शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

'राम मंदिर सोहळ्यात फक्त श्रीमंत लोक दिसले, एकही गरीब नव्हता', राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 17:26 IST

'मोदींनी शेतकऱ्यांचा एक रुपयाही माफ केला नाही, पण देशातील अब्जाधीशांचे 16 लाख कोटी रुपये माफ केले.'

Rahul Ganghi Hits BJP: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली भारत जोडो न्याय यात्रा बिहारनंतर आता उत्तर प्रदेशात दाखल झाली आहे. लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी राहुल गांधींनी बिहारमधील मोहनिया येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली.

'देशात द्वेषाचे वातावरण'राहुल म्हणाले, भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीने देशात द्वेष आणि हिंसाचार पसरवला आहे. या द्वेषाच्या विरोधात आम्ही एकत्र लढू आणि जिंकू. यात्रेदरम्यान आम्ही लोकांना विचारले की, देशात जे द्वेषाचे वातावरण निर्माण होताहे, त्याचे कारण काय? त्यावर आम्हाला एकच उत्तर मिळाले की, द्वेषाचे कारण भीती आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अन्याय होतोय. शेतकरी, तरुण, महिलांवर आर्थिक, सामाजिक, अन्याय होतोय. अग्निवीर शहीद झाला, त्याला शहीदाचा दर्जा दिला जात नाही, पेंशन दिली जात नाही. सरकारकडून सैनिकांची फसवणूक होत आहे.

'बहुतांश लोकसंख्या बेरोजगार'ते पुढे म्हणाले की, बिहारच्या तरुणांना रेल्वेत नोकऱ्या मिळत नाहीत, कारण केंद्र सरकारला तुम्ही सर्वांनी कंत्राटी कामगार व्हावे अशी इच्छा आहे. देशात मागासवर्गीयांची लोकसंख्या 50 टक्के, दलित वर्ग 15 टक्के, आदिवासी वर्ग 8 टक्के आहे. या तिघांची मिळून 73 टक्के आहे, पण देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या मालकांच्या यादीत 73 टक्के असलेले किती लोक आहेत? 73 टक्के लोकसंख्या ना सैन्यात आहे, ना उच्च न्यायालयात, ना सार्वजनिक क्षेत्रात. या 73 टक्के लोकसंख्येपैकी बहुतांश लोक बेरोजगार आहेत. ज्यांना रोजगार मिळतो, ते कंत्राटी कामगार आहेत. या लोकसंख्येचा वरिष्ठ नोकरशाहीत कोणताही सहभाग नाही, अशीही टीका त्यांनी यावेळी केली.

'राम मंदिर सोहळ्यात एकही गरीब नव्हता.'राम मंदिराच्या उद्घाटनावेळी फक्त श्रीमंत लोक दिसले, पण एकही गरीब माणूस दिसला नाही. याचे कारण म्हणजे, हे लोक मजूर म्हणून काम करत होते. जात जनगणना हा देशाचा एक्स-रे आहे. आमचे सरकार येताच आम्ही संपूर्ण देशात जात जनगणना करू. शेतकऱ्यांना एमएसपी देण्याची कायदेशीर हमी आम्ही देऊ. मोदींनी शेतकऱ्यांचा एक रुपयाही माफ केला नाही आणि देशातील 20-25 अब्जाधीशांचे 16 लाख कोटी रुपये माफ केले. आमच्या सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्यांचे 70 हजार कोटी रुपये माफ केले होते, असेही राहुल यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राBJPभाजपाRam Mandirराम मंदिरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा