शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यक्रमात फक्त शाकाहारी जेवण; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 05:38 IST

आसाम सरकारने विकासावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. 

गुवाहाटी : व्हीआयपी संस्कृती आसाम सरकार संपुष्टात आणणार आहे. यापुढे सरकारी कार्यक्रमात केवळ शाकाहारी व सात्विक खाद्यपदार्थच दिले जातील, असे त्या राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी जाहीर केले. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत.

त्यांनी सांगितले की, एखाद्या जिल्ह्यात मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांचा दौरा असेल तिथे सरकारी कार्यक्रमात फक्त शाकाहारी खाद्यपदार्थच दिले जातील. हे कार्यक्रमदेखील साध्या पद्धतीने आयोजित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 

‘सरकारी इमारतींच्या बांधकामावर लक्ष ठेवा’

सरमा म्हणाले की, जिल्ह्यातील सरकारी इमारतींचे बांधकाम किती पूर्ण झाले, याची पाहणी करावी. आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी केंद्र या गोष्टींतून विकासाला चालना मिळते. त्यामुळे त्या गोष्टींकडेही जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.

नियमातून पाहुण्यांना वगळले

सरकारी कार्यक्रमात शाकाहारी खाद्यपदार्थ किंवा जेवण देणे यापुढे बंधनकारक करण्यात येणार आहे. मात्र सरकारने कार्यक्रम, दौऱ्यासाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांना मात्र हा नियम लागू होणार नाही असे बिस्वा सरमा यांनी सांगितले. आसाम सरकारने विकासावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. 

ताफ्यामध्ये दहापेक्षा जास्त कार नकोत...

मुख्यमंत्र्यांचा एखाद्या जिल्ह्यात दौरा असेल त्यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्या कारसह ताफ्यामध्ये दहापेक्षा जास्त कार नसाव्यात, असा आदेश हिमंता बिस्वा सरमा यांनी दिला. गेल्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित असलेल्या मंत्र्यांसाठी एका जिल्हाधिकाऱ्याने शाही भोजनव्यवस्था केली होती. त्यामुळे या अधिकाऱ्याला मुख्यमंत्री सरमा यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर या जिल्हाधिकाऱ्याला एक पत्र लिहून सरमा यांनी त्यांचे कान टोचले. बैठकीत शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्याच्या वारंवार सूचना देऊनही त्याचे पालन करण्यात आले नाही, असे त्यांनी या पत्रात म्हटले होते.

 

टॅग्स :Assamआसाम