारच्या ऑपरेशन अजय अंतर्गत इस्रायलहून खास चार्टर्ड फ्लाइटने आयजीआय विमानतळावर परतलेला पंजाबचा रहिवासी विशेष याने संवाद साधताना सांगितले की, दिल्लीत परत आल्याने मला बरं वाटलं आणि आता मला लवकरात लवकर घरी जायचे आहे. 

इस्रायलमधील हल्ल्यादरम्यान एका एपने त्याच्यासारख्या अनेक भारतीयांना खूप मदत केली. त्याने सांगितलं की, जेव्हा जेव्हा सायरन वाजतो तेव्हा एपवर तुमच्या घरापासून किती अंतरावर बॉम्ब पडला होता हे लोकेशन दिसायचं. इस्रायलमध्ये पडलेल्या सर्व रॉकेटचं लोकेशन एपद्वारे कळालं. विशेषने आपल्या देशात परतल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले. सुरक्षितपणे विमानतळावर नेण्यात आले आणि तेथून ते एका विशेष विमानाने भारतात परतले. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही असं त्याने सांगितलं. 

विशेष विमानाने भारतात परतलेल्या रांची येथील रहिवासी विनिता यांनी सांगितले की, मी इस्रायलमध्ये पीएचडी करत आहे. मी गेल्या दीड वर्षापासून तिथे राहत आहे आणि 4 वर्ष मला तिथे राहावं लागणार आहे. मी मध्य इस्रायलमध्ये राहत होतो आणि तिथेही बॉम्बस्फोट झाले होते. जेव्हा-जेव्हा मिसाईल पडत होतं, तेव्हा जीव वाचवण्यासाठी आम्हाला पुन्हा-पुन्हा बंकरमध्ये जावं लागत होतं. विनिताने सांगितलं की, इस्रायलमध्ये जे काही घडत होतं त्यामुळे कुटुंबीय खूप अस्वस्थ झाले होते. 

विनिता म्हणाल्या की, इस्रायली दूतावास खूप चांगला आहे. जेव्हा जेव्हा आम्ही फोन किंवा मेसेज केला तेव्हा आम्हाला मदत मिळाली. ऑपरेशन अजय इतकं चांगलं होतं की चेकिंग सुरळीत पार पडलं आणि आम्ही भारतात आलो. कॉलेजमधून विमानतळावर येताना थोडी अडचण आली, कारण मिसाईल कधी येईल आणि मग बंकर कुठे सापडेल, हे माहीत नाही, असे ते म्हणाले. भारत सरकारच्या या उपक्रमाचे कौतुक करताना विनिता म्हणाल्या की, आम्ही अगदी सहज घरी परतलो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलIndiaभारत