शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

या देशावर संविधानच राज्य करेल; मोहन भागवतांचे नाव घेत राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:49 IST

'कोणतीही शक्ती संविधानाला हात लावण्याची हिंमत करू शकत नाही.'

Rahul Gandhi in Parliament :संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज(3 फेब्रुवारी) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा करतेवेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मेक इन इंडिया, निवडणूक आयोग, रोजगारी, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूका...अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचाही मुद्दा उपस्थित केला. 

मोहन भागवतांवर टीका'मला आठवतंय निवडणुकीपूर्वी तुम्ही सर्वजण (भाजप) '400 पार' म्हणत होता. सत्ता आल्यावर संविधान बदलणार, अशी भाषा तुम्ही वापरली. पण, निवडून आल्यानंतर पंतप्रधानांना संविधानासमोर डोके टेकवावे लागले. हे पाहून मला खूप आनंद झाला. सर्व काँग्रेससाठी हा अभिमानाचा क्षण होता. आम्ही पंतप्रधानांना आणि संपूर्ण देशाला सांगितले होते की, कोणतीही शक्ती याला हात लावण्याची हिंमत करू शकत नाही. मला माहितेय की, आरएसएसने हे कधीही स्वीकारले नाही. मोहन भागवत म्हणाले की, भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही. पण, आम्ही तुमचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही. हे संविधान नेहमीच भारतावर राज्य करेल

निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा डेटा मागितलामहाराष्ट्राच्या निकालाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, 'लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने बाजी मारली. पण लोकसभा निवडणुकीपूर्वी हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके नवीन मतदार यादीत जोडले गेले. विधानसभा निवडणुकीदरम्यान 70 लाख नवीन मतदारांची भर पडली. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात जेवढे जोडले गेले, त्यापेक्षा गेल्या पाच महिन्यांत जास्त जोडले गेले. मी कोणतेही आरोप करत नाही. मी फक्त असे म्हणत आहे की, काही तरी समस्या आहे. लोकसभा मतदार यादी, नावे आणि पत्ते देण्याची मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे केली होती,' असेही राहुल गांधींनी यावेळी सांगितले.

भगवान शिवाचा उल्लेख भगवान शिवाचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, 'देशाला आपल्या जुन्या वारशाशी जोडले गेले पाहिजे. तुम्ही सरदार पटेलांचा उल्लेख करता, पण त्यांची मूल्ये रोज चिरडता. तुम्ही आंबेडकरांबद्दल बोलता, त्यांची मूल्ये चिरडता. तुम्ही भगवान बुद्धांबद्दल बोलता, पण त्यांच्या मूल्यांवर विश्वास ठेवत नाही. तुम्ही नेहरुंबद्दल बोलता, नाही, नाही... तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही.'

चीन आपल्या सीमेत घुसला कारण...चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप करत राहुल गांधी म्हणाले की, 'पंतप्रधानांनी आरोप फेटाळून लावले, पण लष्कराने सांगितले की, चीनच्या ताब्यात चार हजार चौरस किलोमीटर जमीन आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, युद्ध हे औद्योगिक व्यवस्थेवर अवलंबून आहे आणि त्यात ते आपल्यापेक्षा पुढे आहेत. यामुळेच मेक इन इंडिया अपयशी ठरत असल्याने चीनने आपल्या देशात प्रवेश केला आहे.'

'आज मोबाईल फोन भारतात बनवला, असे आपण म्हणत असलो तरी, त्याचे पार्ट्स चीनमधून आले आहेत आणि इथे फक्त असेंबल केले आहेत. मेक इन इंडियाबद्दल पंतप्रधान जे बोलले ते चांगलेच आहे. पण उत्पादनात अपयश येत आहे. आम्ही पंतप्रधानांना दोष देत नाही, पंतप्रधानांनी प्रयत्न केला, कल्पना योग्य होती पण ते अपयशी ठरत आहेत. आज देशातील उत्पादन 60 वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीMohan Bhagwatमोहन भागवतParliamentसंसद