शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

Economists Open Letter to Nirmala Sitharaman: जगभरातील ५१ अर्थतज्ज्ञांचे Union Budget आधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना खुले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 14:24 IST

पाहा काय आहेत मागण्या अन् कोणत्या मुद्द्यांवर केल्या सूचना

Economists Open Letter to Nirmala Sitharaman: पंजाबमधील पटियाला येथील द इकॉनॉमिस्ट फॉर पब्लिक इंटरेस्टने केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ च्या आधी वित्तमंत्रीनिर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले. जगभरातील ५१ अर्थतज्ज्ञांनी मिळून लिहिलेल्या पत्रात पंजाबच्या विकासाचा वेग पुन्हा वाढवण्यासाठी आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे आणि अनेक सूचना दिल्या आहेत. पंजाब हे भारताचे धोरणात्मक राज्य आहे, असे अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे. अर्थशास्त्रज्ञांनी राज्याला आर्थिक पॅकेज का मिळावे याची अनेक कारणे नमूद केली. प्रोफेसर लखविंदर सिंग, प्रोफेसर सुखविंदर सिंग आणि प्रोफेसर केसर सिंग भांगू यांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.

पत्रात त्यांनी लिहिले आहे की, पंजाब हे देशाचे अन्न आणि राष्ट्रीय सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीने भारताचे एक सामरिक राज्य आहे. कोविड-19 महामारीच्या काळात पंजाबने आपली क्षमता सिद्ध केली आहे. ते म्हणाले की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, पंजाब राज्याने 2021-22 मध्ये 3,05,126.3 कोटी रुपये {2,82,865 कोटी रूपयांची थकबाकीदार दायित्वे (outstanding liability) + 22261.3 कोटी रूपयांची थकबाकी हमी (Outstanding guarantee)} जमा केले आहेत. हे मार्च 2022 अखेर सकल राज्य देशांतर्गत उत्पादनाच्या (GSDP) 53.3 टक्के आहे.

पत्रात असेही नमूद करण्यात आले आहे की, कर्जाच्या स्थिरतेमुळे भारताच्या तेराव्या वित्त आयोगाने पंजाब राज्याला कर्जबाजारी राज्याच्या श्रेणीत टाकले आहे आणि आर्थिक पॅकेजची शिफारस केली आहे जी कधीही पूर्ण झाली नाही. आता पंजाबचे "stressed debt" राज्यातून "कर्जग्रस्त" राज्यात रूपांतर झाले आहे. पंजाबमधील खासगी गुंतवणुकीलाही यामुळे ब्रेक लागला आहे. परिणामी अर्थव्यवस्थेचा विकासही मंदावला आहे. या अनुषंगाने अर्थतज्ज्ञांनी पंजाबच्या विकासाचा वेग पुन्हा वाढवण्यासाठी आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे.

जगभरातील ५१ नामवंत अर्थतज्ज्ञांनी अर्थमंत्र्यांना लिहिले पत्र

अर्थमंत्रीनिर्मला सीतारामन यांना जगभरातील ५१ नामवंत अर्थतज्ज्ञांनी एक खुले पत्र लिहून सामाजिक सुरक्षा पेन्शन आणि महिलांना मातृत्व लाभासाठी अर्थसंकल्पात योग्य निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे. अर्थतज्ज्ञांनी लिहिले आहे की त्यांनी यापूर्वी २० डिसेंबर २०१७ आणि २१ डिसेंबर २०१८ रोजीही या संदर्भात पत्रे लिहिण्यात आली होती. राष्ट्रीय पेन्शन योजनेंतर्गत वृद्धांना दरमहा केवळ २०० रुपये मिळतात. २००६ पासून ही रक्कम वाढवण्यात आली नसून आता ती ५०० रुपये किंवा त्याहून अधिक करण्यात यावी, असे सुचवण्यात आले आहेत.

टॅग्स :nirmala sitharamanनिर्मला सीतारामनministerमंत्रीEconomyअर्थव्यवस्थाPunjabपंजाब