शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

कसं व्हायचं आत्मनिर्भर? २४ लाखांनी अर्ज केला; पण मोदी सरकारनं केवळ 'इतक्याच' जणांना रोजगार दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 06:58 IST

कौशलविकास मंत्रालयाने अनेक मंत्रालयांसोबत राबवली योजना

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनमुळे रोजगार गमावलेल्यांसाठी त्यांच्या घराजवळच रोजगार उपलब्ध करण्याच्या सुरू केलेल्या योजनेबद्दल अनेक लोकांना आशा होती; परंतु तिचा लाभ मूठभर लोकांनाच झाला.कौशल्यविकास मंत्रालयाच्या या योजनेंतर्गत २४ लाखांपेक्षा जास्त लोकांनी रोजगारासाठी अर्ज केला होता; परंतु त्यातील फक्त पाच हजार जणांनाच रोजगार मिळाला.सूत्रांनुसार मंत्रालयाद्वारे रोजगारावरील संसदेच्या स्थायी समितीला सांगण्यात आले की, या २४ लाख लोकांपैकी फक्त २.१ लाख संबंधित कामाचा विचार करता कुशल आढळले; परंतु ४८ हजार नोकऱ्या उपलब्ध असूनही फक्त पाच हजार जणांनाच काम मिळाले. बिजू जनता दलाचे भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालील समितीला माहिती दिली गेली की, अर्जदारांच्या कौशल्याला कमी वेतन देणे, प्रमाणित कौशल्य नसल्यामुळे आणि रोजगाराआधी कोणत्याही दूरवरच्या क्षेत्रात प्रशिक्षणाच्या अटीमुळे कमी लोकांना रोजगार मिळाला.सूत्रांनुसार शुक्रवारी झालेल्या या बैठकीत कौशल्यविकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांतील बातम्यांंच्या आधारे सांगितले की, सरकार मानत आहे की, आपापल्या घरी परतलेल्या कामगारांपैकी बहुतांश लवकरच त्यांच्या त्यांच्या कामाच्या जागी परततील. कोरोना महामारीची सध्याची तसेच रोजगार उपलब्धतेची स्थिती पाहता समितीच्या काही सदस्यांनी हे मान्य करायला नकार दिला. कौशल्यविकास मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय कौशल्यविकास महामंडळाने लॉकडाऊनमुळे २५ हजारांपेक्षा जास्त कामगार आपल्या घरी परतले होते, अशा देशातील ११६ जिल्ह्यांत आत्मनिर्भर स्किल्ड एम्प्लॉयर एम्प्लॉई मॅपिंग पोर्टल सुरू केले होते.आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित या पोर्टलमध्ये नियुक्ते, कुशल कामगार आणि प्रशिक्षण देणाºया भागीदारांना एकत्र आणण्यात आले आहे. गेल्या एप्रिलमध्ये तयार केलेल्या या पोर्टलला अधिकृतरीत्या जुलैमध्ये सुरू केले गेले. सोबतच रोजगारासाठी अर्ज करण्यासाठी एक मोबाईल अ‍ॅप्लिकेशनही सुरू केले गेले.