शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
3
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
4
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
5
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
6
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
7
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
8
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
9
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
10
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
11
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
12
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
13
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
14
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
15
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
16
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
17
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
18
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
19
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
20
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

या देशावर संविधानच राज्य करेल; मोहन भागवतांचे नाव घेत राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:49 IST

'कोणतीही शक्ती संविधानाला हात लावण्याची हिंमत करू शकत नाही.'

Rahul Gandhi in Parliament :संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज(3 फेब्रुवारी) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा करतेवेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मेक इन इंडिया, निवडणूक आयोग, रोजगारी, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूका...अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचाही मुद्दा उपस्थित केला. 

मोहन भागवतांवर टीका'मला आठवतंय निवडणुकीपूर्वी तुम्ही सर्वजण (भाजप) '400 पार' म्हणत होता. सत्ता आल्यावर संविधान बदलणार, अशी भाषा तुम्ही वापरली. पण, निवडून आल्यानंतर पंतप्रधानांना संविधानासमोर डोके टेकवावे लागले. हे पाहून मला खूप आनंद झाला. सर्व काँग्रेससाठी हा अभिमानाचा क्षण होता. आम्ही पंतप्रधानांना आणि संपूर्ण देशाला सांगितले होते की, कोणतीही शक्ती याला हात लावण्याची हिंमत करू शकत नाही. मला माहितेय की, आरएसएसने हे कधीही स्वीकारले नाही. मोहन भागवत म्हणाले की, भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही. पण, आम्ही तुमचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही. हे संविधान नेहमीच भारतावर राज्य करेल

निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा डेटा मागितलामहाराष्ट्राच्या निकालाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, 'लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने बाजी मारली. पण लोकसभा निवडणुकीपूर्वी हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके नवीन मतदार यादीत जोडले गेले. विधानसभा निवडणुकीदरम्यान 70 लाख नवीन मतदारांची भर पडली. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात जेवढे जोडले गेले, त्यापेक्षा गेल्या पाच महिन्यांत जास्त जोडले गेले. मी कोणतेही आरोप करत नाही. मी फक्त असे म्हणत आहे की, काही तरी समस्या आहे. लोकसभा मतदार यादी, नावे आणि पत्ते देण्याची मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे केली होती,' असेही राहुल गांधींनी यावेळी सांगितले.

भगवान शिवाचा उल्लेख भगवान शिवाचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, 'देशाला आपल्या जुन्या वारशाशी जोडले गेले पाहिजे. तुम्ही सरदार पटेलांचा उल्लेख करता, पण त्यांची मूल्ये रोज चिरडता. तुम्ही आंबेडकरांबद्दल बोलता, त्यांची मूल्ये चिरडता. तुम्ही भगवान बुद्धांबद्दल बोलता, पण त्यांच्या मूल्यांवर विश्वास ठेवत नाही. तुम्ही नेहरुंबद्दल बोलता, नाही, नाही... तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही.'

चीन आपल्या सीमेत घुसला कारण...चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप करत राहुल गांधी म्हणाले की, 'पंतप्रधानांनी आरोप फेटाळून लावले, पण लष्कराने सांगितले की, चीनच्या ताब्यात चार हजार चौरस किलोमीटर जमीन आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, युद्ध हे औद्योगिक व्यवस्थेवर अवलंबून आहे आणि त्यात ते आपल्यापेक्षा पुढे आहेत. यामुळेच मेक इन इंडिया अपयशी ठरत असल्याने चीनने आपल्या देशात प्रवेश केला आहे.'

'आज मोबाईल फोन भारतात बनवला, असे आपण म्हणत असलो तरी, त्याचे पार्ट्स चीनमधून आले आहेत आणि इथे फक्त असेंबल केले आहेत. मेक इन इंडियाबद्दल पंतप्रधान जे बोलले ते चांगलेच आहे. पण उत्पादनात अपयश येत आहे. आम्ही पंतप्रधानांना दोष देत नाही, पंतप्रधानांनी प्रयत्न केला, कल्पना योग्य होती पण ते अपयशी ठरत आहेत. आज देशातील उत्पादन 60 वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीMohan Bhagwatमोहन भागवतParliamentसंसद