शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

पळा, पळा.. मिसाईल पडलं... इस्रायलमध्ये एका मोबाईल App ने वाचवला भारतीयांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 11:39 IST

Israel Palestine Conflict : इस्रायलमधील हल्ल्यादरम्यान एका एपने त्याच्यासारख्या अनेक भारतीयांना खूप मदत केली.

इस्रायलमधील विद्यार्थ्यांसह सुमारे 200 भारतीय शुक्रवारी पहाटे चार्टेर्ड फ्लाइटने दिल्लीत पोहोचले. गेल्या शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांनंतर या प्रदेशात तणाव पसरला, ज्याचा परिणाम म्हणून भारताने मायदेशी परत येऊ इच्छिणाऱ्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू केले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्ली विमानतळावर प्रवाशांचे स्वागत केले. त्यांनी हात जोडून सर्वांना अभिवादन केलं आणि 'घरी स्वागत आहे' असं म्हटलं. 

विद्यार्थ्यांनी याच दरम्यान न्यूज 18 इंडियासोबत त्यांचे अनुभव शेअर केले आणि क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यान मोबाईल एपने त्यांचा जीव कसा वाचवला ते सांगितलं. त्यांनी सांगितलं की, हल्ल्याचा इशारा मिळताच ते घरातून निघून बंकरमध्ये जायचे. केंद्र सरकारच्या ऑपरेशन अजय अंतर्गत इस्रायलहून खास चार्टर्ड फ्लाइटने आयजीआय विमानतळावर परतलेला पंजाबचा रहिवासी विशेष याने संवाद साधताना सांगितले की, दिल्लीत परत आल्याने मला बरं वाटलं आणि आता मला लवकरात लवकर घरी जायचे आहे. 

इस्रायलमधील हल्ल्यादरम्यान एका एपने त्याच्यासारख्या अनेक भारतीयांना खूप मदत केली. त्याने सांगितलं की, जेव्हा जेव्हा सायरन वाजतो तेव्हा एपवर तुमच्या घरापासून किती अंतरावर बॉम्ब पडला होता हे लोकेशन दिसायचं. इस्रायलमध्ये पडलेल्या सर्व रॉकेटचं लोकेशन एपद्वारे कळालं. विशेषने आपल्या देशात परतल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले. सुरक्षितपणे विमानतळावर नेण्यात आले आणि तेथून ते एका विशेष विमानाने भारतात परतले. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही असं त्याने सांगितलं. 

विशेष विमानाने भारतात परतलेल्या रांची येथील रहिवासी विनिता यांनी सांगितले की, मी इस्रायलमध्ये पीएचडी करत आहे. मी गेल्या दीड वर्षापासून तिथे राहत आहे आणि 4 वर्ष मला तिथे राहावं लागणार आहे. मी मध्य इस्रायलमध्ये राहत होतो आणि तिथेही बॉम्बस्फोट झाले होते. जेव्हा-जेव्हा मिसाईल पडत होतं, तेव्हा जीव वाचवण्यासाठी आम्हाला पुन्हा-पुन्हा बंकरमध्ये जावं लागत होतं. विनिताने सांगितलं की, इस्रायलमध्ये जे काही घडत होतं त्यामुळे कुटुंबीय खूप अस्वस्थ झाले होते. 

विनिता म्हणाल्या की, इस्रायली दूतावास खूप चांगला आहे. जेव्हा जेव्हा आम्ही फोन किंवा मेसेज केला तेव्हा आम्हाला मदत मिळाली. ऑपरेशन अजय इतकं चांगलं होतं की चेकिंग सुरळीत पार पडलं आणि आम्ही भारतात आलो. कॉलेजमधून विमानतळावर येताना थोडी अडचण आली, कारण मिसाईल कधी येईल आणि मग बंकर कुठे सापडेल, हे माहीत नाही, असे ते म्हणाले. भारत सरकारच्या या उपक्रमाचे कौतुक करताना विनिता म्हणाल्या की, आम्ही अगदी सहज घरी परतलो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलIndiaभारत