शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पळा, पळा.. मिसाईल पडलं... इस्रायलमध्ये एका मोबाईल App ने वाचवला भारतीयांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 11:39 IST

Israel Palestine Conflict : इस्रायलमधील हल्ल्यादरम्यान एका एपने त्याच्यासारख्या अनेक भारतीयांना खूप मदत केली.

इस्रायलमधील विद्यार्थ्यांसह सुमारे 200 भारतीय शुक्रवारी पहाटे चार्टेर्ड फ्लाइटने दिल्लीत पोहोचले. गेल्या शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांनंतर या प्रदेशात तणाव पसरला, ज्याचा परिणाम म्हणून भारताने मायदेशी परत येऊ इच्छिणाऱ्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू केले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्ली विमानतळावर प्रवाशांचे स्वागत केले. त्यांनी हात जोडून सर्वांना अभिवादन केलं आणि 'घरी स्वागत आहे' असं म्हटलं. 

विद्यार्थ्यांनी याच दरम्यान न्यूज 18 इंडियासोबत त्यांचे अनुभव शेअर केले आणि क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यान मोबाईल एपने त्यांचा जीव कसा वाचवला ते सांगितलं. त्यांनी सांगितलं की, हल्ल्याचा इशारा मिळताच ते घरातून निघून बंकरमध्ये जायचे. केंद्र सरकारच्या ऑपरेशन अजय अंतर्गत इस्रायलहून खास चार्टर्ड फ्लाइटने आयजीआय विमानतळावर परतलेला पंजाबचा रहिवासी विशेष याने संवाद साधताना सांगितले की, दिल्लीत परत आल्याने मला बरं वाटलं आणि आता मला लवकरात लवकर घरी जायचे आहे. 

इस्रायलमधील हल्ल्यादरम्यान एका एपने त्याच्यासारख्या अनेक भारतीयांना खूप मदत केली. त्याने सांगितलं की, जेव्हा जेव्हा सायरन वाजतो तेव्हा एपवर तुमच्या घरापासून किती अंतरावर बॉम्ब पडला होता हे लोकेशन दिसायचं. इस्रायलमध्ये पडलेल्या सर्व रॉकेटचं लोकेशन एपद्वारे कळालं. विशेषने आपल्या देशात परतल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले. सुरक्षितपणे विमानतळावर नेण्यात आले आणि तेथून ते एका विशेष विमानाने भारतात परतले. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही असं त्याने सांगितलं. 

विशेष विमानाने भारतात परतलेल्या रांची येथील रहिवासी विनिता यांनी सांगितले की, मी इस्रायलमध्ये पीएचडी करत आहे. मी गेल्या दीड वर्षापासून तिथे राहत आहे आणि 4 वर्ष मला तिथे राहावं लागणार आहे. मी मध्य इस्रायलमध्ये राहत होतो आणि तिथेही बॉम्बस्फोट झाले होते. जेव्हा-जेव्हा मिसाईल पडत होतं, तेव्हा जीव वाचवण्यासाठी आम्हाला पुन्हा-पुन्हा बंकरमध्ये जावं लागत होतं. विनिताने सांगितलं की, इस्रायलमध्ये जे काही घडत होतं त्यामुळे कुटुंबीय खूप अस्वस्थ झाले होते. 

विनिता म्हणाल्या की, इस्रायली दूतावास खूप चांगला आहे. जेव्हा जेव्हा आम्ही फोन किंवा मेसेज केला तेव्हा आम्हाला मदत मिळाली. ऑपरेशन अजय इतकं चांगलं होतं की चेकिंग सुरळीत पार पडलं आणि आम्ही भारतात आलो. कॉलेजमधून विमानतळावर येताना थोडी अडचण आली, कारण मिसाईल कधी येईल आणि मग बंकर कुठे सापडेल, हे माहीत नाही, असे ते म्हणाले. भारत सरकारच्या या उपक्रमाचे कौतुक करताना विनिता म्हणाल्या की, आम्ही अगदी सहज घरी परतलो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलIndiaभारत