शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

तिजोरी खुली करून गरजवंतांना ६ महिने दरमहा ७५०० रुपये द्या; काँग्रेसचे ‘स्पीक अप इंडिया’ अभियान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 23:37 IST

कोरोनाचा सर्वाधिक फटका गरिबांना बसला आहे. मजुरांना उपाशीपोटी पायपीट करावी लागत आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : स्थलांतरितांच्या वेदनांचा आकांत केंद्र सरकार वगळता संपूर्ण देशाने ऐकला. सरकारने तिजोरी खुली करून कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे हैराण झालेल्यांना मदत करावी. कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे देश रोजी-रोटीच्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. तहान-भुकेची पर्वा न करता लाखो मजुरांना हजारो मैल पायपीट करीत घराची वाट धरण्यास भाग पाडले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असे विदारक दृश्य सर्वांनी पाहिले.

या मजुरांचे दु:ख आणि व्यथा सर्वांनी ऐकल्या; परंतु सरकारला ऐकू गेल्या नाहीत, अशा धीरगंभीर शब्दांत सरकारवर हल्ला करीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रत्येक गरजू कुटुंबाला पुढच्या सहा महिन्यांसाठी दरमहा साडेसात हजार रुपये देण्याची आणि त्यापैकी १० हजार रुपये तात्काळ देण्यासोबत सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्राला तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी केली.

सोशल मीडियावरून काँग्रेसतर्फे सुरू करणाऱ्यात आलेल्या ‘स्पीक अप इंडिया’ अभियानातहत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सरकारवर हल्ला चढविला. सोशल मीडियावर काँग्रेसने जारी केलेल्या व्हिडिओ फितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी दु:खी पीडितांच्या व्यथेची पर्वा न करता झोपले असल्याचे दाखविण्यात आले आहे. गरीब, मजूर आणि छोट्या व्यावसायिकांच्या मदतीसाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

कर्ज नव्हे, आर्थिक मदतीची गरज -राहुल गांधी

आजघडीला देशाला कर्जाची नव्हे, तर आर्थिक मदतीची गरज आहे. तेव्हा सरकारने गरिबांच्या खात्यात सहा महिन्यांसाठी दरमहा ७,५०० रुपये जमा करावेत. सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्रासाठी आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या ‘स्पीक अप इंडिया’ अभियानातहत सोशल मीडियावर जारी केलेल्या एका व्हिडिओतून केली आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका गरिबांना बसला आहे. मजुरांना उपाशीपोटी पायपीट करावी लागत आहे. देशाला कर्जाची नाही, तर आर्थिक मदतीची गरज आहे. मनरेगातहत दोनशे दिवस रोजगार द्यावा, मजुरांना घरी पोहोचविण्यासाठी तात्काळ व्यवस्था करावी आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगाला तात्काळ एक पॅकेज द्यावे.

महाराष्ट्रात सरकार पाडण्याचे प्रयत्न -प्रियांका गांधी

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा भाजप प्रयत्न करीत आहे, असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला. आजच्या संकटाच्या काळात राजकारण करू नये. सहकार्य करण्याऐवजी तुम्ही सरकार पाडण्याचा, अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहात.

आज जनता त्रस्त आहे. एक मुलगा वडिलांना बैलगाडीत बसवून गाडी ओढत आहे. एक मुलगी वडिलांना सायकलवर बसवून गावी जाते. एका मातेचा मृतदेह रेल्वेच्या फलाटावर पडला असून, तिचा चिमुकला मुलगा तिला जागे करण्याचा प्रयत्न करीत आहे. श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांत लोक मरण पावत आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या लोकांसाठी आज काँग्रेसचे कार्यकर्ते आवाज उठवीत आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी