शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

'राम मंदिर सोहळ्यात फक्त श्रीमंत लोक दिसले, एकही गरीब नव्हता', राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 17:26 IST

'मोदींनी शेतकऱ्यांचा एक रुपयाही माफ केला नाही, पण देशातील अब्जाधीशांचे 16 लाख कोटी रुपये माफ केले.'

Rahul Ganghi Hits BJP: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली भारत जोडो न्याय यात्रा बिहारनंतर आता उत्तर प्रदेशात दाखल झाली आहे. लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी राहुल गांधींनी बिहारमधील मोहनिया येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली.

'देशात द्वेषाचे वातावरण'राहुल म्हणाले, भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीने देशात द्वेष आणि हिंसाचार पसरवला आहे. या द्वेषाच्या विरोधात आम्ही एकत्र लढू आणि जिंकू. यात्रेदरम्यान आम्ही लोकांना विचारले की, देशात जे द्वेषाचे वातावरण निर्माण होताहे, त्याचे कारण काय? त्यावर आम्हाला एकच उत्तर मिळाले की, द्वेषाचे कारण भीती आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अन्याय होतोय. शेतकरी, तरुण, महिलांवर आर्थिक, सामाजिक, अन्याय होतोय. अग्निवीर शहीद झाला, त्याला शहीदाचा दर्जा दिला जात नाही, पेंशन दिली जात नाही. सरकारकडून सैनिकांची फसवणूक होत आहे.

'बहुतांश लोकसंख्या बेरोजगार'ते पुढे म्हणाले की, बिहारच्या तरुणांना रेल्वेत नोकऱ्या मिळत नाहीत, कारण केंद्र सरकारला तुम्ही सर्वांनी कंत्राटी कामगार व्हावे अशी इच्छा आहे. देशात मागासवर्गीयांची लोकसंख्या 50 टक्के, दलित वर्ग 15 टक्के, आदिवासी वर्ग 8 टक्के आहे. या तिघांची मिळून 73 टक्के आहे, पण देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या मालकांच्या यादीत 73 टक्के असलेले किती लोक आहेत? 73 टक्के लोकसंख्या ना सैन्यात आहे, ना उच्च न्यायालयात, ना सार्वजनिक क्षेत्रात. या 73 टक्के लोकसंख्येपैकी बहुतांश लोक बेरोजगार आहेत. ज्यांना रोजगार मिळतो, ते कंत्राटी कामगार आहेत. या लोकसंख्येचा वरिष्ठ नोकरशाहीत कोणताही सहभाग नाही, अशीही टीका त्यांनी यावेळी केली.

'राम मंदिर सोहळ्यात एकही गरीब नव्हता.'राम मंदिराच्या उद्घाटनावेळी फक्त श्रीमंत लोक दिसले, पण एकही गरीब माणूस दिसला नाही. याचे कारण म्हणजे, हे लोक मजूर म्हणून काम करत होते. जात जनगणना हा देशाचा एक्स-रे आहे. आमचे सरकार येताच आम्ही संपूर्ण देशात जात जनगणना करू. शेतकऱ्यांना एमएसपी देण्याची कायदेशीर हमी आम्ही देऊ. मोदींनी शेतकऱ्यांचा एक रुपयाही माफ केला नाही आणि देशातील 20-25 अब्जाधीशांचे 16 लाख कोटी रुपये माफ केले. आमच्या सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्यांचे 70 हजार कोटी रुपये माफ केले होते, असेही राहुल यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राBJPभाजपाRam Mandirराम मंदिरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा